शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मुलाच्या मृत्यूची चौकशी करा

By admin | Updated: May 8, 2017 02:16 IST

तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.

वडिलांची हायकोर्टाला विनंती : पोलीस वाहनाने धडक दिल्याचा आरोप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तरुण मुलाच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, यासाठी वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. युवराज भय्याजी नासरे असे वडिलांचे नाव असून ते धन्वंतरीनगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अजिंक्य (१९) होते. तो रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. पोलीस वाहनाने धडक दिल्यामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असून, या प्रकरणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्यात आल्याचा नासरे यांचा आरोप आहे. २८ जुलै २०१६ रोजी अजिंक्य नेहमीप्रमाणे महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाला होता. त्याच्याकडे मोटरसायकल होती. दरम्यान, जुना काटोल नाक्यावर अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार नोंदविली. अजिंक्यने गाईला धडक दिली. त्यामुळे तो रस्ता दुभाजकावर आदळून ठार झाला, असे तक्रारीत नमूद करण्यात आले. परिणामी अजिंक्यविरुद्धच भादंविच्या कलम २७९ व ३३८ अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला. परिस्थितीजन्य पुरावे व अजिंक्यच्या शरीरावरील जखमा पाहता त्याला वाहनाने धडक दिल्याचे स्पष्ट होते. ते वाहन पोलिसांचे होते, असा दावा नासरे यांनी केला आहे. अजिंक्यच्या हातावर वाहनाचे चाक गेल्याच्या खुणा होत्या. रोडच्या मधोमध त्याच्या रक्ताचे डाग होते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. नासरे जुलै-२०१६ पासून सतत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या असून, त्यावर समाधानकारक कारवाई करण्यात आली नाही. नासरे यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. परिणामी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. प्रकरणाचा विशेष यंत्रणेमार्फत तपास करण्याची विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. पोलीस आयुक्तांना नोटीस उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांनी प्रकरणावर सुनावणी केल्यानंतर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त झोन-२ व गिट्टीखदान पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून २१ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.