शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

नदीतील खडकाचे अवैध खोदकाम

By admin | Updated: December 12, 2014 00:28 IST

सावनेर तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीवरील टेंभूरडोह ते रायवाडी या दोन रेतीघाटादरम्यान असलेल्या महाकाय खडकाचे रेतीमाफियांनी अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे.

संजय पोफळी - खापा सावनेर तालुक्यातील वाहणाऱ्या कन्हान नदीवरील टेंभूरडोह ते रायवाडी या दोन रेतीघाटादरम्यान असलेल्या महाकाय खडकाचे रेतीमाफियांनी अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे. रेती चोरी सुकर व्हावी, यासाठी हा खडक नष्ट करण्याचा सपाटा रेतीमाफियांनी चालविल्याचे जाणकारांनी सांगितले. सोबतच रेतीमाफियांनी नदीकाठी बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत उद्ध्वस्त केल्याने टेंभूरडोह गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता बळावली आहे.कन्हान नदीवरील बहुतांश रेतीघाटांचे तांत्रिक कारणांमुळे प्रशासनाने लिलाव केले नाही. शिवाय, त्या घाटामधून रेती उत्खननावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. एवढे असूनही या रेतीघाटांवर रेतीमाफियांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दरम्यान, रेतीमाफियांनी याच नदीवरील रायवाडी घाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केल्याने या रेतीघाटात रेती शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे रेतीमाफियांनी आता टेंभूरडोह रेतीघाटाला लक्ष्य केले आहे. रायवाडी व टेंभूरडोह हे दोन्ही रेतीघाट जवळजवळ असून, या घाटांच्या मध्ये नदीच्या पात्रात महाकाय खडक आहे. नदीचा प्रवाह या खडकाला अडून बाजून मार्ग काढत पुढे मार्गक्रमण करतो. टेंभुरडोह घाटातील रेती चोरी करण्यासाठी हा महाकाय खडक अडसर ठरत असल्याने रेतीमाफियांनी या खडकाचे अवैधरीत्या खोदकाम करायला सुरुवात केली आहे. सदर खोदकाम रात्रीच्यावेळी जेसीबी मशीनद्वारे केले जात आहे.हा प्रकार लक्षात येताच टेंभुरडोह येथील नागरिकांनी विरोध करायला सुरुवात केली. मात्र, रेतीमाफियांनी त्यांचा विरोध मोडीत काढला. यात स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कन्हान नदी टेंभूरडोह गावाजवळ काटकोनात वळते.नदीच्या पुराचे पाणी या खडकाला अडून त्याचा मार्ग बदलते. त्यामुळे या गावाला पुराचा फारसा धोका उद्भवत नाही. रेतीमाफियांनी हा खडक नष्ट करायला सुरुवात केल्याने तसेच नदीच्या काठी असलेली पुरापासून संरक्षण करणारी सुरक्षा भिंत उद्ध्वस्त केल्याने भविष्यात या गावाला पुराचा धोका उद्भवण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तविली आहे.मुख्यमंत्र्यांकडे तक्रारहा प्रकार महसूल विभागातील अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र, संबंधित अधिकारी हा गंभीर प्रकार गांभीर्याने घेत नसल्याने ते रेतीमाफियांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर प्रकाराची तक्रार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.