शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

मुद्दलापेक्षा जास्त व्याज वसुलीस मनाई

By admin | Updated: November 8, 2015 02:50 IST

सहकारी पतसंस्था, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका सभासदाला कर्ज देतात.

सहकार विभागाचा निर्णय : कायदेशीर कारवाई करणारनागपूर : सहकारी पतसंस्था, प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, तसेच ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँका सभासदाला कर्ज देतात. मात्र, बऱ्याचदा कर्जाची परतफेड मुदतीत न झाल्याने मुद्दलाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज वसूल केले जाते. यापुढे असे करता येणार नाही. सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी पुढाकार घेत सहकार विभागामार्फत एक परिपत्रक काढून मुद्दलाच्या रकमेपेक्षा जास्त व्याज वसुलीस करण्यास निर्बंध घातले आहे.सहकारी संस्था, जिल्हा सहकारी बँका सभासदांना कर्ज देतात. सभासद जेव्हा कर्जफेड करतो तेव्हा सभासदाने भरलेली रक्कम अगोदर व्याजाच्या खात्यात वर्ग केली जाते. त्यामुळे मुद्दलाची रक्कम तशी राहते व व्याजाचा बोजा वाढतच जातो. त्यामुळे शेतकरी सभासदांवर अन्याय होतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी एक लाख रुपयांचे कर्ज घेतले. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी एक लाखावर रक्कम जमा करूनही त्यांचे कर्ज १० ते १५ हजार रुपयांनीच कमी झाल्याची उदाहरणे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. अशा स्वरूपाच्या तक्रारीची सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली.-तर कारवाई होणार नागपूर : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ४४-अ ची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली पाहिजे यासाठी सहकार विभागाने ९ आॅक्टोबर २०१५ रोजी परिपत्रक काढून मुद्दलापेक्षा जास्त व्याज वसुलीस मनाई केली आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था आणि जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था यांनी वेळोवेळी पतसंस्था व बँका याची अंमलबजावणी करीत आहेत की नाही, याची तपासणी करावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. या नंतरही पतसंस्था किंवा बँकांकडून अशी व्याज वसुली झाल्याचे निदर्शनास आले तर संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)यांना तरतूद लागूही तरतूद सहकारी बँक व भूविकास बँकेसह सर्व संस्थांना लागू राहील.ही तरतूद सभासद संस्थांसह सर्व सभासदांनी घेतलेल्या कर्जाला लागू राहील.ही तरतूद पुनर्वसन कर्जासह १५ वर्षापर्यंत मुदतीच्या कर्जांना लागू राहील.यांना तरतूद लागू नाही१५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी दिलेले कर्ज तसेच जलसिंचन किंवा शेती विकासासाठी दिलेल्या दीर्घ मुदतीच्या कर्जांना ही तरतूद लागू राहणार नाही.कृषीतर व वाणिज्यिक प्रयोजनासाठी रुपये १० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जांना ही तरतूद लागू नाही.कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकांनी १ लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले असेल तर या कलमातील तरतूद लागू होणार नाही.