शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, १ तासांत सर्व GR काढा, मग अंतिम निर्णय सांगतो: मनोज जरांगे पाटील
3
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
4
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
5
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
6
मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी! अंतिम मसुदा घेऊन सरकारचे ४ मंत्री मनोज जरांगेंच्या भेटीला
7
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!
8
Maratha Protest: मनोज जरांगे यांच्या पत्नी आणि मुलांचाही अन्नत्याग; मुलगी म्हणाली...
9
८ वर्षांपूर्वी गायब झालेला 'रीलस्टार' पती, सतत शोध घेत होती पत्नी! आता समोर आलं धक्कादायक सत्य
10
शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा देणारी सरकारी योजना; EPF का ठरत आहे सरस? संपूर्ण गणित समजून घ्या
11
Video: आझाद मैदान परिसरात तणावाची स्थिती, आंदोलकांनी वाट अडवली; पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली
12
Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 
13
नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर
14
भाक्रा धरणापासून एअरबेसपर्यंत पाकिस्तानला दिली माहिती; प्रसिद्ध युटयूबर विरोधात आरोपपत्र दाखल
15
"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
16
'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले
17
सेबीचा नवा नियम! F&O ट्रेडिंगमध्ये १ ऑक्टोबरपासून पोझिशन लिमिट वाढणार; लहान गुंतवणूकदारांना फायदा
18
स्वार्थी ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'नंतरही भारताची अर्थव्यवस्था 'बम-बम'! ग्रोथ पाहून पंतप्रधान मोदीही खूश; स्पष्टच बोलले...
19
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
20
'या' देशात भाड्याने मिळते पत्नी; लग्न करून एकत्रही राहू शकता, पण मोजावे लागतील 'इतके' पैसे!

विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या फायली सहा महिने असतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

मंगेश व्यवहारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ...

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यासाठीचा प्रस्ताव शाळांकडून शिक्षण विभागात पाठविला जातो. शिक्षण विभागातून मंजुरीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. पण शिक्षण विभागातच सहा-सहा महिने फाईल पडून राहत असल्याने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. राज्यभरातील हे वास्तव आहे.

शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघातात, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शासन राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा लाभ मिळवून देते. पण त्यासाठी शाळांना प्रस्ताव तयार करावा लागतो. त्यात पोलीस विभागाकडून पंचनामा रिपोर्ट, शवविच्छेदनाचा अहवाल आदी कागदपत्र जोडावी लागतात. हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर शिक्षण विभाग त्यातील त्रुटी काढून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवितात. पण चित्र असे आहे की या प्रस्तावाच्या फायली सहा सहा महिने शिक्षण विभागातच धूळखात पडल्या असतात. त्याकडे कुणाचे लक्षही जात नाही. एखादा पालक जर चौकशीसाठी आला तर त्या फायलीचे स्टेटस लक्षात येते.

एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात विभागाची ही असंवेदनशीलचा पुढे आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीपासून संंबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. फायली मार्गी लागल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या, असेच उत्तर वेळोवेळी मिळायचे. अखेर विद्यार्थ्यांचे पालकच कार्यालयात पोहचले त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ती फाईल शिक्षण विभागातच पडलेली बघितली. मृत विद्यार्थ्याच्या बाबतीत झालेला हा दुर्लक्षितपणा, निष्काळजी ही असंवदेनशीलता वेदनादायी आहे. याला दोषी कोण हा भाग दुय्यम असला तरी, अशा संवेदनशील विषयांना प्राथमिकता देण्याची गरज आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आणखी किती वेळ लागेल?

पालकांच्या लक्षात ही फाईल पडून असल्याचे ध्यानात आल्यानंतर लगेच फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली. पण आता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा त्याकडे किती संवेदनशील होऊन बघते, त्यावर तात्काळ निर्णय घेते की तिथेही फाईल पुढे किती महिने पडून राहते. तिथेही पुन्हा हाच कित्ता गिरविला गेल्यास प्रशासनाकडे सामान्यजन नक्कीच बोटं दाखवतील.