शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या फायली सहा महिने असतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

मंगेश व्यवहारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ...

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यासाठीचा प्रस्ताव शाळांकडून शिक्षण विभागात पाठविला जातो. शिक्षण विभागातून मंजुरीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. पण शिक्षण विभागातच सहा-सहा महिने फाईल पडून राहत असल्याने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. राज्यभरातील हे वास्तव आहे.

शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघातात, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शासन राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा लाभ मिळवून देते. पण त्यासाठी शाळांना प्रस्ताव तयार करावा लागतो. त्यात पोलीस विभागाकडून पंचनामा रिपोर्ट, शवविच्छेदनाचा अहवाल आदी कागदपत्र जोडावी लागतात. हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर शिक्षण विभाग त्यातील त्रुटी काढून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवितात. पण चित्र असे आहे की या प्रस्तावाच्या फायली सहा सहा महिने शिक्षण विभागातच धूळखात पडल्या असतात. त्याकडे कुणाचे लक्षही जात नाही. एखादा पालक जर चौकशीसाठी आला तर त्या फायलीचे स्टेटस लक्षात येते.

एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात विभागाची ही असंवेदनशीलचा पुढे आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीपासून संंबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. फायली मार्गी लागल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या, असेच उत्तर वेळोवेळी मिळायचे. अखेर विद्यार्थ्यांचे पालकच कार्यालयात पोहचले त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ती फाईल शिक्षण विभागातच पडलेली बघितली. मृत विद्यार्थ्याच्या बाबतीत झालेला हा दुर्लक्षितपणा, निष्काळजी ही असंवदेनशीलता वेदनादायी आहे. याला दोषी कोण हा भाग दुय्यम असला तरी, अशा संवेदनशील विषयांना प्राथमिकता देण्याची गरज आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आणखी किती वेळ लागेल?

पालकांच्या लक्षात ही फाईल पडून असल्याचे ध्यानात आल्यानंतर लगेच फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली. पण आता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा त्याकडे किती संवेदनशील होऊन बघते, त्यावर तात्काळ निर्णय घेते की तिथेही फाईल पुढे किती महिने पडून राहते. तिथेही पुन्हा हाच कित्ता गिरविला गेल्यास प्रशासनाकडे सामान्यजन नक्कीच बोटं दाखवतील.