शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या विम्याच्या फायली सहा महिने असतात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

मंगेश व्यवहारे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ...

मंगेश व्यवहारे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शालेय विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पालकांना राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत ५० हजार रुपयांचा लाभ मिळतो. त्यासाठीचा प्रस्ताव शाळांकडून शिक्षण विभागात पाठविला जातो. शिक्षण विभागातून मंजुरीसाठी तो जिल्हाधिकाऱ्यांकडे जातो. पण शिक्षण विभागातच सहा-सहा महिने फाईल पडून राहत असल्याने मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना त्याचा लाभ मिळणे कठीण झाले आहे. राज्यभरातील हे वास्तव आहे.

शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अपघातात, सर्पदंशाने मृत्यू झाल्यास शासन राजीव गांधी अपघात विमा योजनेंतर्गत त्याच्या पालकांना ५० हजार रुपयांचा लाभ मिळवून देते. पण त्यासाठी शाळांना प्रस्ताव तयार करावा लागतो. त्यात पोलीस विभागाकडून पंचनामा रिपोर्ट, शवविच्छेदनाचा अहवाल आदी कागदपत्र जोडावी लागतात. हा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविल्यानंतर शिक्षण विभाग त्यातील त्रुटी काढून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवितात. पण चित्र असे आहे की या प्रस्तावाच्या फायली सहा सहा महिने शिक्षण विभागातच धूळखात पडल्या असतात. त्याकडे कुणाचे लक्षही जात नाही. एखादा पालक जर चौकशीसाठी आला तर त्या फायलीचे स्टेटस लक्षात येते.

एका विद्यार्थ्याच्या प्रकरणात विभागाची ही असंवेदनशीलचा पुढे आली आहे. यासंदर्भात लोकप्रतिनिधीपासून संंबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. फायली मार्गी लागल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्या, असेच उत्तर वेळोवेळी मिळायचे. अखेर विद्यार्थ्यांचे पालकच कार्यालयात पोहचले त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी ती फाईल शिक्षण विभागातच पडलेली बघितली. मृत विद्यार्थ्याच्या बाबतीत झालेला हा दुर्लक्षितपणा, निष्काळजी ही असंवदेनशीलता वेदनादायी आहे. याला दोषी कोण हा भाग दुय्यम असला तरी, अशा संवेदनशील विषयांना प्राथमिकता देण्याची गरज आहे.

आता जिल्हाधिकाऱ्यांकडून आणखी किती वेळ लागेल?

पालकांच्या लक्षात ही फाईल पडून असल्याचे ध्यानात आल्यानंतर लगेच फाईल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आली. पण आता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा त्याकडे किती संवेदनशील होऊन बघते, त्यावर तात्काळ निर्णय घेते की तिथेही फाईल पुढे किती महिने पडून राहते. तिथेही पुन्हा हाच कित्ता गिरविला गेल्यास प्रशासनाकडे सामान्यजन नक्कीच बोटं दाखवतील.