शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाचा इजा, बिजा अन् अखेर विजयाचा तिजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवत अभिजित वंजारी यांनी अनोखा इतिहास रचला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवत अभिजित वंजारी यांनी अनोखा इतिहास रचला आहे. मागील पाच दशकांहून अधिक कालावधीपासून भाजपचा वरचष्मा राहिलेल्या मतदारसंघात वंजारी यांनी भाजप उमेदवाराला धूळ चारली आहे. मात्र वंजारी यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. दोन वेळा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली होती व त्यात पराभवाचा सामना केल्यानंतर तिसऱ्या प्रयत्नांत ते विधान परिषदेत पोहोचले आहेत.

४७ वर्षीय वंजारी यांनी याअगोदर दोन विधानसभा निवडणुकांसह महानगरपालिकेची एक निवडणूक लढविली होती. नागपुरात त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. वडील गोविंदराव वंजारी हे राजकीय क्षेत्रातच असल्याने वंजारी यांच्यावर लहानपणापासूनच राजकीय संस्कार झाले. गोविंदराव वंजारी आमदारदेखील होते. अभिजित यांनी १९८८ ते २००२ पर्यंत एनएसयूआयचे सरचिटणीस म्हणून कामदेखील पाहिले. २००५ च्या निवडणुकीत वंजारी यांना मोठा धक्का बसला. त्यांचे वडील गोविंदराव वंजारी यांचा दक्षिण नागपुरातून विजय झाला. परंतु निकालानंतर शपथ घेण्याअगोदरच त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

पोटनिवडणुकीत वंजारी यांनी पक्षाला तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्याने वंजारी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यांना यश मिळू शकले नाही व त्यांनी परत काँग्रेसमध्ये घरवापसी केली. पक्षसंघटनेत वंजारी यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या.

२०१४ मध्ये त्यांनी पूर्व नागपूरातून निवडणूक लढविली. त्यात भाजपचे कृष्णा खोपडे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. मागील दोन वर्षांपासून वंजारी यांनी पूर्ण लक्ष पदवीधरच्या निवडणुकीवर केंद्रित केले होते.

विद्यापीठात लक्षणीय कामगिरी

अभिजित वंजारी यांनी शिक्षणक्षेत्रात कार्य सुरू ठेवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभा तसेच व्यवस्थापन परिषदेचे ते सदस्य होते. या कालावधीत त्यांनी या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली व अनेकदा विद्यार्थी हितासाठी प्रशासनाविरोधात भूमिकादेखील घेतली.

तायवाडे यांच्या कामाचादेखील फायदा

पदवीधरच्या २००८ व २०१४ च्या निवडणुकीत नितीन गडकरी व अनिल सोले यांच्याविरोधात काँग्रेसकडून डॉ. बबन तायवाडे यांनी निवडणूक लढविली होती. त्यांना दोन्ही वेळा यश मिळाले नाही, मात्र त्यांनी समर्थकांची मोट निश्चित बांधली होती. वंजारी यांना त्याचादेखील मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला.