शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

माहिती आयोग ‘प्रभारी’ भरोसे

By admin | Updated: November 8, 2016 02:41 IST

राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका

सात खंडपीठांची जबाबदारी चार आयुक्तांवर : प्रलंबित प्रकरणांची संख्या वेगाने वाढतेय योगेश पांडे ल्ल नागपूर राज्यात माहितीच्या अधिकाराची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य माहिती आयोगाची मौलिक भूमिका आहे. मात्र राज्यातील सर्व खंडपीठांच्या माहिती आयुक्तांवर कामाचा प्रचंड ताण आला आहे. राज्यातील सात विभागांची जबाबदारी चार माहिती आयुक्त सांभाळत असून तीन विभागांत ‘प्रभारी’ भरोसे कामकाज सुरू आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आयोगातील प्रलंबित प्रकरणांची संख्या सातत्याने वाढतेच आहे. अवघ्या सात महिन्यांत प्रलंबित प्रकरणांची संख्या १० हजारांनी वाढली आहे. माहिती अधिकार कायद्याची राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करणे हे आव्हानच बनले आहे. राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय मिळून एकूण आठ विभाग असून प्रत्येक ठिकाणी माहिती आयुक्तांचे पद आहे. राज्य माहिती आयोगाचे बृहन्मुंबई खंडपीठ, कोकण खंडपीठ, पुणे खंडपीठ व नागपूर खंडपीठ येथे नियमित माहिती आयुक्त होते. उर्वरित अमरावती खंडपीठ, नाशिक खंडपीठ व औरंगाबाद खंडपीठ येथे पूर्णवेळ माहिती आयुक्तांची नियुक्ती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र २४ आॅक्टोबर रोजी राज्य माहिती आयुक्तांच्या कामकाजाचे पुनर्वाटप करण्यात आले. यात एकाही नवीन पूर्णवेळ माहिती आयुक्तांची नियुक्ती झाली तर नाहीच, शिवाय तीन माहिती आयुक्तांचे खंडपीठ बदलण्यात आले. या पुनर्वाटपानंतर माहिती आयुक्तांचा भार किंचितही कमी झालेला नाही. एकाच वेळी दोन खंडपीठांची जबाबदारी असल्यामुळे माहिती आयुक्तांना सुरळीतपणे काम करता येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे प्रलंबित तक्रारींची संख्या कमी कशी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील प्रलंबित प्रकरणे विभाग प्रलंबित अपील/तक्रारी फेब्रुवारी १६ सप्टेंबर १६ मुख्यालय ३२१ ९७० बृहन्मुंबई २,५५७ २,०५५ कोकण ५,०८२ ५,७७९ पुणे ७,६७२ ८,७८७ औरंगाबाद ३,३६९ ५,३२४ नाशिक ६,४०५ ८,९०० नागपूर ८८६ १,१५५ अमरावती ६,६४९ ९,५७८ एकूण ३२,९४१ ४२,५४८