शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

कोरोनाकाळात महागाईचा तडका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून ...

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून गहू व तांदळाची आवक बंद असल्याने स्थानिक बाजारात किमती अतोनात वाढल्या आहेत. यासोबतच भाज्या व फळांच्या किमतींतही वाढ झाली आहे. पुरवठा कमी होत असल्याने किराणा दुकानदारांनाही मालाच्या किमती वाढविल्या आहेत. संकटसमयी उत्पन्न कमी झाले असताना महागाईने नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.

खाद्यतेल व धान्य महागले

खाद्यतेल, धान्य आणि डाळींच्या दरवाढीचा फटका गरीब व सामान्यांना बसत आहे. सोयाबीन तेल १६० रुपये किलो. तूरडाळ ११० रुपये, एमपी बोट गहू २८ ते ४० रुपये, तांदूळ दर्जानुसार ३५ ते ६० रुपये किलो आहे. एमपी बोट गव्हाचे भाव आवकीअभावी अचानक वाढले आहेत. देशात बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने मालाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात माल येत नाही.

भाज्या, फळांच्या किमतीत वाढ

भाजी बाजारात टोमॅटो, कच्चे आंबे, लिंबूकरिताही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ‘व्हिटॅमिन सी’ची मागणी वाढल्याने लिंबू, कच्चे आंबे, मोसंबी जास्त दरात विकली जात आहेत. एक वा दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता पाच रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव ४० रुपयांवर गेले आहे. साप्ताहिक बाजार बंद असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला सकाळी ८ ते ११ पर्यंत बाजार भरतो. या बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळते. याशिवाय ईदमुळे फळांची मागणी वाढली आहे. सफरचंद, पपई, मोसंबी या फळांच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. सफरचंद २२० रुपये किलो आहे. मोसंबी १३० रुपये किलो, पपई ५० रुपये किलो विकली जात आहेत. टरबूज आणि खरबूजची आवक चांगली असल्याने भाव आटोक्यात आहेत.

ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, काही किराणा दुकानदारांनी साठेबाजी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अतोनात वाढविल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. साठेबाजांवर नियंत्रण आणण्यास मालाच्या किमती कमी होतील; पण अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. मुख्यत्वे अर्थव्यवहार हे मुख्य कारण असू शकते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे. अशा संकटकाळात व्यापाऱ्यांनी अतिरिक्त नफा कमवू नये, असे पांडे म्हणाले.