शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोरोनाकाळात महागाईचा तडका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून ...

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून गहू व तांदळाची आवक बंद असल्याने स्थानिक बाजारात किमती अतोनात वाढल्या आहेत. यासोबतच भाज्या व फळांच्या किमतींतही वाढ झाली आहे. पुरवठा कमी होत असल्याने किराणा दुकानदारांनाही मालाच्या किमती वाढविल्या आहेत. संकटसमयी उत्पन्न कमी झाले असताना महागाईने नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.

खाद्यतेल व धान्य महागले

खाद्यतेल, धान्य आणि डाळींच्या दरवाढीचा फटका गरीब व सामान्यांना बसत आहे. सोयाबीन तेल १६० रुपये किलो. तूरडाळ ११० रुपये, एमपी बोट गहू २८ ते ४० रुपये, तांदूळ दर्जानुसार ३५ ते ६० रुपये किलो आहे. एमपी बोट गव्हाचे भाव आवकीअभावी अचानक वाढले आहेत. देशात बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने मालाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात माल येत नाही.

भाज्या, फळांच्या किमतीत वाढ

भाजी बाजारात टोमॅटो, कच्चे आंबे, लिंबूकरिताही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ‘व्हिटॅमिन सी’ची मागणी वाढल्याने लिंबू, कच्चे आंबे, मोसंबी जास्त दरात विकली जात आहेत. एक वा दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता पाच रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव ४० रुपयांवर गेले आहे. साप्ताहिक बाजार बंद असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला सकाळी ८ ते ११ पर्यंत बाजार भरतो. या बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळते. याशिवाय ईदमुळे फळांची मागणी वाढली आहे. सफरचंद, पपई, मोसंबी या फळांच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. सफरचंद २२० रुपये किलो आहे. मोसंबी १३० रुपये किलो, पपई ५० रुपये किलो विकली जात आहेत. टरबूज आणि खरबूजची आवक चांगली असल्याने भाव आटोक्यात आहेत.

ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, काही किराणा दुकानदारांनी साठेबाजी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अतोनात वाढविल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. साठेबाजांवर नियंत्रण आणण्यास मालाच्या किमती कमी होतील; पण अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. मुख्यत्वे अर्थव्यवहार हे मुख्य कारण असू शकते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे. अशा संकटकाळात व्यापाऱ्यांनी अतिरिक्त नफा कमवू नये, असे पांडे म्हणाले.