शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कोरोनाकाळात महागाईचा तडका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:08 IST

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून ...

नागपूर : कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तूंसह धान्य, डाळी आणि खाद्यतेलांचे भाव आकाशाला भिडल्याने गरीब आणि सर्वसामान्य त्रस्त आहेत. मध्य प्रदेशातून गहू व तांदळाची आवक बंद असल्याने स्थानिक बाजारात किमती अतोनात वाढल्या आहेत. यासोबतच भाज्या व फळांच्या किमतींतही वाढ झाली आहे. पुरवठा कमी होत असल्याने किराणा दुकानदारांनाही मालाच्या किमती वाढविल्या आहेत. संकटसमयी उत्पन्न कमी झाले असताना महागाईने नागरिक त्रस्त आहेत. वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याची नागरिकांची मागणी आहे.

खाद्यतेल व धान्य महागले

खाद्यतेल, धान्य आणि डाळींच्या दरवाढीचा फटका गरीब व सामान्यांना बसत आहे. सोयाबीन तेल १६० रुपये किलो. तूरडाळ ११० रुपये, एमपी बोट गहू २८ ते ४० रुपये, तांदूळ दर्जानुसार ३५ ते ६० रुपये किलो आहे. एमपी बोट गव्हाचे भाव आवकीअभावी अचानक वाढले आहेत. देशात बहुतांश राज्यांमध्ये लॉकडाऊन असल्याने मालाची आवक कमी आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात माल येत नाही.

भाज्या, फळांच्या किमतीत वाढ

भाजी बाजारात टोमॅटो, कच्चे आंबे, लिंबूकरिताही जास्त पैसे मोजावे लागत आहेत. ‘व्हिटॅमिन सी’ची मागणी वाढल्याने लिंबू, कच्चे आंबे, मोसंबी जास्त दरात विकली जात आहेत. एक वा दोन रुपयांना मिळणारे लिंबू आता पाच रुपयांवर पोहोचले आहेत. टोमॅटोचे भाव ४० रुपयांवर गेले आहे. साप्ताहिक बाजार बंद असल्याने शहरात रस्त्याच्या कडेला सकाळी ८ ते ११ पर्यंत बाजार भरतो. या बाजारात सर्वत्र गर्दी पाहायला मिळते. याशिवाय ईदमुळे फळांची मागणी वाढली आहे. सफरचंद, पपई, मोसंबी या फळांच्या किमतींत दुपटीने वाढ झाली आहे. सफरचंद २२० रुपये किलो आहे. मोसंबी १३० रुपये किलो, पपई ५० रुपये किलो विकली जात आहेत. टरबूज आणि खरबूजची आवक चांगली असल्याने भाव आटोक्यात आहेत.

ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत सचिव गजानन पांडे म्हणाले, काही किराणा दुकानदारांनी साठेबाजी करून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अतोनात वाढविल्या आहेत. खाद्यतेलाच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. साठेबाजांवर नियंत्रण आणण्यास मालाच्या किमती कमी होतील; पण अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाहीत. याची कारणेही वेगवेगळी आहेत. मुख्यत्वे अर्थव्यवहार हे मुख्य कारण असू शकते. कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेकांचे उत्पन्नाचे साधन हिरावले गेले आहे. अशा संकटकाळात व्यापाऱ्यांनी अतिरिक्त नफा कमवू नये, असे पांडे म्हणाले.