शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

-तर उद्योजक रस्त्यावर उतरतील

By admin | Updated: July 11, 2016 02:39 IST

औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, ...

नेत्यांच्या जन्मदिनाच्या नावावर वर्गणीरूपी खंडणी : कंपन्या त्रस्तनागपूर : औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, महिला कामगारांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात परिसरातील आरक्षित जागेत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. यामुळे औद्योगिक परिसर असुरक्षित झाला आहे. उद्योजक आणि कामगारांना असंख्य अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योजक, मालक व व्यवस्थापकावर जबरदस्ती आणि गुंडगिरीच्या बळावर खंडणी किंवा हप्ता वसूल केला जात आहे. यावर नियंत्रण न आणल्यास उद्योजक व व्यापारी रस्त्यावर उतरतील, अशी प्रतिक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.उद्योजकांना ‘टार्गेट’ करणे चुकीचेबुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, सर्वच खंडणीखोर कोणत्या तरी पक्षांशी जुळलेले असतात. त्यांच्या नेत्यांचा जन्मदिन असला की वृत्तपत्रात जाहिरात, रक्तदान शिबिर वा अन्य कार्यक्रमाकरिता वर्गणीसाठी उद्योजकांना टार्गेट करतात. कार्यकर्त्यांना दम देण्याची त्या त्या पक्षांच्या नेत्यांची नैतिक जबाबदारी असते. पण नेतेही कार्यकर्त्यांच्या कृत्यावर आळा घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देतात. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यास ते सुद्धा कारवाई करीत नाही. अशा सर्व प्रकारात उद्योजकांना चुप्पी साधावी लागते. बुटीबोरीत कार्यकर्त्यांची भरमार आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते लहानसहान कारणांकरिता वर्गणी मागण्यासाठी उद्योजकांशी संपर्क साधतात. बहुतांश वेळी ते कायदा हातात घेतात. हे चुकीचे आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पोषक वातावरण राहावेपोषक वातावरण राहिल्यास नवीन उद्योग येतील आणि रोजगाराची द्वारे खुली होतील. अशा प्रकारामुळे औद्योगिक परिसराची बदनामी होते. त्यामुळेच उद्योजक विस्तारीकरणासाठी मागे-पुढे पाहतात. विविध पक्षांच्या संघटनांमुळे बुटीबोरी येथील इंडोरामाने आपले दोन विस्तारित युनिट बाहेर नेले. त्यामुळे त्यावर आधारित छोटे पॅकेजिंग उद्योग बंद पडले. शिवाय नवीन विस्तारित प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास २५०० युवकांना रोजगार मिळाला नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास बुटीबोरी औद्योगिक परिसरात सीएट कंपनीचा प्रकल्प तीन महिन्यांपूर्वी सुरू झाला. सध्या २० टक्केच उत्पादन सुरू झाले आहे. या काळातच विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या संघटनांचे बोर्ड कारखान्यावर लावले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन आणि एचआर व्यवस्थापक त्रस्त आहे. जवळपास ४०० कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प तीन टप्प्यात उभा राहणार आहे. कारखाना सुरू होताच संघटनांचा त्रास होऊ लागल्याने पुढे विस्तार होईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे युवकांना रोजगार मिळणार नाही आणि ‘मेक इन इंडिया’चे ध्येय साध्य होणार नाही. अशा घटनांवर वेळीच आळा घातल्यास या परिसराचा विकास होईल, अन्यथा उद्योजकांना रस्त्यावर यावे लागेल, असे लोणकर यांनी सांगितले.