शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

-तर उद्योजक रस्त्यावर उतरतील

By admin | Updated: July 11, 2016 02:39 IST

औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, ...

नेत्यांच्या जन्मदिनाच्या नावावर वर्गणीरूपी खंडणी : कंपन्या त्रस्तनागपूर : औद्योगिक क्षेत्रात आणि व्यावसायिक भागांत कामगारांना मारहाण, लूट, उद्योजकांकडून खंडणीची मागणी, कंपनीतून साहित्याची चोरी, महिला कामगारांची छेडछाड असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात परिसरातील आरक्षित जागेत मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसल्या आहेत. यामुळे औद्योगिक परिसर असुरक्षित झाला आहे. उद्योजक आणि कामगारांना असंख्य अडचणी आणि समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उद्योजक, मालक व व्यवस्थापकावर जबरदस्ती आणि गुंडगिरीच्या बळावर खंडणी किंवा हप्ता वसूल केला जात आहे. यावर नियंत्रण न आणल्यास उद्योजक व व्यापारी रस्त्यावर उतरतील, अशी प्रतिक्रिया उद्योजक व व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली.उद्योजकांना ‘टार्गेट’ करणे चुकीचेबुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर यांनी सांगितले की, सर्वच खंडणीखोर कोणत्या तरी पक्षांशी जुळलेले असतात. त्यांच्या नेत्यांचा जन्मदिन असला की वृत्तपत्रात जाहिरात, रक्तदान शिबिर वा अन्य कार्यक्रमाकरिता वर्गणीसाठी उद्योजकांना टार्गेट करतात. कार्यकर्त्यांना दम देण्याची त्या त्या पक्षांच्या नेत्यांची नैतिक जबाबदारी असते. पण नेतेही कार्यकर्त्यांच्या कृत्यावर आळा घालण्याऐवजी त्यांना प्रोत्साहन देतात. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यास ते सुद्धा कारवाई करीत नाही. अशा सर्व प्रकारात उद्योजकांना चुप्पी साधावी लागते. बुटीबोरीत कार्यकर्त्यांची भरमार आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते लहानसहान कारणांकरिता वर्गणी मागण्यासाठी उद्योजकांशी संपर्क साधतात. बहुतांश वेळी ते कायदा हातात घेतात. हे चुकीचे आहे. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. पोषक वातावरण राहावेपोषक वातावरण राहिल्यास नवीन उद्योग येतील आणि रोजगाराची द्वारे खुली होतील. अशा प्रकारामुळे औद्योगिक परिसराची बदनामी होते. त्यामुळेच उद्योजक विस्तारीकरणासाठी मागे-पुढे पाहतात. विविध पक्षांच्या संघटनांमुळे बुटीबोरी येथील इंडोरामाने आपले दोन विस्तारित युनिट बाहेर नेले. त्यामुळे त्यावर आधारित छोटे पॅकेजिंग उद्योग बंद पडले. शिवाय नवीन विस्तारित प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास २५०० युवकांना रोजगार मिळाला नाही. उदाहरण द्यायचे झाल्यास बुटीबोरी औद्योगिक परिसरात सीएट कंपनीचा प्रकल्प तीन महिन्यांपूर्वी सुरू झाला. सध्या २० टक्केच उत्पादन सुरू झाले आहे. या काळातच विविध पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या संघटनांचे बोर्ड कारखान्यावर लावले आहेत. त्यामुळे व्यवस्थापन आणि एचआर व्यवस्थापक त्रस्त आहे. जवळपास ४०० कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प तीन टप्प्यात उभा राहणार आहे. कारखाना सुरू होताच संघटनांचा त्रास होऊ लागल्याने पुढे विस्तार होईल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे युवकांना रोजगार मिळणार नाही आणि ‘मेक इन इंडिया’चे ध्येय साध्य होणार नाही. अशा घटनांवर वेळीच आळा घातल्यास या परिसराचा विकास होईल, अन्यथा उद्योजकांना रस्त्यावर यावे लागेल, असे लोणकर यांनी सांगितले.