शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
3
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
4
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
5
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
6
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
7
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
8
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
9
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
10
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
11
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
12
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
13
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
14
छत्रपतींच्या किल्ल्यांकडे पाहण्याची नजर आता बदलेल?
15
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
16
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
17
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
18
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
19
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
20
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर

इंडस पेपर मिलला लागलेली आग २४ तासानंतर नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात ...

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली. इंडस पेपर मिलला यापूर्वी ३ एप्रिल २०१८ रोजी भीषण आग लागली होती. यापूर्वी आग लागूनही आवश्यक उपायोजना न करण्यात आल्याने या पेपर मिलला पुन्हा आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

कोंढाळी, बाजारगाव, सातनवरी भागात अनेक पेपर मिल्स आहेत. पेपर मिलला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना होतात. पेपर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वेस्ट कागदाचा उपयोग करण्यात येतो. वेस्ट कागदाला मोठमोठ्या टाकीत सडवून त्याचा पल्प तयार करून त्यापासून पुन्हा कागद तयार करण्यात येतो. भारतातील वेस्ट कागदापेक्षा विदेशातील आयातीत वेस्ट पेपर स्वस्त पडतो. म्हणून पेपर मिल विदेशातून वेस्ट पेपरची आयात करतात. विदेशातून आयातीत वेस्ट पेपरमध्ये काही रसायन लागले असल्यास उन्हात विशिष्ट तापमानात हे कागद पेट घेतात. त्यामुळे पेपर मिलला आग लागण्याच्या घटना घडतात.

कोंढाळी व बाजारगाव येथील पेपर मिल पॅकिंगकरिता उपयोगात येणारा ब्राऊन क्राफ्ट पेपर तयार करतात. सातनवरी शिवारातील इंडस पेपर मिलमध्ये मात्र टिश्यू पेपर व कागदाचे पेपर नॅपकिंन, किचन टॉवेलचे जवळपास दररोज ४० ते ५० टन उत्पादन केले जाते.

इंडस पेपर मिलला दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच कोटींचे नुकसान झाले होते. यानंतरही कंपनी परिसरात आग विझविण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच पेपर मिलच्या बाजूला रोड आहे. या रोडवर परिसरातील लोकांची ये-जा असते. मात्र या भागात संरक्षण भिंत नाही. फक्त तारांचे कुंपण आहे. वेस्ट कागदाचा माल उघड्यावर पडला असतो. एखाद्याने बिडी-सिगारेट पिऊन फेकली तरी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी ४.१५ वाजता कंपनी परिसरात लागली. आग इतकी भीषण होती की ५ कि.मी. अंतरापासून आगीचे लोळ दिसत होते. आग लागताच कंपनीचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण एकदा कागदाला लागलेली आग विझविणे कठीण असते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाची पहिली गाडी आली नंतर कळमेश्वर, हिंगणा, सोलार, वाडी येथील अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. मात्र आग अद्यापही विझली नाही. कारण कागदाचे गठ्ठे आतून पेटतच असतात. जेसीबीने गठ्ठे बाहेर खेचून पाण्याचा सतत मारा केला जात आहे.