शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

इंडस पेपर मिलला लागलेली आग २४ तासानंतर नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात ...

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली. इंडस पेपर मिलला यापूर्वी ३ एप्रिल २०१८ रोजी भीषण आग लागली होती. यापूर्वी आग लागूनही आवश्यक उपायोजना न करण्यात आल्याने या पेपर मिलला पुन्हा आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

कोंढाळी, बाजारगाव, सातनवरी भागात अनेक पेपर मिल्स आहेत. पेपर मिलला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना होतात. पेपर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वेस्ट कागदाचा उपयोग करण्यात येतो. वेस्ट कागदाला मोठमोठ्या टाकीत सडवून त्याचा पल्प तयार करून त्यापासून पुन्हा कागद तयार करण्यात येतो. भारतातील वेस्ट कागदापेक्षा विदेशातील आयातीत वेस्ट पेपर स्वस्त पडतो. म्हणून पेपर मिल विदेशातून वेस्ट पेपरची आयात करतात. विदेशातून आयातीत वेस्ट पेपरमध्ये काही रसायन लागले असल्यास उन्हात विशिष्ट तापमानात हे कागद पेट घेतात. त्यामुळे पेपर मिलला आग लागण्याच्या घटना घडतात.

कोंढाळी व बाजारगाव येथील पेपर मिल पॅकिंगकरिता उपयोगात येणारा ब्राऊन क्राफ्ट पेपर तयार करतात. सातनवरी शिवारातील इंडस पेपर मिलमध्ये मात्र टिश्यू पेपर व कागदाचे पेपर नॅपकिंन, किचन टॉवेलचे जवळपास दररोज ४० ते ५० टन उत्पादन केले जाते.

इंडस पेपर मिलला दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच कोटींचे नुकसान झाले होते. यानंतरही कंपनी परिसरात आग विझविण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच पेपर मिलच्या बाजूला रोड आहे. या रोडवर परिसरातील लोकांची ये-जा असते. मात्र या भागात संरक्षण भिंत नाही. फक्त तारांचे कुंपण आहे. वेस्ट कागदाचा माल उघड्यावर पडला असतो. एखाद्याने बिडी-सिगारेट पिऊन फेकली तरी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी ४.१५ वाजता कंपनी परिसरात लागली. आग इतकी भीषण होती की ५ कि.मी. अंतरापासून आगीचे लोळ दिसत होते. आग लागताच कंपनीचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण एकदा कागदाला लागलेली आग विझविणे कठीण असते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाची पहिली गाडी आली नंतर कळमेश्वर, हिंगणा, सोलार, वाडी येथील अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. मात्र आग अद्यापही विझली नाही. कारण कागदाचे गठ्ठे आतून पेटतच असतात. जेसीबीने गठ्ठे बाहेर खेचून पाण्याचा सतत मारा केला जात आहे.