शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

इंडस पेपर मिलला लागलेली आग २४ तासानंतर नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:14 IST

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात ...

कोंढाळी : नागपूर-अमरावती महामार्गावरील सातनवरी नजीकच्या इंडस पेपर मिलला लागलेली भीषण आग अखेर मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आली. इंडस पेपर मिलला यापूर्वी ३ एप्रिल २०१८ रोजी भीषण आग लागली होती. यापूर्वी आग लागूनही आवश्यक उपायोजना न करण्यात आल्याने या पेपर मिलला पुन्हा आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

कोंढाळी, बाजारगाव, सातनवरी भागात अनेक पेपर मिल्स आहेत. पेपर मिलला उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना होतात. पेपर तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून वेस्ट कागदाचा उपयोग करण्यात येतो. वेस्ट कागदाला मोठमोठ्या टाकीत सडवून त्याचा पल्प तयार करून त्यापासून पुन्हा कागद तयार करण्यात येतो. भारतातील वेस्ट कागदापेक्षा विदेशातील आयातीत वेस्ट पेपर स्वस्त पडतो. म्हणून पेपर मिल विदेशातून वेस्ट पेपरची आयात करतात. विदेशातून आयातीत वेस्ट पेपरमध्ये काही रसायन लागले असल्यास उन्हात विशिष्ट तापमानात हे कागद पेट घेतात. त्यामुळे पेपर मिलला आग लागण्याच्या घटना घडतात.

कोंढाळी व बाजारगाव येथील पेपर मिल पॅकिंगकरिता उपयोगात येणारा ब्राऊन क्राफ्ट पेपर तयार करतात. सातनवरी शिवारातील इंडस पेपर मिलमध्ये मात्र टिश्यू पेपर व कागदाचे पेपर नॅपकिंन, किचन टॉवेलचे जवळपास दररोज ४० ते ५० टन उत्पादन केले जाते.

इंडस पेपर मिलला दोन वर्षापूर्वी लागलेल्या आगीत जवळपास चार ते पाच कोटींचे नुकसान झाले होते. यानंतरही कंपनी परिसरात आग विझविण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या नाही. तसेच पेपर मिलच्या बाजूला रोड आहे. या रोडवर परिसरातील लोकांची ये-जा असते. मात्र या भागात संरक्षण भिंत नाही. फक्त तारांचे कुंपण आहे. वेस्ट कागदाचा माल उघड्यावर पडला असतो. एखाद्याने बिडी-सिगारेट पिऊन फेकली तरी आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सोमवारी ४.१५ वाजता कंपनी परिसरात लागली. आग इतकी भीषण होती की ५ कि.मी. अंतरापासून आगीचे लोळ दिसत होते. आग लागताच कंपनीचे कर्मचारी व स्थानिक लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण एकदा कागदाला लागलेली आग विझविणे कठीण असते. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर महानगरपालिका अग्निशमन दलाची पहिली गाडी आली नंतर कळमेश्वर, हिंगणा, सोलार, वाडी येथील अग्निशमन दलाच्या सात गाड्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आली. मात्र आग अद्यापही विझली नाही. कारण कागदाचे गठ्ठे आतून पेटतच असतात. जेसीबीने गठ्ठे बाहेर खेचून पाण्याचा सतत मारा केला जात आहे.