शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जिल्हा परिषद सदस्यांची वाढली धाकधूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:07 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यावर जायला नको, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी दिला. तसेच निवडणुकीमध्ये ओबीसी ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांचे आरक्षण ५० टक्क्यावर जायला नको, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुरुवारी दिला. तसेच निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण हे ५० टक्क्यात बसविण्याचा निर्देश राज्य सरकारला दिला. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गातून जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांना चांगलाच धक्का बसला. ५८ सदस्यांच्या नागपूर जिल्हा परिषदेत एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जात आहे. यात नामप्रचे १६ सदस्य असून, आरक्षण ५० टक्क्यात बसविण्यासाठी १६ पैकी ४ सदस्यांवर टांगती तलवार आहे. सरकार फेरनिवडणुका घेतील, ईश्वरचिठ्ठीने ४ सदस्य अतिरिक्त ठरविले जातील किंवा नामप्रच्या १६ जागांसाठीच निवडणुका होतील, असे वेगवेगळे तर्क लावण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे सदस्यांमध्ये चांगलाच संभ्रम आहे.

साडेसात वर्षांनंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून डिसेंबर २०१९ ला घेण्यात आल्या. ५८ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत निवडणुकीपूर्वी जे आरक्षण काढण्यात आले त्यात अनुसूचित जातीचे १०, जमातीचे ७ आणि नामप्र प्रवर्गात १६ सदस्य, असे आरक्षण काढण्यात आले. ही आकडेवारी ५० टक्के आरक्षणापेक्षा जास्त आहे. त्यामुळे जि.प.च्या माजी सदस्यांनी आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यावर जात असल्याने न्यायालयात याचिका दखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात ओबीसीकरिता असलेल्या २७ टक्क्याच्या आधारेच जागा निश्चित करून निवडणुका घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले. नागपूर जिल्हा परिषदमध्ये ५८ जागा असून, १६ जागा ओबीसीकरिता होत्या. आरक्षणानुसार ओबीसी प्रवर्गातील ४ जागा अतिरिक्त ठरतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सदस्यांमध्ये चांगलीच भीतीचे वातावरण आहे. सर्व १६ जागांवर निवडणूक लागते की ४ जागांवर निवडणूक लागते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. याचसंदर्भात शुक्रवारी जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आले होते. नेमके काय होईल, सर्वांमध्ये संभ्रम आहे. काही सदस्यांनी कायदेतज्ज्ञांचाही सल्ला घेतला.

- नामप्रमध्ये जि.प.तील दिग्गजांचा समावेश

नामप्र प्रवर्गात जिल्हा परिषदेतील तीनही पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे गटनेते व जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे हे केळवद सर्कलमधून, राष्ट्रवादीचे गटनेते चंद्रशेखर कोल्हे हे पारडसिंगा सर्कलमधून व भाजपाचे सदस्य व विरोधी पक्षनेते अनिल निधान हे गुमथळा सर्कलमधून निवडून आले आहेत. शेकापचे सदस्य समीर उमप, वडोदा सर्कलच्या अवंतिका लेकुरवाळे यांचा समावेश आहे. यातून बहुतांश सदस्य हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत.

- सदस्यांची नाराजी

निवडणूक होऊन वर्ष झाले आहे. त्यातच कोरोनामुळे अर्धे वर्ष वाया गेले. आता कुठे जिल्हा परिषद स्थिरसावर व्हायला लागली होती. अशात पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला. या निर्णयामुळे ओबीसी प्रवर्गाच्या सदस्यांवर टांगती तलवार ठेवली आहे. सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढे काय जो निर्णय होईल त्याला सामोरे जाऊ, अशी खंत सदस्यांनी व्यक्त केली.

- मुळात प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असताना निवडणुका घेतल्या गेल्या. यात सदस्यांचा व मतदारांचा काय दोष. ही संपूर्ण जबाबदारी शासन, निवडणूक अधिकाऱ्यांची आहे. निवडणुका होऊन वर्ष झाले असताना हा निर्णय आला आहे. हा तिढा संपवायचा असेल तर ओबीसीची स्वतंत्र जनगनणा व्हायला पाहिजे.

नितीन चौधरी, मुख्य संयोजक, ओबीसी मुक्ती मोर्चा