शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

काटाेल तालुक्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : कृषी विभागाने काटाेल तालुक्याचे खरीप पीक नियाेजन नुकतेच जाहीर केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : कृषी विभागाने काटाेल तालुक्याचे खरीप पीक नियाेजन नुकतेच जाहीर केले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तालुक्यातील कपाशीचे लागवड क्षेत्र तीन हजार हेक्टरने वाढले असून, साेयाबीनचे पेरणी क्षेत्र मात्र ४,८५५ हेक्टरने कमी झाले आहे. दुसरीकडे, साेयाबीनच्या बियाण्यांची मागणी वाढली असून, बाजारात तुटवडा निर्माण झाल्याने कंपन्यांसाेबतच घरगुती बियाण्यांच्याही किमतीही वाढल्या आहेत.

मागील काही वर्षापासून किडी व राेगांचा प्रादुर्भाव तसेच प्रतिकूल वातावरणामुळे साेयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट येत आहे. त्यातच साेयाबीनला भावदेखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी साेयाबीनच्या पिकाला पर्याय म्हणून कपाशीला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. सन २०२०-२१ च्या खरीप हंगामात २६,००२ हेक्टरमध्ये नियाेजन करण्यात आले हाेते. हे क्षेत्र चालू हंगामात २९,००० हेक्टर करण्यात आले आहे. सन २०२०-२१ च्या हंगामात १४,८५५ हेक्टरमध्ये साेयाबीन पिकाचे नियाेजन केले हाेते. ते यावर्षी १०,००० हेक्टरवर आले आहे. याशिवाय भुईमुगाचे क्षेत्र ७९४ हेक्टरने वाढले आहे. मागील हंगामात ते ४०६ हेक्टर हाेते तर, चालू हंगामात १,२०० हेक्टरचे नियाेजन करण्यात आले आहे.

उत्पादन खर्च कमी असल्याने पूर्वी शेतकरी साेयाबीनच्या पिकाला प्रथम प्राधान्य द्यायचे. मात्र, काही वर्षांपासून चित्र पालटले आहे. साेयाबीनच्या उत्पादनात दरवर्षी घट येत असून, बाजारात भावदेखील मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी साेयाबीनच्या पिकाला पर्याय शाेधत आहेत. साेयाबीन बियाण्यांचे दर वाढल्याने शासनाने यावर अनुदान जाहीर करावे, अशी मागणी संजय राऊत, आकाश गजबे, प्रशांत खंते, नितीन ठवळे, प्रवीण गोडबोले, अशपाक काजी यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.

...

साेयाबीनची उगवणशक्ती कमी

साेयाबीनचे क्षेत्र कमी झाले असले तरी काही शेतकऱ्यांना साेयाबीनच्या बियाण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, बाजारात साेयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना कंपन्यांचे बियाणे १०,३५० रुपये ते ११,५०० रुपये प्रति क्विंटल तर घरगुती बियाणे ८,००० रुपये ते १०,००० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करावे लागत आहे. मागील हंगामात किडी व राेगाचा प्रादुर्भाव आणि कापणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे साेयाबीनच्या बियाण्यांची उगवणशक्ती ६५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली.