शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशनकरिता तातडीने पर्यावरणविषयक परवानगी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशन प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक परवानगी घेण्याची गरज असल्यास त्याकरिता तातडीने आवश्यक पावले ...

नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशन प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक परवानगी घेण्याची गरज असल्यास त्याकरिता तातडीने आवश्यक पावले उचला, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ॲड. एम. अनिलकुमार व ॲड. एस.एस. सन्याल यांनी सर्वोच्च न्यायालयाने आदर्श हाउसिंग सोसायटी प्रकरणात दिलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधले. या निर्णयानुसार, केंद्र सरकार, सशस्त्र सेना किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाच्या जमिनीवर विकास करायचा असला तरी, पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता महामार्ग प्राधिकरणला यासंदर्भातील कायदे तपासण्याचे व पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक असल्यास ती तातडीने मिळविण्याचे निर्देश दिले, तसेच याकरिता न्यायालयाच्या आदेशाची गरज असल्यास तेही सांगावे, असे नमूद केले.

या प्रकल्पाकरिता अजनी येथील हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याविरुद्ध ॲड. श्वेता बुरबुरे, छायाचित्रकार अजय तिवारी व स्वच्छ असोसिएशन यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करणे सरकारी जबाबदारी आहे. विविध अहवालांनुसार नागपूरचे तापमान व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत अजनीतील घनदाट वनसंपदा नष्ट केल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल. ती हानी कधीच भरून काढता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ॲड. अनिलकुमार यांनी याचिकाकर्त्यांतर्फे, ॲड. सन्याल यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे, तर ॲड. आनंद परचुरे यांनी महामार्ग प्राधिकरणवतर्फे कामकाज पाहिले.

-----------------

आक्षेपांवर निर्णय घेण्याचे आदेश

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजनीतील ४ हजार ९३० झाडे कापण्यासाठी महानगरपालिकेकडे सादर केलेल्या अर्जावर सात हजारांपेक्षा अधिक आक्षेप आले आहेत. उच्च न्यायालयाने प्राधिकरणचा अर्ज व त्यावरील आक्षेप एक आठवड्यात राज्य सरकारकडे पाठविण्याचे आणि सरकारने संबंधित अर्ज व आक्षेपांवर त्यापुढील चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेशही दिले.