शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशनकरिता तातडीने पर्यावरणविषयक परवानगी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:08 IST

नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशन प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक परवानगी घेण्याची गरज असल्यास त्याकरिता तातडीने आवश्यक पावले ...

नागपूर : नागपुरातील महत्त्वाकांक्षी अजनी इंटर मॉडेल ट्रान्स्पोर्ट स्टेशन प्रकल्पाकरिता पर्यावरणविषयक परवानगी घेण्याची गरज असल्यास त्याकरिता तातडीने आवश्यक पावले उचला, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिला.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ॲड. एम. अनिलकुमार व ॲड. एस.एस. सन्याल यांनी सर्वोच्च न्यायालयाने आदर्श हाउसिंग सोसायटी प्रकरणात दिलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधले. या निर्णयानुसार, केंद्र सरकार, सशस्त्र सेना किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाच्या जमिनीवर विकास करायचा असला तरी, पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता महामार्ग प्राधिकरणला यासंदर्भातील कायदे तपासण्याचे व पर्यावरणविषयक परवानगी आवश्यक असल्यास ती तातडीने मिळविण्याचे निर्देश दिले, तसेच याकरिता न्यायालयाच्या आदेशाची गरज असल्यास तेही सांगावे, असे नमूद केले.

या प्रकल्पाकरिता अजनी येथील हजारो झाडे तोडण्यात येणार आहेत. त्याविरुद्ध ॲड. श्वेता बुरबुरे, छायाचित्रकार अजय तिवारी व स्वच्छ असोसिएशन यांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. पर्यावरणाचे संरक्षण करणे सरकारी जबाबदारी आहे. विविध अहवालांनुसार नागपूरचे तापमान व प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत अजनीतील घनदाट वनसंपदा नष्ट केल्यास पर्यावरणाची मोठी हानी होईल. ती हानी कधीच भरून काढता येणार नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ॲड. अनिलकुमार यांनी याचिकाकर्त्यांतर्फे, ॲड. सन्याल यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे, तर ॲड. आनंद परचुरे यांनी महामार्ग प्राधिकरणवतर्फे कामकाज पाहिले.

-----------------

आक्षेपांवर निर्णय घेण्याचे आदेश

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजनीतील ४ हजार ९३० झाडे कापण्यासाठी महानगरपालिकेकडे सादर केलेल्या अर्जावर सात हजारांपेक्षा अधिक आक्षेप आले आहेत. उच्च न्यायालयाने प्राधिकरणचा अर्ज व त्यावरील आक्षेप एक आठवड्यात राज्य सरकारकडे पाठविण्याचे आणि सरकारने संबंधित अर्ज व आक्षेपांवर त्यापुढील चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आदेशही दिले.