शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जनतेच्या हिताची चिंता असेल तर काँग्रेसने सरकारबाहेर पडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकीत वीज बिल भरले नाही तर जोडणी कापण्यात येईल, असा इशारा महावितरणकडून देण्यात येत आहे. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीतील वीज बिलात सवलत देणार अशा वारंवार घोषणा करून सरकारमधील मंत्र्यांनीच जनतेच्या अपेक्षा वाढविल्या. आता वीज कापण्याचा इशारा देऊन कोट्यवधी जनतेच्या अपेक्षांवरच प्रहार केला आहे. काँग्रेस पक्षाला जनतेच्या हिताची चिंता असेल, तर त्यांनी तात्काळ सरकारबाहेर पडावे, असे प्रतिपादन भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी केले.

सरकारने वारंवार सवलतीचे आश्वासन जनतेला दिल्यामुळेच वीज ग्राहकांनी आजपर्यंत बिलाचा भरणा केलेला नाही आणि त्यामुळेच वीज बिल थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शासनाने एस.टी. महामंडळाला मदत केली होती. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना सवलत देण्यासाठी अनेकदा घोषणा केल्या. कधी १०० युनिट माफ, कधी ५० टक्के बिल माफ व अन्य अनेक सवलतींच्या घोषणा केल्या. मात्र, आता ऊर्जामंत्री वीज बिलांबाबत गप्प बसले आहेत. यावरून काँग्रेसच्या मंत्र्यांचे किती वजन या सरकारमध्ये आहे, हे लक्षात येते. मंत्र्यांना केवळ खुर्च्या सांभाळायच्या आहेत का, असा सवाल खोपडे यांनी केला.