शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

सरपंचाने ठरविले तर कुठूनही निधी खेचून आणून शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:09 IST

ग्रामपंचायतीकडे निधीचे विविध स्रोत : पंचायत राज व्यवस्थेने दिले ग्रामपंचायतींना विशेष अधिकार नागपूर : केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेत ...

ग्रामपंचायतीकडे निधीचे विविध स्रोत : पंचायत राज व्यवस्थेने दिले ग्रामपंचायतींना विशेष अधिकार

नागपूर : केंद्र सरकारने पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला विशेष अधिकार दिले आहेत. विकासाच्या प्रक्रियेत गाव शहराच्या बरोबरीने विकसित व्हावे या उद्देशातून ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचे संपूर्ण अधिकार सरपंचांना दिले आहे. ग्रामपंचायतीचा गोळा होणारा स्वनिधी कितीही असो; पण सरपंचाने ठरविले तर गावाच्या विकासासाठी तो कुठूनही निधी खेचून आणू शकतो. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या अनेक योजनांतून गावाच्या विकासासाठी भरभरून निधी दिला जातो. याशिवाय राज्य व केंद्र सरकारमार्फत १० हजारांपासून ते ५० लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळू शकतात.

गावखेड्याचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने ११४० योजना तयार केल्या आहेत. गावाच्या गरजेनुसार योजनांची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे सर्वच योजना एका गावासाठी लागू पडत नाहीत; पण काही योजना सरसकट गावांसाठी राबविता येणाऱ्या आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या निधीचा वापर करण्यापासून ते गावातील करवसुलीपर्यंतचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. ७३ व्या घटनादुरुस्तीने गावांना इतके बलशाली बनविले आहे की, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापेक्षा सरपंच अधिक सक्षम आहे. केंद्र सरकारद्वारे देण्यात येणारा वित्त आयोगाचा निधी आता थेट ग्रामपंचायतीकडे वळता केला जातो. १४ व्या वित्त आयोगात तर केंद्र सरकारने १०० टक्के वाटा ग्रामपंचायतीला दिला होता; पण १५ व्या वित्त आयोगात तो ८० टक्के ग्रामपंचायतीला, १० टक्के पंचायत समितीलला व १० टक्के जिल्हा परिषदेला दिला आहे. १४ वा वित्त आयोग लागू झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा तयार होऊ लागला आहे. सरकारला हा आराखडा पाठविल्यानंतर तीन टप्प्यांत वित्त आयोगाचा निधी येतो. गावासाठी पैशाची कमी नाही, योजनांची कमी नाही, कमी आहे ती गावपुढाऱ्यांच्या दृष्टिकोनाची, नियोजनाची.

वित्त आयोगाच्या निधीतून करावयाचा खर्च

- ग्रामपंचायतींना वित्त आयोगाच्या प्राप्त होणाऱ्या अनुदानातून १० टक्के निधी प्रशासकीय व तांत्रिक बाबींवर खर्च करायचा आहे; तर उर्वरित ९० टक्के निधी ग्रामविकासाच्या पायाभूत सुविधांवर खर्च करायचा आहे. यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, ग्रामपंचायत भवन, अंगणवाड्यांचे बांधकाम, दिवाबत्ती व सौरदिव्यांचा वापर, आवश्यक देखभाल-दुरुस्ती, आदींचा समावेश आहे.

योजनांच्या माध्यमातून मिळतो राज्याचा निधी

- जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा निधी हा ग्रामपंचायतीलाच मिळतो. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, उन्हाळ्यात दरवर्षी पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची सर्व कामे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात येतात. दलित वस्ती विकास कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान, आमदार आदर्श ग्राम योजना, राज्य सरकारद्वारे राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास, शबरी, रमाई योजना, गाव विजेसाठी सक्षम व्हावे म्हणून सौरविद्युत प्रकल्प योजना, ग्रामविकास भवन प्रकल्प योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, मुख्यमंत्री पेयजल विकास कार्यक्रम, यशवंत ग्राम समृद्धी योजना, स्मार्ट ग्राम योजना, खासदार व आमदार निधी.

ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाची साधने

- ग्रामपंचायत हद्दीतील घरे व मोकळ्या जागा यांवरील कर.

- पाणीपट्टी, दिवाबत्ती कर, व्यवसाय कर, यात्रा कर.

- आठवडी बाजारातून मिळणारा निधी, जनावरांच्या खरेदी-विक्रीवरील कर.

- जमीन महसुलाच्या प्रमाणात राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान.

- जिल्हा नियोजन समितीतून जनआरोग्य व नागरी सुविधेसाठी मिळणारा निधी.

सीएसआर निधी कसा मिळविता येईल?

- ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कंपन्यांकडून गावाचा विकास करण्यासाठी सीएसआर फंड ग्रामपंचायतीला अथवा जिल्हा परिषदेलाही देण्यात येतो. डब्ल्यूसीएलसारख्या कंपन्या ह्या आपला सीएसआर जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडे जमा करतात. ग्रामपंचायतीचे सरपंच सीएसआर मिळविण्यासाठी थेट कंपनीशी संपर्क साधू शकतात.

सरपंचांचे अधिकार

- ग्रामपंचायतीच्या सरपंचाला १५ लाख रुपयांच्या कामावर खर्च करण्याचे थेट अधिकार आहेत. सरपंच हा गावाचा विकास आराखडा तयार करून, त्यासाठी निधी मिळविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतो.

ग्रामपंचायतींसाठी असलेल्या स्पर्धा व पुरस्कार

- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार

- शाहू-फुले-आंबेडकर दलित वस्ती सुधार योजना पुरस्कार

- सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा

- पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना पुरस्कार

- उत्कृष्ट पाणी व्यवस्थापन पुरस्कार

- यशवंत पंचायत राज पुरस्कार

- यशवंतराव चव्हाण गौरव ग्रामसभा पुरस्कार

- महात्मा गांधी तंटामुक्ती पुरस्कार

- निर्मल ग्राम पुरस्कार

- पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

- आदर्श गाव पुरस्कार

असे आहे जिल्ह्यातील चित्र

४ ग्रामपंचायती - ७६८

४ गावे - १६१६

४ ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या - ६७०४

४ महिलांची सदस्यसंख्या - २४६४

४ पुरुष सदस्यसंख्या - २९३०

४ अनु. जाती सदस्यसंख्या - ८९८

४ अनु. जमाती सदस्यसंख्या - ८३८