शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

सुविधाच नाही तर रुग्ण येणार कसे?

By admin | Updated: April 27, 2017 02:07 IST

महापालिकेच्या सर्वात चांगल्या रुग्णालयात सदर येथील रोगनिदान केंद्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो.

सदर रोगनिदान केंद्र : रुग्णांची संख्या रोडावली गणेश हुड/आनंद डेकाटे   नागपूर महापालिकेच्या सर्वात चांगल्या रुग्णालयात सदर येथील रोगनिदान केंद्राचा समावेश असल्याचा दावा केला जातो. येथे केवळ बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आहे. रुग्णांना भरती करून घेण्याची सुविधा येथे नाही. फक्त निदान आणि उपचार केले जातात. येथे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गीय रुग्णही मोठ्या संख्येने येतात. परंतु रुग्णालयाकडे पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष आणि काळानुरूप अत्याधुनिक यंत्रसामुग्री व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या नाही. यामुळे मागील काही वर्षांत येथील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या तीन वर्षांचाच विचार केला असता मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या रोडावली आहे.सदर रोगनिदान केंद्र हे शहरतील जुन्या रुग्णालयापैकी एक आहे. कालांतराने याचा विस्तार करण्यात आला. नवनवीन विभाग सुरू झाले. तशी येथील रुग्णांची संख्याही वाढली. परंतु दरम्यानच्या काळात रुग्णालयातील सुविधांकडे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे येथील रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत आहे. येथील बाह्य रुग्ण विभागातील रजिस्टर बुकमधील नोंदणीनुसार तीन वर्षांपूर्वी रुग्णालयात दररोज सरासरी १५० ते १७५ रुग्ण उपचारासाठी येत असत. सध्या ही संख्या १२५ ते १५० पर्यंत खाली आली आहे. २०१३-१४ मध्ये ४८,९५० रुग्णांनी लाभ घेतला. २०१४-१५ मध्ये ही संख्या ४२,८९२ वर पोहोचली तर २०१५-१६ मध्ये ४०,८३८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी यात पुन्हा घट होण्याची शक्यता आहे. अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा अभाव सामान्य तपासणीसोबतच या रुग्णालयात पॅथालॉजी, एक्स-रे आणि नेत्ररोग विभाग आहे. परंतु पॅथालॉजीमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री नसल्याने बहुतांश तपासणीसाठी खासगी पॅथालॉजीमध्येच पाठविले जाते. एक्स-रे विभागाचीही तशीच अवस्था आहे. किमान थ्रीडी एक्स-रेची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी रुग्णांची अपेक्षा आहे. नेत्ररोग विभागाची मशीन अनेक महिन्यांपासून बिघडली आहे. परंतु ती दुरुस्तसुद्धा केली जात नाही. रुग्णालय अपग्रेड व्हावे सदर येथील रुग्णालय जुने आहे. पूर्वी चांगली सेवा मिळायची. आताही मिळते. परंतु चांगली यंत्रसामुग्रीच उपलब्ध नाही. त्यामुळे बाहेर जावे लागते. रुग्णालयातच अत्याधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिल्यास रुग्ण त्याचा लाभ घेऊ शकतील. यासाठी फार निधीचीही आवश्यकता नाही. यासंदर्भात केवळ रुग्णच नव्हे तर येथील कर्मचारी स्पष्टपणे काहीही सांगत नसले तरी रुग्णालय अपग्रेड व्हावे, अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. ईसीजी बंद रुग्णालयात ईसीजीची सुविधा आहे. परंतु अनेक महिन्यांपासून ते बंद आहे. कारण काय कुणालाच माहिती नाही. ज्या ठिकाणी ईसीजी काढले जाते तिथे नेहमीच कुलूप लावलेले दिसून येते. यामुळे गरीब व गरजू रुग्णांना खासगी रुग्णालयातून ईसीजी काढावे लागतात. कोट्यवधीची जागा पडून सदरसारख्या बाजारभागात महापालिकेचे रोगनिदान केंद्र आहे. अद्ययावत रुग्णालय उभारण्यासाठी येथे ्रजागा उपलब्ध आह. परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांची रुग्णालय अपग्रेड करण्याची इच्छा नसल्याने येथील कोट्यवधींची जागा वापराविना पडून आहे. अद्ययावत रुग्णालय उभारल्यास दक्षिण-पश्चिम व उत्तर नागपुरातील गरजू रुग्णांना याचा लाभ होऊ शकतो.