शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी बंद

By admin | Updated: October 7, 2016 02:52 IST

गुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’

मेडिकलला मिळेना तंत्रज्ञ : उपचाराअभावी गंभीर रुग्ण अडचणीतगुंतागुंतीच्या, बऱ्या न होणाऱ्या जखमांनी त्रस्त रुग्णांना विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना दिलासा ठरू शकेल अशी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ सहा महिन्यांपासून बंद आहे. मध्यभारतात केवळ मेडिकलमध्ये हे उपकरण आहे. १ कोटी २० लाखांचे हे उपकरण चालविण्यासाठी मेडिकलला तंत्रज्ञ मिळत नसल्याने रुग्ण अडचणीत आले आहेत.सुमेध वाघमारे ल्ल नागपूर भारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण आढळतात. मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणापैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरु पात नसून ती शरीरातील महत्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. यात गंभीर जखम झाल्यास व त्याकडे दुर्लक्ष केल्यास वेळप्रसंगी संबंधित अवयव कापावा लागतो. अशा जखमांसह, जळीतरुग्ण, गँगरीन व न्यूरोसर्जरी नंतर त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ‘हायपरबेरिक आॅक्सिजन थेरपी’ वरदान ठरते. याला लक्षात घेऊनच २०१० मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) १ कोटी २० लाख रुपये किमतीचे हे यंत्र खरदी केले. मेडिकलच्या शल्यक्रिया विभागाच्या शस्त्रक्रिया गृह ‘ड’मधील एका खोलीत हे उपकरण बसविण्यात आले. गेल्या सहा वर्षांपासून रोज पाच ते सात रुग्णांवर उपचार केले जात होते. परंतु सहा महिन्यापूर्वी येथील तंत्रज्ञ निवृत्त होताच हे यंत्र बंद पडले. रुग्णांना खासगी केंद्राकडे पाठविले जात आहे. विशेष म्हणजे, खासगीमध्ये एका ‘थेरपी’ची किमत दोन हजाराच्यावर आहे. मेडिकलमध्ये ही उपचारपद्धती बीपीएल व ज्येष्ठ नागरिकांसाठी नि:शुल्क होती. मात्र आता यंत्रच बंद पडल्याने गंभीर रुग्ण अडचणीत आले आहेत. यातील अनेकांवर अवयव कापण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे. तंत्रज्ञाअभावी अनेक यंत्र धूळ खात विदर्भच नव्हे तर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंधप्रदेश येथून रुग्ण नागपूरच्या मेडिकलमध्ये येतात. हजारो गरीब रुग्णांना चांगले उपचार मिळावे म्हणून शासनाने येथे कोट्यवधीची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. मात्र ते हाताळणारे तंत्रज्ञच नसल्याने धूळखात पडले आहेत. यात कोट्यवधीच्या ‘हायपरबेरिक आॅक्सिजन’ उपकरणासोबतच ‘इको कार्डिओग्राफी, ईएमजी, एनसीव्ही, सीपीटीएस’ यासारखे अनेक यंत्र धूळ खात पडले आहेत. मेंदूमधील विद्युत लहरींच्या हालचाली समजण्यासाठी ईईजी यंत्र चार वर्षांपासून सायकॅट्रिक विभागात बंद स्थितीत आहे.