शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

पती-पत्नीची मुलीसह आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:43 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वेलतूर : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसेखुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंभाेरा येथे रविवारी (दि. ३१) दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी व मुलीचा समावेश आहे. त्यांनी शनिवारी (दि. ३०) रात्री आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पाेलीस सूत्रांनी व्यक्त केली.

श्याम गजानन नारनवरे (वय ४६), सविता श्याम नारनवरे (३५) व समता श्याम नारनवरे (१२, रा. प्लाॅट नंबर-११०, अनमाेल नगर, हनुमान मंदिराच्या मागे, वाठाेडा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. गाेसे खुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ वैनगंगा नदीच्या पात्रापासून ५०० मीटर अंतरावर आहे. याच ‘बॅक वाॅटर’लगत आंभाेरा- नागपूर मार्ग गेला असून, या ठिकाणी राेड उंच आहे. नावाडी या ‘बॅक वाॅटर’मध्ये मासेमारी करीत आसताना त्यांना तीन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. त्यामुळे त्यांनी लगेच पाेलिसांना सूचना दिली.

पाेलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून नावाड्यांच्या मदतीने तिन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढले व उत्तरीय तपासणीसाठी कुही येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. श्याम यांच्या खिशातील कागदपत्रांवरून पाेलिसांनी त्यांची बहीण ज्याेती संजय घरत (३२, रा. वाठाेडा, नागपूर) यांना कळविले. त्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतांची ओळख पटली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी ज्याेती घरत यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक किशाेरकुमार वैरागडे करीत आहेत.

...

ओढणीने बांधले हात

पाण्यात उडी घेऊन मृत्यू झाल्यानंतर मृतदेह १२ ते १४ तासांनी पाण्यावर तरंगायला सुरुवात हाेते. त्यामुळे या तिघांनीही शनिवारी रात्री ९ ते १० च्या सुमारास पाण्यात उडी घेतली असावी, अशी शक्यता ठाणेदार आनंद कविराज यांनी व्यक्त केली. सविता व समता यांचे हात ओढणीने, तर श्याम व सविता यांचे हात दुपट्ट्याने बांधले हाेते. उडी घेतल्यानंतर हाताला बांधलेला दुपट्टा सुटल्याने श्यामचा मृतदेह सविता व समताच्या मृतदेहापासून पाच फूट अंतरावर आढळून आला. तिन्ही मृतदेह राेडलगतच्या पाण्यात आढळून आले असून, राेडलगत त्यांची माेटरसायकलही हाेती. त्यामुळे तिघेही शनिवारी रात्री माेटरसायकलने नागपूरहून आंभाेरा येथे आले असावेत, अशी शक्यता आनंद कविराज यांनी व्यक्त केली.