शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

शिकार, दारूच्या पलिकडे जाऊन भटका समाज शोधतोय अस्तित्त्वाची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST

- बबन गोरामन : धर्मांतरणाच्या इशाऱ्याने राजकीय नेत्यांना आणले वठणीवर प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आजपासून ...

- बबन गोरामन : धर्मांतरणाच्या इशाऱ्याने राजकीय नेत्यांना आणले वठणीवर

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आजपासून ६० वर्षापूर्वी जंगलात राहून शिकार करणे, दारू काढून उदरनिर्वाह करणे ही पारधी, फासे पारधी समाजाची दैनंदिनी होती तर काही ठिकाणी लुटारू जमात म्हणून ते बदनाम होते. त्यांच्या वाताहतीला इंग्रज व तत्कालिन स्थितीची ही देण होती. मात्र, स्वातंत्र्यानंतरही बदनामीने साथ सोडली नाही. मात्र, समाजातील बबन गोरामन यांच्यासारख्या जाणत्यांच्या प्रयत्नाने परिवर्तन होण्यास सुरुवात झाली आहे.

वर्षाचे आठ महिने शिकार, भिक मागण्यासाठी जंगल व गावोगावी भटकंती करणे आणि पावसाळ्याची चार महिने मिळेत तिथे बेडा ठोकून राहणे. या काळात दारू काढणे, हा त्यांचा व्यवसाय. हिंगणा येथील डेग्मा खुर्द येथे हा समाज अशा तऱ्हेने भटकंती करत असताना १९५०-५५च्या सुमारास गावातील नत्थू खाडे पाटील यांना त्यांची ही दयना बघवेना. म्हणून त्यांनी ठेक्याने शेती देऊ केली. ताराचंद विठोबा पवार या फासे पारध्याने सर्वप्रथम ठेका घेतला आणि पुढे हळूहळू काहींनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शेती करण्यास सुरुवात केली आणि आत्ताच्या शेषनगरात हा बेडा १९६२ मध्ये स्थायी झाला. नंतर बॅ. शेषराव वानखेडे यांनीच या बेड्याचे नाव शेषनगर असे केले. मात्र, ना जमीन, ना जात प्रमाणपत्र, ना रेशनकार्ड. देशाच्या लेखी अस्तित्त्वच नव्हते. म्हणून हिंदू धर्माला आपल्या अस्तित्त्वाची जाणिव करवून देण्यासाठी १९९४-९५ मध्ये धर्मांतरणाचा खोटा इशारा देण्याची युक्ती बबन गोरामन या युवकाच्या डोक्यात शिरली. त्याची आग आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली. मिशनरी संघटना, मुस्लिम संघटना यांच्या फेऱ्या सुरू झाल्या. मात्र, देवीभक्त असलेला हा समाज मुळाशी दगा करणार नाही, असे ठणकाऊन सांगत राहिला. त्याचा परिणाम असा झाला की तत्कालिन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी शेषनगरात दाखल झाले. पक्की घरे, प्रत्येकाला शेतजमीन, रेशन कार्ड व जातप्रमाणपत्राची योजना जाहीर झाली आणि समाजाला खऱ्या अर्थाने अस्तित्त्व लाभले. सोबतच शाळांची पायाभरणी झाली आणि आज हा समाज शिक्षणाच्या प्रवाहात उतरला आहे.

----------

८० टक्के गाव झालाय दारूमुक्त

पूर्वी शेषनगर बेडा संध्याकाळच्या सुमारास ओलांडू शकत नव्हता, इतकी दहशत होती. त्यामुळे, इतर समाजाशी मेळ होत नव्हता. ही बाब बघून मी आणि माझ्या काही सहकाऱ्यांनी काही राजकीय नेत्यांना पाठीशी धरून दारू व्यवसाय तोडण्यास सुरुवात केली. धर्मांतरणाला नकार दिल्यामुळे आधिच आमच्यावर जिवघेणे हल्ले सुरू झाले होते. त्यात दारू तोडण्याचे कारस्थान सुरू केल्याने आप्तांच्या द्वेषालाही बळी पडत होतो. मात्र, आत हा बेडा ८० ते ८५ टक्के दारूमुक्त झाल्याचे आदिवासी पारधी विकास परिषदेचे विदर्भ अध्यक्ष बबन गोरामन यांनी सांगितले.

---------------

जात प्रमाणपत्राचा घोळ

आम्ही व्हीजेएनटी, एनटी की एसटी याची जाणच आम्हाला नव्हती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आमच्यासाठी अनेक योजना सादर झाल्या. मात्र, जातप्रमाणपत्राअभावी त्यांचा काहीच लाभ होत नव्हता. तेव्हा योजना बाजूला सारा आधि आम्ही कोणत्या जातीचे, हे सांगा हे ठणकावून सांगितल्यावर आम्हाला जात प्रमाणपत्र मिळायला लागले व योजनाही पोहोचू लागल्या.

--------------

चार पोस्ट ग्रॅज्युटेट

माझे शिक्षण कसे झाले हा मोठा पेच आहे. मात्र, आज माझ्या घरात चार पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. शेषनगरात १५ मुले ग्रॅज्युएट झाले. काही १२वी तर काही दहावी पर्यंत पोहोचले. शिक्षणाची महती आता पटायला लागली आहे. यात बँकेत मॅनेजर असलेले मंगल भोसले याच गावचे होत आणि ते शेषनगरातून पहिले १२वी पास झालेले व्यक्ती होत. त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे ते म्हणाले. हा समाज गुन्हेगारमुक्त, दारिद्र्यमुक्त, भिक्षामुक्त, व्यसनमुक्त करण्याचा माझा संकल्प पूर्ण होत असल्याचा आज आनंद वाटतो, असे ते म्हणाले.

......................