शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

शंभरी आता ‘एक’ नंबरी !

By admin | Updated: November 9, 2016 02:56 IST

केंद्र शासनाने काळ्या बाजाराला लगाम लावण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नागपूरकरांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या

नागपूरकरांच्या ‘एटीएम’वर उड्या १०० च्या नोटांसाठी धावाधाव पेट्रोल पंपावर रांगा नागपूर : केंद्र शासनाने काळ्या बाजाराला लगाम लावण्यासाठी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे नागपूरकरांमध्ये मिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. देशात वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयाचे व्यापार व उद्योग वर्तुळातून स्वागत करण्यात आले आहे तर दैनंदिन व्यवहारासाठी १०० रुपयांच्या नोटा कशा आणायच्या याबाबत सामान्य जनतेत चिंता दिसून आली. एकूणच केंद्र शासनाने काळ्या बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी वित्तीय ‘सर्जिकल स्ट्राइक’ केल्याची सर्वसाधारण भावना दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर करताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अनेक जणांनी १०० रुपयांच्या नोटा काढण्यासाठी तत्काळ ‘एटीएम’कडे धाव घेतली. त्यामुळे नागपुरातील बहुतांश ‘एटीएम’वर रात्री नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. काही पेट्रोल पंप तसेच अनेक दुकानांमध्ये तत्काळ ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारणेच बंद झाले. त्यामुळे आता व्यवहार होणार कसे याबाबत सामान्य जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.देशाच्या विकासाला चालना मिळेलया निर्णयामुळे प्रामाणिक नागरिकांना कोणताही धक्का लागणार नाही. केवळ काळा पैसा संपविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. येणाऱ्या काळात महागाई कमी होईल. मालमत्तेचे योग्य दर निश्चित होतील. केंद्र व राज्य शासनाला कर स्वरूपात भरपूर पैसा उपलब्ध होईल. परिणामी देशाच्या विकासाला चालना मिळेल. दीर्घ लाभाच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगला निर्णय आहे.-डॉ. अनुप सगदेव (सीए), संचालक, नागपूर नागरिक सहकारी बँकग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरणकेंद्र शासनाने जाहीर केलेल्या नव्या धोरणामुळे काळा पैसा साठविलेल्यांना झटका बसला आहे.रात्रीपासूनच ५०० ते १००० रुपयांच्या नोटा रद्दबातल केल्यामुळे बुधवारपासून व्यापार कसा करायचा हा प्रश्न आहे. ग्राहकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण आहे. शिवाय ज्या व्यापाऱ्यांना पुढील दोन दिवस आलेल्या मालाचे देयक अदा करायचे आहे, त्यांनी नेमका व्यवहार कसा करावा याबाबतदेखील प्रश्नचिन्ह आहे. -प्रभाकर देशमुख, अध्यक्ष, नागपूर चिल्लर किराणा असोसिएशन नागरिकांनो, चिंता करूनका !आता व्यवहार कसे होतील व आपल्याकडे असलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे काय होणार असा प्रश्न सामान्य नागरिकांमध्ये दिसून आला. ‘लोकमत’ने याबाबत अर्थ व उद्योगतज्ज्ञांशी संपर्क साधला. या निर्णयामुळे कुणाच्याही हक्काच्या पैशांवर गदा आलेली नाही. नागरिक आपल्याजवळील ५०० व १००० च्या नोटा बँकांमध्ये देऊ शकतात. जर रक्कम जास्त असेल तर योग्य पुरावे सादर करून आपल्या खात्यात तिचा भरणा होऊ शकतो. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. पुढील काही दिवस १०० रुपयांच्या नोटांची कमतरता जाणवेल. मात्र या काळात व्यापारी प्रतिष्ठाने, मॉल, पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी ‘एटीएम कार्ड’ द्वारे खरेदी करता येईल. शिवाय ‘आॅनलाईन बँकिंग’, ‘एनईएफटी’, ‘आरटीजीएस’ यांचे पर्याय उपयोगात आणता येतील, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.काळ्या पैसेवाल्यांचे दणाणले धाबेनागपूर शहरात हवाला, सट्टा तसेच डब्बा व्यापारात असणाऱ्यांचे या निर्णयामुळे धाबे दणाणले आहेत. बहुतांश जणांकडे काळा पैसा हा ५०० व १००० च्या नोटांमध्येच आहे. शिवाय या पैशाची कुठेही नोंद किंवा पुरावा नाही. त्यामुळे सट्टा, हवाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.मध्यरात्रीपर्यंत व्यापारी प्रतिष्ठाने सुरूदरम्यान, ५०० व १००० रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून बंद होणार असल्यामुळे नागरिकांकडून जास्तीत जास्त खरेदी व्हावी यासाठी काही व्यापारी प्रतिष्ठाने मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. यासंदर्भात नागरिकांना ‘एसएमएस’द्वारे माहितीदेखील पोहोचविण्यात येत होती. काही नागरिकांनीदेखील खरेदीसाठी संबंधित ठिकाणी धाव घेतली.