शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

निराधार कुटुंबाला माणुसकीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:40 IST

कुणावर कधी कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग बोहरूपी कुटुंबीयावर आला. महिनाभरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील अपघातात वाडी येथील राजेंद्र बोहरूपी हे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देमुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली : उपचारासाठी आर्थिक मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुणावर कधी कशी वेळ येईल, हे सांगता येत नाही. असाच दुर्दैवी प्रसंग बोहरूपी कुटुंबीयावर आला. महिनाभरापूर्वी वर्धा जिल्ह्यातील आष्टीजवळील अपघातात वाडी येथील राजेंद्र बोहरूपी हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण परिस्थिती हलाखीची असल्याने कुटुंबीय हतबल झाले. या कठीणप्रसंगी जाधव कुणबी समाजाचे(जेकेएस) पदाधिकारी मदतीला धावून आले. उपचारादरम्यान आर्थिक मदत केली. राज्यभरातील समाजबांधवांनीही साथ दिली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. बोहरूपी कुटुंबीयांचे छत्र हिरावले. कमावती व्यक्ती अचानक निघून गेल्याने त्यांची पत्नी सविता राजेंद्र बोहरूपी आणि दोन मुले तेजस्विनी व अंकित यांच्यावर आभाळ कोसळले. दोघांचे शिक्षण अन् कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न सविताला पडला. तेजस्विनी इयत्ता नववीत तर अंकित हा आठवीचा विद्यार्थी. बोहरूपी कुटुंबाची परिस्थिती विचारात घेता, जाधव कुणबी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र कोरडे व पदाधिकारी सतीश सातंगे, मिलिंद साबळे, सुनील शहाणे, विनोद दापूरकर, रिनेश जाने, आदित्य तट्टे, अरविंद जाने ,राजेंद्र काकडे व विलास सोनारे आदींनी मदत करण्याचा संकल्प केला.जाधव समाज कल्याणकारी संस्थेने तेजस्विनी व अंकित यांच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. त्यापुढेही मदतीची ग्वाही दिली. राजेंद्र बोहरूपी यांच्या तेरवीच्या छोटेखानी कार्यक्रमात जेकेएसची टीम त्यांच्या घरी पोहोचली. दत्तक योजनेचे संकल्पपत्र सविता बोहरूपी यांना हस्तांतरित करून बोहरूपी कुटुंबीयांना मोठा दिलासा दिला. मुलांच्या शाळेतील शिक्षकही मदतीसाठी पुढे आले. समाजातर्फे पह्ण्रगती विद्यालयाच्या शिक्षकांचा गौरव केला. निराधार कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय इतरांना खरोखरच प्रेरणादायी आहे.‘स्मृती निधी’चा नवा संकल्पसमाजाचं काही देणं लागते या भावनेतून आपल्या कुटुंबातील स्वर्गीयांच्या कार्यक्रमावर खर्च न करता याच पैशातून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजातील दुर्बलांना आर्थिक मदत करण्याचा संकल्प समाजबांधवांनी केला आहे. याला प्रतिसाद देत वानाडोंगरी येथील अजय सुखदेवराव देशमुख यांंनी आपल्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ १५ हजार तर प्रवीण विजयराव गोमकाळे व त्यांचे बंधू प्रशांत यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिनिमित्त २१ हजारांचा धनादेश राजेंद्र कोरडे यांना दिला. हा निधी गरजू व निराधारांसाठी वापरला जाणार आहे.