शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

गरीब महिला कशा होणार आत्मनिर्भर

By admin | Updated: March 16, 2015 02:12 IST

गरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत.

लोकमत विशेषगणेश हूड नागपूरगरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत. परंतु बँकांनी असहकाराचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गरीब महिला आत्मनिर्भर कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोलमजुरी करणाऱ्या वा गरज असूनही रोजगार नसलेल्या महिलांना लहानसहान आर्थिक अडचणींवर मात करता यावी, यासाठी समूहाच्या माध्यमातून दर महिन्याला बचत करून निकड असलेल्या महिलांना मदत केली जाते. समूहाचे बँकेत खाते उघडल्यानंतर जमा रकमेच्या ४ ते ८ पट कर्जस्वरूपात आर्थिंक मदत मिळणे अपेक्षित असते. परंतु जिल्ह्यातील ९९८ प्रकरणे बँकांकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. समूहांच्या आर्थिक मदतीसंदर्भातील तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी दर महिन्याची ११ व २६ तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु बँकांकडून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळत नाही. एवढेच नव्हे तर महिलांना तासन्तास बँकेत बसवून ठेवले जाते. त्या महिला मजुरी पाडून आशेने बँकेत येतात. लहान मुलांना सोबत आणावे लागते. परंतु बँकांतील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्वयंसहाय्यता समूहात प्रामुख्याने दारिद्र्र्य रेषेखालील महिलांचा समावेश आहे. कर्जाची मागणी करण्यापूर्वी त्यांना निकष पूर्ण करावे लागतात. समूहाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांत बँके त खाते उघडावे लागते. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून व्यवसायासाठी तीन महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणासोबतच त्यांना सामाजिक दायित्व म्हणून घेतेल्या कर्जाची परतफेड करण्याचा सल्ला दिला जातो. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते. परंतु बँकांकडून प्रतिसाद मिळत नाही.