शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

गरीब महिला कशा होणार आत्मनिर्भर

By admin | Updated: March 16, 2015 02:12 IST

गरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत.

लोकमत विशेषगणेश हूड नागपूरगरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत. परंतु बँकांनी असहकाराचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गरीब महिला आत्मनिर्भर कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोलमजुरी करणाऱ्या वा गरज असूनही रोजगार नसलेल्या महिलांना लहानसहान आर्थिक अडचणींवर मात करता यावी, यासाठी समूहाच्या माध्यमातून दर महिन्याला बचत करून निकड असलेल्या महिलांना मदत केली जाते. समूहाचे बँकेत खाते उघडल्यानंतर जमा रकमेच्या ४ ते ८ पट कर्जस्वरूपात आर्थिंक मदत मिळणे अपेक्षित असते. परंतु जिल्ह्यातील ९९८ प्रकरणे बँकांकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. समूहांच्या आर्थिक मदतीसंदर्भातील तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी दर महिन्याची ११ व २६ तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु बँकांकडून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळत नाही. एवढेच नव्हे तर महिलांना तासन्तास बँकेत बसवून ठेवले जाते. त्या महिला मजुरी पाडून आशेने बँकेत येतात. लहान मुलांना सोबत आणावे लागते. परंतु बँकांतील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्वयंसहाय्यता समूहात प्रामुख्याने दारिद्र्र्य रेषेखालील महिलांचा समावेश आहे. कर्जाची मागणी करण्यापूर्वी त्यांना निकष पूर्ण करावे लागतात. समूहाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांत बँके त खाते उघडावे लागते. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून व्यवसायासाठी तीन महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणासोबतच त्यांना सामाजिक दायित्व म्हणून घेतेल्या कर्जाची परतफेड करण्याचा सल्ला दिला जातो. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते. परंतु बँकांकडून प्रतिसाद मिळत नाही.