शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
4
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
5
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
6
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
7
पति निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्र किनाऱ्यावर दिसला रोमॅन्टिक अंदाज; बघा लेटेस्ट VIDEO
8
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
9
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
10
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!
11
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
12
"नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन...", विधानभवनात पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर मराठी अभिनेत्याचा टोला
13
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
14
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
15
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
16
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
17
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
18
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
19
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
20
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...

नोटाबंदीनंतर किती पैसा बँकेत आला - प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: February 17, 2017 22:33 IST

नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 नागपूर, दि. 17 - नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.
परंतु नोटाबंदीनंतर नेमका किती पैसा बँकेत परत आला, याची आकडेवारी अजुनही का जाहीर केली जात नाही ? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केला.
 भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर नगपुरातील इंदोरा मैदान येथे प्रचर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, शहराध्यक्ष रामभाऊ काळे, डॉ. संदीप नंदेश्वर व्यापीठावर होते.
 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरीत चौफेर टीका केली. ते म्हणाले, बनावट नोटा या पाकिस्तानतर्फे छापल्या जातात. नोटाबंदीनंतर पाकिस्तानने छापलेल्या सर्व बनावट नोटा या बँकेत जमा झाल्या आहेत, असा आमचा आरोप आहे. त्यामुळेच बँकेत किती नोटा आल्या याची आकडेवारी सरकार जाहीर करायला घाबरत आहे.
एकीकडे लोकांना पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे विजय माल्यांसारख्या लोकांचे लाखो कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कुणाचेही कर्ज माफ केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु त्यांनी हे वक्तव्य संसदेच्या सभागृहात करावे, असे आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र स्वच्छतेचा नारा लावतात. परंतु स्वच्छता अभियानातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कामगाराकडेच त्यांचे दुर्लक्ष आहे. देशभरातील सफाई कामगारांवर जवळपास अडीच हजार कोटीचे कर्ज आहे. ते कर्ज नरेंद्र मोदी माफ करतील का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाही. मनात आले घेतला निर्णय असा भाजपचा कारभार आहे. मनात आले, नवाज शरीफ
यांना भेटायला गेले. मनात आले नोटाबंदी केली. अशा विचार न करणा-या सरकारला आणखी किती दिवस सहन करणार. यांचा मुख्य अजेंडा हा संविधान बदलणे हाच आहे. ह एकमेव निर्णय त्यांनी विचारकरून घेतला आहे. महापालिकेची ही निवडणूक केवळ ट्रायल आहे, खरी लढाई ही २०१९ ची निवडणूक राहणार आहे. तेव्हा आपले घर शाबूत आहे हे दाखवायचे असेल तर आताच निर्णय घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर नागपूरसह पूर्व नागुरातील खरबी चौक आणि दक्षिण नागपुरातील जाटतरोटी येथे आयोजित जाहीर सभेला सुद्धा मार्गदर्शन केले.
 
- नागपूरची मेट्रो अपयशी ठरणार
 भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक करीत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे होय. वहतुकीचा अभ्यास असणा-यांनी ही मेट्रो फायद्याची ठरणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे, त्यानंतरही मेट्रो रेल्वे केली जात आहे. परंतु ती निश्चित अपयशी ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.