शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर किती पैसा बँकेत आला - प्रकाश आंबेडकर

By admin | Updated: February 17, 2017 22:33 IST

नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.

ऑनलाइन लोकमत
 नागपूर, दि. 17 - नोटाबंदीनंतर पाचशेच्या किती नोटा छापल्या गेल्या. दोन हजाराच्या किती छापल्या याची माहिती रिझर्व्ह बँकेने जाहीर केली आहे.
परंतु नोटाबंदीनंतर नेमका किती पैसा बँकेत परत आला, याची आकडेवारी अजुनही का जाहीर केली जात नाही ? असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी येथे केला.
 भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उत्तर नगपुरातील इंदोरा मैदान येथे प्रचर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, पक्षाचे ज्येष्ठ नेते मिलिंद पखाले, शहराध्यक्ष रामभाऊ काळे, डॉ. संदीप नंदेश्वर व्यापीठावर होते.
 अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारला चांगलेच धारेवर धरीत चौफेर टीका केली. ते म्हणाले, बनावट नोटा या पाकिस्तानतर्फे छापल्या जातात. नोटाबंदीनंतर पाकिस्तानने छापलेल्या सर्व बनावट नोटा या बँकेत जमा झाल्या आहेत, असा आमचा आरोप आहे. त्यामुळेच बँकेत किती नोटा आल्या याची आकडेवारी सरकार जाहीर करायला घाबरत आहे.
एकीकडे लोकांना पैसे बँकेत जमा करायला सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे विजय माल्यांसारख्या लोकांचे लाखो कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कुणाचेही कर्ज माफ केले नसल्याचे वक्तव्य केले आहे. परंतु त्यांनी हे वक्तव्य संसदेच्या सभागृहात करावे, असे आव्हान सुद्धा त्यांनी यावेळी दिले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र स्वच्छतेचा नारा लावतात. परंतु स्वच्छता अभियानातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्वच्छता कामगाराकडेच त्यांचे दुर्लक्ष आहे. देशभरातील सफाई कामगारांवर जवळपास अडीच हजार कोटीचे कर्ज आहे. ते कर्ज नरेंद्र मोदी माफ करतील का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक घेत नाही. मनात आले घेतला निर्णय असा भाजपचा कारभार आहे. मनात आले, नवाज शरीफ
यांना भेटायला गेले. मनात आले नोटाबंदी केली. अशा विचार न करणा-या सरकारला आणखी किती दिवस सहन करणार. यांचा मुख्य अजेंडा हा संविधान बदलणे हाच आहे. ह एकमेव निर्णय त्यांनी विचारकरून घेतला आहे. महापालिकेची ही निवडणूक केवळ ट्रायल आहे, खरी लढाई ही २०१९ ची निवडणूक राहणार आहे. तेव्हा आपले घर शाबूत आहे हे दाखवायचे असेल तर आताच निर्णय घ्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर नागपूरसह पूर्व नागुरातील खरबी चौक आणि दक्षिण नागपुरातील जाटतरोटी येथे आयोजित जाहीर सभेला सुद्धा मार्गदर्शन केले.
 
- नागपूरची मेट्रो अपयशी ठरणार
 भाजप सरकार कोणताही निर्णय विचारपूर्वक करीत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे नागपूरची मेट्रो रेल्वे होय. वहतुकीचा अभ्यास असणा-यांनी ही मेट्रो फायद्याची ठरणार नाही, असे आधीच स्पष्ट केले आहे, त्यानंतरही मेट्रो रेल्वे केली जात आहे. परंतु ती निश्चित अपयशी ठरेल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.