शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

‘हजार रुपयात कसा संसार व्हईन जी’

By admin | Updated: December 11, 2014 00:50 IST

कमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत

लताबाईची व्यथा : हलाखीच्या परिस्थितीमुळे अडले मुलाचे शिक्षणदयानंद पाईकराव -नागपूरकमावत्या पतीचा हात निकामी झाल्यामुळे त्याच्याकडून काम होत नाही. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मुलगाही १२ वीनंतर शिक्षणास मुकला. अंगणवाडी पोषण आहाराच्या कामात खूप मेहनत करूनही महिन्याकाठी एक हजार रुपये पदरात पडतात. ‘यवढ्या कमी पैशात कसा संसार व्हईन जी’, अशा शब्दात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता ठाकरे (४७) या महिलेने आपली व्यथा मांडली.आयटकच्यावतीने बुधवारी अंगणवाडीतील शालेय पोषण आहार तयार करणाऱ्या महिलांचा मोर्चा हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. मोर्चात अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बेंबळा (बु.) येथील लता गुणवंत ठाकरे (४७) ही महिला सामील झाली होती. लताबाईचे पती गुणवंत ठाकरे ६० वर्षांचे आहेत. ते शेतीवर मजुरी करायचे. परंतु एका भांडणात त्यांचा हात निकामी झाल्यामुळे आता त्यांच्याकडूनही काम होत नाही. त्यांचा मुलगा सतीश (२८) हा बारावीपर्यंत शिकला. वडिलांची मजुरी बंद झाल्यामुळे आता संसाराची जबाबदारी लताबाई आणि त्यांचा मुलगा सतीशवर येऊन पडली. शालेय पोषण आहार तयार करण्याचे काम त्या करतात. यात सुरुवातीला महिन्याचे फक्त ३०० रुपये मिळायचे. चार वर्षांपासून हे मानधन एक हजार रुपये करण्यात आले. परंतु महागाईच्या काळात कितीही काटकसर केली तरी एक हजार रुपयात संसार चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. घरच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांचा मुलगा सतीशने शिक्षण अर्धवट सोडून तो सुद्धा मजुरीच्या कामाला लागला. लताबाई आयटकच्या मोर्चात सहभागी झाल्या. आपल्याला शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी सकाळी १० वाजताच अंगणवाडीत जावे लागते. तेथे साफसफाई, वर्ग स्वच्छ करून आहार बनविणे, भांडी धुणे ही कामे करावी लागत असून त्यासाठी दुपारी ४ वाजत असल्याचे त्यांनी सांगितले. एवढी मरमर करून पदरात पडतात फक्त एक हजार. एवढ्या कमी रकमेत काय करणार, असा सवाल त्यांनी चिंताग्रस्त चेहऱ्याने उपस्थित केला. शासनाने किमान पाच हजार रुपये तरी मानधन केल्यास संसारात हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)