शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

कसा होणार जिल्ह्याचा विकास?

By admin | Updated: November 22, 2014 02:24 IST

वर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे तसेच गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीमुळे जिल्ह्यातील १०६४ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत.

गणेश हूड नागपूरवर्षभरापूर्वी अतिवृष्टी व पुरामुळे तसेच गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीमुळे जिल्ह्यातील १०६४ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. दुरुस्तीसाठी सरकारकडे वारंवार मागणी करूनही निधी मिळत नाही. कोणत्याही भागाचा विकास हा चांगल्या रस्त्यांच्या जाळ्यावर अवलंबून असल्याने कसा होणार जिल्ह्याचा विकास, असा प्रश्न ग्रामीण भागातील लोकांना पडला आहे.२०१३ मध्ये जून व जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नागपूर जिल्ह्यातील १,९५६ किलोमीटर लांबीचे ८०३ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. दुरुस्तीसाठी १५९ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.तसेच गौण खनिजाच्या वाहतुकीमुळे १,३१५ कि.मी. लांबीचे २६१ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २१० कोटीची गरज आहे त्यानुसार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली. परंतु ३२ कोटीचाच निधी मिळाला. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या नियतव्ययाच्या १५ टक्के निधी रस्ते दुरुस्तीसाठी उपलब्ध करण्यााचे शासन निर्देश असल्याने यातून १७ कोटी मिळाले. असा एकूण ४९ कोटींचा निधी रस्ते दुरुस्ती व मूलभूत सुविधासाठी उपलब्ध झाला आहे. मागणी ३६०आणि मिळाले ४९ कोटी, त्यामुळे जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती कशी होणार, असा प्रश्न बांधकाम विभागाला पडला आहे. नागपूर जिल्ह्यात ८०९१ किलोमीटर लांबीचे ग्रामीण तर २८५९ किलोमीटर लांबीचे इतर जिल्हा मार्ग आहेत. या मार्गांची संख्या ५ हजारांवर आहेत. यातील १०६४ रस्ते नादुरुस्त झालेले आहेत. तसेच ग्रामीण भागातील ३०६ पूल व रपटे नादुरुस्त झालेले आहेत. काही ठिकाणी पुरामुळे रपटे वाहून गेल्याने ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. अनेक गावातील एसटी बसच्या फेऱ्या बंद करण्यात आलेल्या आहेत. गावाला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यासोबतच शेतात जाणारे रस्तेही मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील मालाची वाहतूक करणे कठीण झाले आहे. या रस्त्यांची दुरुस्ती कोण करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. २०१३ च्या अतिवृष्टी व पुरामुळे हिंगणा, भिवापूर, उमरेड व कुही तालुक्यात घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तसेच पुरात गुरे वाहून गेली. नैसर्गिक संकटात शेकडो लोकांचा निवारा हिरावला गेला परंतु अपेक्षित नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. ती केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.