शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक ...

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक लागला. काही शाळांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले. त्यामुळे माझ्या मुलाला कमी गुण का दिले, अशी ओरड पालकांची होत आहे. दुसऱ्या शाळेने माझ्यापेक्षा कमी हुशार असलेल्या मित्राला चांगले गुण दिले. मला का कमी मिळाले, अशी ओरड विद्यार्थ्यांची आहे. हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्या असत्या तर जास्त गुण मिळाले असते, असेही मत व्यक्त केले आहे.

- दृष्टिक्षेपात

दहावीचे विद्यार्थी - ६२,६४७

पास झालेले - ६२,२००

बारावीचे विद्यार्थी - ५६,६६७

पास झालेले - ५६,४५०

- कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेतले. वेळ भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. या काळात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.

- राजकुमार पाटील, पालक

- आमचे संपूर्ण वर्ष ऑनलाईनमध्ये गेले. परीक्षाही झाल्या नाही. पण आम्ही अभ्यास भरपूर केला. परीक्षा झाली असती तर यापेक्षा जास्त गुण मिळाले असते.

रागिणी खाडे, विद्यार्थिनी

- बारावीचे मूल्यांकन हे दहावी व अकरावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे झाले. दहावीत पहिल्या श्रेणीत आलो होतो. पण अकरावीला फार गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे गुण कमी पडले होते. पण बारावीला भरपूर अभ्यास केला होता. अपेक्षा होती की, ८० टक्क्यावर गुण मिळेल. पण कमी मार्क पडले. परीक्षा झाली असती तर नक्कीच अपेक्षित गुण मिळाले असते.

सुहास ठाकरे, विद्यार्थी

- परीक्षा नाही, मूल्यांकन नाही

दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर निकाल हाती आल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अपेक्षित गुण मिळाले नाही ते विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज करतात. विशेष म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनासाठी भरपूर अर्ज असतात. परंतु यावेळी बोर्डाने पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली नाही. शाळेने जे गुणदान केले, त्याच आधारावर निकाल घोषित केला आहे. त्यात नाराज असलेल्या विद्यार्थ्यांची गोची झाली आहे.

- हो विद्यार्थ्यांची व पालकांची नाराजी आम्हाला सहन करावी लागत आहे. त्या शाळेने माझ्या मुलापेक्षा कमी हुशार असलेल्या मुलाला जास्त गुण दिले. तुम्हाला जास्त गुण द्यायला काय झाले होते, अशी ओरड विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. पुढचे शिक्षण आता आम्हाला तुमच्या शाळेत शिकवायचे नाही, असाही त्रागा पालक करीत आहेत. वास्तविक आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले आहे. खरे तर अशी ओरड करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी शासनाने सीईटी अनिवार्य करायला हवी होती. ग्रामीण भागातील आमच्यासारख्या प्रामाणिक शाळेतील शिक्षकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य