शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक ...

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक लागला. काही शाळांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले. त्यामुळे माझ्या मुलाला कमी गुण का दिले, अशी ओरड पालकांची होत आहे. दुसऱ्या शाळेने माझ्यापेक्षा कमी हुशार असलेल्या मित्राला चांगले गुण दिले. मला का कमी मिळाले, अशी ओरड विद्यार्थ्यांची आहे. हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्या असत्या तर जास्त गुण मिळाले असते, असेही मत व्यक्त केले आहे.

- दृष्टिक्षेपात

दहावीचे विद्यार्थी - ६२,६४७

पास झालेले - ६२,२००

बारावीचे विद्यार्थी - ५६,६६७

पास झालेले - ५६,४५०

- कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेतले. वेळ भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. या काळात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.

- राजकुमार पाटील, पालक

- आमचे संपूर्ण वर्ष ऑनलाईनमध्ये गेले. परीक्षाही झाल्या नाही. पण आम्ही अभ्यास भरपूर केला. परीक्षा झाली असती तर यापेक्षा जास्त गुण मिळाले असते.

रागिणी खाडे, विद्यार्थिनी

- बारावीचे मूल्यांकन हे दहावी व अकरावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे झाले. दहावीत पहिल्या श्रेणीत आलो होतो. पण अकरावीला फार गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे गुण कमी पडले होते. पण बारावीला भरपूर अभ्यास केला होता. अपेक्षा होती की, ८० टक्क्यावर गुण मिळेल. पण कमी मार्क पडले. परीक्षा झाली असती तर नक्कीच अपेक्षित गुण मिळाले असते.

सुहास ठाकरे, विद्यार्थी

- परीक्षा नाही, मूल्यांकन नाही

दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर निकाल हाती आल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अपेक्षित गुण मिळाले नाही ते विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज करतात. विशेष म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनासाठी भरपूर अर्ज असतात. परंतु यावेळी बोर्डाने पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली नाही. शाळेने जे गुणदान केले, त्याच आधारावर निकाल घोषित केला आहे. त्यात नाराज असलेल्या विद्यार्थ्यांची गोची झाली आहे.

- हो विद्यार्थ्यांची व पालकांची नाराजी आम्हाला सहन करावी लागत आहे. त्या शाळेने माझ्या मुलापेक्षा कमी हुशार असलेल्या मुलाला जास्त गुण दिले. तुम्हाला जास्त गुण द्यायला काय झाले होते, अशी ओरड विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. पुढचे शिक्षण आता आम्हाला तुमच्या शाळेत शिकवायचे नाही, असाही त्रागा पालक करीत आहेत. वास्तविक आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले आहे. खरे तर अशी ओरड करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी शासनाने सीईटी अनिवार्य करायला हवी होती. ग्रामीण भागातील आमच्यासारख्या प्रामाणिक शाळेतील शिक्षकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य