शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त गुण कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:11 IST

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक ...

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले. त्यामुळे राज्याचा निकाल ऐतिहासिक लागला. काही शाळांनी गुणदान करताना विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले. त्यामुळे माझ्या मुलाला कमी गुण का दिले, अशी ओरड पालकांची होत आहे. दुसऱ्या शाळेने माझ्यापेक्षा कमी हुशार असलेल्या मित्राला चांगले गुण दिले. मला का कमी मिळाले, अशी ओरड विद्यार्थ्यांची आहे. हुशार विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्या असत्या तर जास्त गुण मिळाले असते, असेही मत व्यक्त केले आहे.

- दृष्टिक्षेपात

दहावीचे विद्यार्थी - ६२,६४७

पास झालेले - ६२,२००

बारावीचे विद्यार्थी - ५६,६६७

पास झालेले - ५६,४५०

- कोरोनामुळे शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेतले. वेळ भरपूर असल्यामुळे विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला होता. या काळात अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले होते. परंतु परीक्षा रद्द झाल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.

- राजकुमार पाटील, पालक

- आमचे संपूर्ण वर्ष ऑनलाईनमध्ये गेले. परीक्षाही झाल्या नाही. पण आम्ही अभ्यास भरपूर केला. परीक्षा झाली असती तर यापेक्षा जास्त गुण मिळाले असते.

रागिणी खाडे, विद्यार्थिनी

- बारावीचे मूल्यांकन हे दहावी व अकरावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे झाले. दहावीत पहिल्या श्रेणीत आलो होतो. पण अकरावीला फार गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे गुण कमी पडले होते. पण बारावीला भरपूर अभ्यास केला होता. अपेक्षा होती की, ८० टक्क्यावर गुण मिळेल. पण कमी मार्क पडले. परीक्षा झाली असती तर नक्कीच अपेक्षित गुण मिळाले असते.

सुहास ठाकरे, विद्यार्थी

- परीक्षा नाही, मूल्यांकन नाही

दरवर्षी परीक्षा झाल्यानंतर निकाल हाती आल्यावर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला अपेक्षित गुण मिळाले नाही ते विद्यार्थी पुनर्मूल्यांकनासाठी बोर्डाकडे अर्ज करतात. विशेष म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनासाठी भरपूर अर्ज असतात. परंतु यावेळी बोर्डाने पुनर्मूल्यांकनाची सोय उपलब्ध करून दिली नाही. शाळेने जे गुणदान केले, त्याच आधारावर निकाल घोषित केला आहे. त्यात नाराज असलेल्या विद्यार्थ्यांची गोची झाली आहे.

- हो विद्यार्थ्यांची व पालकांची नाराजी आम्हाला सहन करावी लागत आहे. त्या शाळेने माझ्या मुलापेक्षा कमी हुशार असलेल्या मुलाला जास्त गुण दिले. तुम्हाला जास्त गुण द्यायला काय झाले होते, अशी ओरड विद्यार्थी व पालकांकडून होत आहे. पुढचे शिक्षण आता आम्हाला तुमच्या शाळेत शिकवायचे नाही, असाही त्रागा पालक करीत आहेत. वास्तविक आम्ही विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार गुणदान केले आहे. खरे तर अशी ओरड करणाऱ्या विद्यार्थी व पालकांसाठी शासनाने सीईटी अनिवार्य करायला हवी होती. ग्रामीण भागातील आमच्यासारख्या प्रामाणिक शाळेतील शिक्षकांना भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.

राजश्री उखरे, प्राचार्य