शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

रुग्णालयांना सुधारित नियमांची अंमलबजावणी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:09 IST

वैद्यकीय आरोग्य अधिकारी : महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ संबंधी अधिसूचना जारी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

वैद्यकीय आरोग्य अधिकारी : महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ संबंधी अधिसूचना जारी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी अधिनियम १९४९ अंतर्गत नागपुरात नोंदणीकृत रुग्णालयांना विद्यमान अधिनियम महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी नियम १९७३ व त्याअंतर्गत करण्यात आलेल्या सुधारणेसह महाराष्ट्र शुश्रूषा गृह नोंदणी (सुधारित) नियम २०२१ महाराष्ट्र राज्यात १४ जानेवारी २०२१ पासून लागू झाला आहे. शहरातील नोंदणीकृत रुग्णालयांना सुधारित नियमांची अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे. त्यातील तरतुदींच्या अधीन वैद्यकीय व्यवसाय करणे बंधनकारक असल्याचे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी म्हटले आहे.

या नियमात शुश्रूषागृहाची भौतिक रचना आणि निकष, शुश्रूषागृहासाठी किमान आवश्यक बाबी, शस्त्रक्रियागृहासाठी किमान आवश्यक बाबी, अतिदक्षता विभाग, सूतिकागृहासाठी किमान आवश्यक बाबी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णाचा मृतदेह जवळच्या नातेवाइकांकडे सुपूर्द करणे, रुग्ण हक्क संहिता आदी बाबींचा समावेश आहे. या अनुषंगाने सुधारित नियमांची सविस्तर माहिती राजपत्रात नमूद करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांचे निकषही ठरवून देण्यात आले आहेत. नियमानुसार खाटांनुसार ठरवून दिल्यानुसार वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व साधने उपलब्ध असणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी व नूतनीकरणासाठी महापालिका क्षेत्रात वर्गवारीनुसार शुश्रूषागृहातील खाटांनुसार शुल्क आकारण्यात येईल.

...

- वर्ग अ प्लस आणि अ क्षेत्रातील शुश्रूषागृहासाठी ५०००

- ब वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शुश्रूषागृहांसाठी ४५००

- क वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शुश्रूषागृहांसाठी ४०००

- ड वर्ग महानगरपालिका क्षेत्रातील शुश्रूषागृहांसाठी ३५००

- नगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत क्षेत्रातील शुश्रूषागृहांसाठी ३०००

....

देयकासाठी मृतदेह रोखता येणार नाही

विशेष म्हणजे शुश्रूषागृहात रुग्णाचा मृत्यू झाल्यास आवश्यकतेनुसार न्यायवैद्यक प्रक्रिया पूर्ण करून नातेवाइकांकडे मृतदेह सुपूर्द करणे आवश्यक आहे. कुठल्याही परिस्थितीत रुग्णालयाचे देयक भरले नाही म्हणून अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव मृतदेह रोखून ठेवता येणार नाही. रुग्णांच्या रक्तपुरवठ्यासाठी संबंधित शुश्रूषागृह परवानाधारक रक्तपेढीशी संलग्नित असेल. जेव्हा रुग्णाला रक्त संक्रमणाची आवश्यकता असेल त्या वेळी त्याला रक्त उपलब्ध करून देणे ही शुश्रूषागृहाची जबाबदारी असेल. शुश्रूषागृहात निदान झाल्यानंतर आजारांची माहिती स्थानिक पर्यवेक्षकीय प्राधिकाऱ्यांस देणे बंधनकारक राहील, असे डॉ. संजय चिलकर यांनी म्हटले आहे.