शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

आशातार्इंनी केले निराश

By admin | Updated: January 23, 2015 02:45 IST

आशातार्इंनी एके काळी उत्तमोत्तम आणि अजरामर गीते रसिकांच्या पुढ्यात टाकली. त्यांच्या हजारो गीतांवर तब्बल सहा दशके रसिकांचे भावविश्व तोलले आहे. पण आता त्यांचे वय झाले आहे.

नागपूर : आशातार्इंनी एके काळी उत्तमोत्तम आणि अजरामर गीते रसिकांच्या पुढ्यात टाकली. त्यांच्या हजारो गीतांवर तब्बल सहा दशके रसिकांचे भावविश्व तोलले आहे. पण आता त्यांचे वय झाले आहे. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्या गातात हा कौतुकाचा आणि आदराचा विषय आहे. गेली सहा दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले हे सत्य असले तरी त्यांनी आता थांबायला हवे. कुठे थांबावे हे कळायला हवे, अशी प्रतिक्रिया त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांनीच आजच्या कार्यक्रमात व्यक्त केली. नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजित नागपूर महोत्सवात आज त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयामुळे अलीकडे आशातार्इंचे सूर लागत नाहीत, असे बोलले जाते. त्याचा प्रत्यय आजच्या कार्यक्रमात आला. त्या मनापासून सादर करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण त्यांचे सूर लागत नव्हते. ‘मलमली तारुण्य माझे..., शारद सुंदर चंदेरी राती..., का रे अबोला..’ ही गीते नजाकतीने सादर करणाऱ्या आशाताई याच का, असा प्रश्न रसिकांना पडला. आशाताई व्यावसायिक गायक म्हणून कार्यक्रमाच्या मानधनाबाबत तडजोड करीत नाहीत. नागपूर महानगरपालिकेने या कार्यक्रमासाठीही त्यांना घसघशीत मानधन दिले आहे. केवळ मराठी गाण्यांचा कार्यक्रम असेल तर वेगळे मानधन. हिंदी गीतांच्या कार्यक्रमासाठी जास्त मानधन आणि हिंदी व मराठी गीतांच्या कार्यक्रमासाठी दुप्पट मानधन असा आशातार्इंच्या कार्यक्रमाच्या व्यावसायिक कराराचा भाग आहे. त्यात त्या तडजोड करीत नाहीत. मानधनात तडजोड नसताना तेवढ्याच तयारीचे आणि ताकदीचे सादरीकरण मात्र त्या करीत नाहीत. नागपूरकरांनी आतापर्यंत आशातार्इंवर भरभरुन प्रेम केले. हा महोत्सव नागपूरकरांच्या अस्मितेचा आणि गौरवाचा आहे. त्यात असा कार्यक्रम सादर करणे म्हणजे नागपूरकरांचा अपमानच असल्याची प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. व्यावसायिक पातळीवर कुठलीही तडजोड न करणाऱ्या कुठल्याही मोठ्या गायिकेला नागपूरकरांचा असा अपमान करण्याची मुभा नाही. व्यावसायिक गायक म्हणून कुठलाही गायक येत असेल तर त्याने गुणवत्ता आणि गायनाचा दर्जा राखायलाच हवा. कार्यक्रमात रवींद्र साठे यांनी ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे..., सख्या रे घायाळ मी हरिणी..., धार वज्राची असू दे...’ आदी त्यांची गीते सादर केली. त्यांच्या गीतांनी रसिकांना आनंद मिळाला. याप्रसंगी त्यांनी दीदींनी गायिलेले ‘अवचिता परिमळु..., मी रात टाकली...’ ही गीते आशातार्इंनी सादर केली. पण त्यात मजा आली नाही. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान आणि त्यांची पुण्याई लक्षात घेत आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती दर्शवित प्रेक्षकांनी त्यांना सहन केले. (प्रतिनिधी)