शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
4
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
5
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
6
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
7
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
8
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
9
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
10
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
11
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
12
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
13
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
14
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
15
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
16
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
17
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
18
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
19
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
20
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?

शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार

By admin | Updated: March 15, 2015 02:20 IST

देशासाठी लढणारे आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता आमच्या देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असतात म्हणून देशवासीय सुरक्षित आयुष्य जगत असतात.

नागपूर : देशासाठी लढणारे आमचे सैनिक प्राणांची पर्वा न करता आमच्या देशाच्या सीमांचे अहोरात्र रक्षण करीत असतात म्हणून देशवासीय सुरक्षित आयुष्य जगत असतात. अशा जवानांना शत्रूशी लढताना वीरमरण येते. त्यानंतर त्यांचे कुटुंबीयही आपल्या माणसांपासून पारखे होतात. हे मरण देशासाठी गौरवास्पद असले तरी बलिदान केलेल्या सैनिकांचे कुटुंबीय आपल्या व्यक्तीच्या जाण्याचे दु:ख पचवितात. त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांनीही देशासाठी खूप काही सोसले असते. अशाच एका वीरपत्नीचा भावपूर्ण सत्कार प्रहार संस्थेतर्फे करण्यात आला. वीरत्वाचा हुंकार असलेल्या या कार्यक्रमाला भावपूर्णतेची हळवी किनार होती. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी शूरांचा सन्मान हाच आपला संस्कार असल्याचे मत व्यक्त केले. प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन सी. पी. अँड बेरार, रविनगरच्या प्रांगणात करण्यात आले. यंदाच्या गणराज्यदिनी अशोकचक्राचे मानकरी ठरलेले ५७ राष्ट्रीय रायफल्सचे नाईक नीरजकुमार सिंग यांना मरणोपरान्त हा सन्मान मिळाला. दहशतवादी कारवायांचा सामना करताना दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या एक सैनिकाची सुटका केल्यावर त्यांना वीरमरण आले. या शहीद भारतवीराचा सन्मान करताना त्यांच्या वीरपत्नी परमेश्वरीदेवी यांचा सन्मान डॉ. गिरीश गांधी, दत्तात्रय शेकटकर आणि कर्नल सुनील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी त्यांना ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी शेकटकर म्हणाले, सेनेत सहभागी होतानाच कुटुंब सोडावे लागेल आणि प्राणांचे बलिदानही वेळ आल्यास करावे लागेल, हे शिकविले जाते. जहाँ तुफाँ होता है वही हम कश्ती ले जाते है. सैनिकांच्या कुटुंबातील लोकही महान असतात कारण त्यांनी त्यांचा माणूस देशासाठी दिला असतो. त्यामुळेच प्रहारचा हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. दहशतवादाचा आपण जवळून अभ्यास केला आहे. दहशतवादी कधीच जन्माला येत नाही माणसाला दहशतवादी केले जाते. हीनतेच्या भावनेतूनच लोक दहशतवादी होतात. केवळ सैन्यात सहभागी झाल्याने देशसेवा घडत नाही तर तुम्ही जे कराल ते देशासाठी करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. गिरीश गांधी यांनीही प्रहार संस्थेने गेल्या दोन दशकापासून केलेल्या कार्याचे अभिनंदन करून हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असल्याचे सांगितले. या संस्थेमुळेच अनेकांना सैन्यात जाण्याची प्रेरणा मिळाली. नागपूर हे राष्ट्रीय विचारांचेच शहर आहे. बाबासाहेबांनी धम्मदीक्षेसाठी हीच भूमी निवडली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाही येथेच झाली. येथे ताजुद्दीन बाबांचे सर्वाधिक भक्त हिंदूच आहे. साऱ्याच धर्माचे लोक येथे बंधूतेने राहतात. कटुता या शहराची वृत्ती नाही, असे ते म्हणाले. देशासाठी लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या नीरजकुमारसिंग यांच्या आत्म्याला शांतता लाभावी, अशी प्रार्थना करीत त्यांनी वीरपत्नी परमेश्वरीदेवी यांच्या पाठीशी हे शहर नेहमीच उभे आहे, अशी भावना व्यक्त केली. प्रारंभी प्रहार मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. शिवाली देशपांडे यांनी संस्थेची माहिती दिली. विशाखा मंगदे यांनी वीररसाचे गीत सादर केले. संचालन व आभार असिधारा लांजेवार यांनी केले. (प्रतिनिधी)