शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

घरकूल लाभार्थ्यांना मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने घरकूल याेजना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने घरकूल याेजना राबविली जाते. वर्षभरापूर्वी माैदा तालुक्यातील लाभार्थ्यांना शुभेच्छा पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले हाेते. परंतु, ‘एनएमआरडीए’ने त्या लाभार्थ्यांना अद्यापही मंजुरीपत्र दिले नसल्याने घरकुलांचे बांधकाम वांध्यात आले आहे.

घरकूल मिळावे म्हणून माैदा तालुक्यातील अनेकांनी ‘एनएमआरडीए’ (नागपूर मेट्राेपाॅलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथाॅरिटी)कडे अर्ज केले हाेते. त्यातच मध्यंतरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्याने लाभार्थ्यांना शुभेच्छापत्र पाठविले हाेते. ते प्राप्त हाेताच लाभार्थ्यांनी ‘एनएमआरडीए’च्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे चाैकशी करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी काेणती ना काेणती कारणे सांगून लाभार्थ्यांची बाेळवण केली जात आहे.

‘एनएमआरडीए’कडून मंजुरीपत्र प्राप्त न झाल्यााने खंडाळासह अन्य गावांमधील अनेक लाभार्थ्यांना माेडकळीस आलेल्या घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. ती घरे काेसळून जीवितहानी हाेण्याची शक्यताही बळावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यातच नागपूर जिल्ह्याला तीन महत्त्वाची मंत्रिपदेही मिळाली. ही समस्या मार्गी लावण्यासाठी लाभार्थ्यांनी या तिन्ही मंत्र्यांना निवेदने दिली. त्यांना कधी जिल्हा परिषद व पंचायत समिती तर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे हा तिढा तातडीने साेडविण्याची मागणी लाभार्थ्यानी केली आहे. दुसरीकडे, शासनाकडून निधी न मिळाल्याने दुसऱ्या टप्प्यातील घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. निधी प्राप्त हाेताच संबंधितांना मंजुरी पत्र दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार राचलवार यांनी दिली.

---

७,२३१ घरकुलांना मंजुरी?

माैदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात १,०७६, दुसऱ्या टप्प्यात ४,८५५ आणि तिसऱ्या टप्प्यात १,३०० घरकुलांना मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूक काळात याच लाभार्थ्यांना नेत्यांकडून शुभेच्छापत्राही पाठविण्यात आले. निवडणूक आटाेपल्यानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा विचारही लाभार्थ्यांनी केला हाेता. याला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, त्यांना अद्यापही मंजुरीपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे शुभेच्छापत्रांचा खटाटाेप का करण्यात आला, असा प्रश्नही लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.