शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

घरकूल लाभार्थ्यांना मंजुरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:12 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने घरकूल याेजना ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : तळागाळातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामाने घरकूल याेजना राबविली जाते. वर्षभरापूर्वी माैदा तालुक्यातील लाभार्थ्यांना शुभेच्छा पत्र पाठवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले हाेते. परंतु, ‘एनएमआरडीए’ने त्या लाभार्थ्यांना अद्यापही मंजुरीपत्र दिले नसल्याने घरकुलांचे बांधकाम वांध्यात आले आहे.

घरकूल मिळावे म्हणून माैदा तालुक्यातील अनेकांनी ‘एनएमआरडीए’ (नागपूर मेट्राेपाॅलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथाॅरिटी)कडे अर्ज केले हाेते. त्यातच मध्यंतरी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आली. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय नेत्याने लाभार्थ्यांना शुभेच्छापत्र पाठविले हाेते. ते प्राप्त हाेताच लाभार्थ्यांनी ‘एनएमआरडीए’च्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांकडे चाैकशी करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळी काेणती ना काेणती कारणे सांगून लाभार्थ्यांची बाेळवण केली जात आहे.

‘एनएमआरडीए’कडून मंजुरीपत्र प्राप्त न झाल्यााने खंडाळासह अन्य गावांमधील अनेक लाभार्थ्यांना माेडकळीस आलेल्या घरांमध्ये वास्तव्य करावे लागत आहे. ती घरे काेसळून जीवितहानी हाेण्याची शक्यताही बळावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यातच नागपूर जिल्ह्याला तीन महत्त्वाची मंत्रिपदेही मिळाली. ही समस्या मार्गी लावण्यासाठी लाभार्थ्यांनी या तिन्ही मंत्र्यांना निवेदने दिली. त्यांना कधी जिल्हा परिषद व पंचायत समिती तर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगण्यात आले. त्यामुळे हा तिढा तातडीने साेडविण्याची मागणी लाभार्थ्यानी केली आहे. दुसरीकडे, शासनाकडून निधी न मिळाल्याने दुसऱ्या टप्प्यातील घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. निधी प्राप्त हाेताच संबंधितांना मंजुरी पत्र दिले जाणार असल्याची माहिती तहसीलदार राचलवार यांनी दिली.

---

७,२३१ घरकुलांना मंजुरी?

माैदा तालुक्यात पहिल्या टप्प्यात १,०७६, दुसऱ्या टप्प्यात ४,८५५ आणि तिसऱ्या टप्प्यात १,३०० घरकुलांना मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणूक काळात याच लाभार्थ्यांना नेत्यांकडून शुभेच्छापत्राही पाठविण्यात आले. निवडणूक आटाेपल्यानंतर घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचा विचारही लाभार्थ्यांनी केला हाेता. याला एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, त्यांना अद्यापही मंजुरीपत्र प्राप्त झाले नाही. त्यामुळे शुभेच्छापत्रांचा खटाटाेप का करण्यात आला, असा प्रश्नही लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.