शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला

By admin | Updated: December 10, 2014 00:43 IST

एचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही.

एआरटी सेंटरवर औषधांचा तुटवडा : ४० हजार बालक औषधाविनासुमेध वाघमारे - नागपूरएचआयव्ही बाधितांना औषधवितरण करणाऱ्या राज्यातील ७० अँटी रिट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) केंद्रांवर औषधांचा तुटवडा पडला आहे. अनेक केंद्रांवर औषधांचा महिन्याभराचाही साठाही उपलब्ध नाही. यामुळे पावणेदोन लाख एचआयव्ही बाधितांचा जीव टांगणीला लागला आहे. विशेष म्हणजे, एचआयव्ही बाधित बालकांना औषधपुरवठा करणाऱ्या कंपनीने नकार दिला आहे. परिणामी, तीन वर्षांपासून ‘लोपीनावीर’हे सिरपच उपलब्ध नसल्याने तब्बल ४० हजार बालक औषधाविना आहेत. एचआयव्ही पूर्ण बरे करता येत नाही म्हणून प्रतिबंध अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी सरकारने एचआयव्ही बाधितांना मोफत उपचार, मार्गदर्शन व औषध वितरणासाठी राज्यभरात मेडिकल रुग्णालयांसह, जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयात एआरटी केंद्र सुरू केले. या केंद्रातून मिळणाऱ्या औषधोपचारांमुळे आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येते. आयुष्यमान आणि जीवनाची गुणवत्ता वाढते. प्रतिकारशक्ती वाढते, आजाराची वाढ खुंटते आणि संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते. या आजारात औषधांचा सातत्यपूर्ण मारा शरीराला शक्ती प्रदान करतो, परंतु योग्य वेळी औषध न घेतल्यास, औषधात खंड पडल्यास व्हायरसची वाढ होण्याची प्रक्रि या सुरू होते. म्हणूनच एआरटी केंद्रांवर किमान तीन महिने पुरेल एवढा औषधांचा साठा ठेवण्याचा नियम आहे. त्यातही दर आठवड्याच्या औषधांच्या साठ्यांचा तपशील महाराष्ट्र एड्स कंट्रोल सेंटरला पाठविणे आवश्यक आहे. परंतु ‘नॅशनल एडस कंट्रोल सेंटर’मधून एआरटी केंद्रांना होणारा औषधांचा पुरवठा मागील दोन महिन्यांपासून प्रभावित झाला असून तुटवड्याचे हे मुख्य कारण मानले जात आहे.औषधांसाठी चारवेळा चकराएआरटीच्या प्रत्येक केंद्रावर औषधांचा सहा महिन्याचा साठा असणे आवश्यक आहे, आणि तीन महिन्याचा साठा उरताच त्वरित औषधपुरवठा होणे गरजेचे आहे. सूत्रानुसार सर्वच एआरटी केंद्रावर केवळ महिन्याभराच्या औषधांचा साठा उरला आहे. प्रत्येक केंद्रावर दर दिवशी १५० ते २०० च्यावर रुग्ण येतात. यातील अनेक जण आपली ओळख लपविण्यासाठी जवळचे एआरटी केंद्र सोडून दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा लांबच्या केंद्रांवर जातात. येथील रुग्णांना पूर्वी एक महिन्याचे औषध दिले जात होते आता १५ ते २० दिवसांचे औषधे दिले जात आहे. यामुळे महिन्याभरात अनेकांना चारवेळा चकरा माराव्या लागत आहे. यात अनेकांना पदरमोड करून प्रवासाचा खर्च सहन करावा लागत असल्याने अनेक रुग्ण औषधांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.उपराजधानीतील दहा हजार एचआयव्ही बाधित प्रभावितमहिन्याभरापासून एचआयव्हीवरील औषधांचा तुटवडा पडल्याने मेडिकल, मेयो व कामठीतील एआरटी केंद्रांवर उपचार घेणाऱ्या सुमारे दहा हजार एचआयव्ही बाधित प्रभावित झाले आहेत. यातील अनेक जणांना हव्या त्या प्रमाणात औषध मिळत नाही. यातच आर्थिक मागासेलपणामुळे अनेकांना येणे-जाणे परवडत नसल्याने औषध घेणे बंद करण्याच्या तयारीत आहेत. असे झाल्यास तुटवड्याचे कारण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे.