शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:03 IST

बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : विनायक तुमराम यांच्या ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला. अशाप्रकारे दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचेही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. मात्र ब्राह्मण्यवादी आणि ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी इतिहासात या नायकांची दखल घेतली नाही व त्यांचे कर्तृत्व जाणीवपूर्वक झाकून ठेवले. म्हणूनच ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण असल्याचे रोखठोक मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.आदिवासी समाजातील विचारवंत, लेखक व राष्टÑपती पुरस्कारप्राप्त डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘बिरसा मुंडा धरती आबा : जनचेतनेचे विद्रोही रूप’ आणि ‘निर्मला पुतुल और वाहरू सोनवणे की आदिवासी कविताएं : तुलनात्मक अध्ययन’ या दोन ग्रंथांचा लोकार्पण सोहळा रविवारी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग येथे पार पडला.आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, गिरीश गांधी, जेष्ठ कवी सुधाकर गायधनी, आदिवासी कवी वाहरू सोनवणे, राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, नव्या साम्राज्यवादी व भांडवलशाही धोरणात विकास व आधुनिकतेच्या नावावर आदिवासींना जंगलातून हाकलून त्यांचे शोषण क रण्याची नवी परंपरा रुजविण्यात येत आहे.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गंगाधर पानतावणे यांनी, भांडवलशाही आणि सरंजामशाहीपेक्षाही देशात सांस्कृतिक आणि सामाजिक दहशतवाद अधिक धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. मधुकर पिचड यांनी यावेळी आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणाºया धनदांडग्यांविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगत, शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले.डॉ. विनायक तुमराम यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त करताना मराठी साहित्य क्षेत्राने आदिवासी साहित्याची हवी तशी दखल न घेतल्याची खंत व्यक्त केली.