शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला इतिहास अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 02:03 IST

बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस : विनायक तुमराम यांच्या ग्रंथाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल आदी आदिवासी नायकांनी ब्रिटिश साम्राज्य आणि अन्यायग्रस्त समाज व्यवस्थेविरोधात एकाचवेळी व्यापक लढा दिला. अशाप्रकारे दलित, आदिवासी, भटक्या विमुक्तांचेही स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. मात्र ब्राह्मण्यवादी आणि ब्राह्मण्यग्रस्त इतिहासकारांनी इतिहासात या नायकांची दखल घेतली नाही व त्यांचे कर्तृत्व जाणीवपूर्वक झाकून ठेवले. म्हणूनच ब्राह्मण्यग्रस्तांनी मांडलेला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास अपूर्ण असल्याचे रोखठोक मत जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.आदिवासी समाजातील विचारवंत, लेखक व राष्टÑपती पुरस्कारप्राप्त डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘बिरसा मुंडा धरती आबा : जनचेतनेचे विद्रोही रूप’ आणि ‘निर्मला पुतुल और वाहरू सोनवणे की आदिवासी कविताएं : तुलनात्मक अध्ययन’ या दोन ग्रंथांचा लोकार्पण सोहळा रविवारी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह, रेशीमबाग येथे पार पडला.आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, गिरीश गांधी, जेष्ठ कवी सुधाकर गायधनी, आदिवासी कवी वाहरू सोनवणे, राष्टÑसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉ. वीणा दाढे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, नव्या साम्राज्यवादी व भांडवलशाही धोरणात विकास व आधुनिकतेच्या नावावर आदिवासींना जंगलातून हाकलून त्यांचे शोषण क रण्याची नवी परंपरा रुजविण्यात येत आहे.यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. गंगाधर पानतावणे यांनी, भांडवलशाही आणि सरंजामशाहीपेक्षाही देशात सांस्कृतिक आणि सामाजिक दहशतवाद अधिक धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. मधुकर पिचड यांनी यावेळी आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण करणाºया धनदांडग्यांविरोधात लढा देण्याची गरज असल्याचे सांगत, शिक्षणाच्या माध्यमातून अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले.डॉ. विनायक तुमराम यांनी पुस्तकाबाबत मनोगत व्यक्त करताना मराठी साहित्य क्षेत्राने आदिवासी साहित्याची हवी तशी दखल न घेतल्याची खंत व्यक्त केली.