शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्राधिकरणालाच नाही ई-वाहन वापराचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:10 IST

लोकमत एक्सक्लुसिव्ह नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्र्यांनी महापालिका व अनेक नेत्यांना ई-वाहन वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आपल्याच विभागाला ...

लोकमत एक्सक्लुसिव्ह

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्र्यांनी महापालिका व अनेक नेत्यांना ई-वाहन वापरण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, आपल्याच विभागाला हा सल्ला देण्यास कदाचित ते विसरले असावेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या उपयाेगात आताही पेट्राेल, डिझेलच्या वाहनांचाच वापर हाेत आहे. पेट्राेल, डिझेलची दरवाढ सरकार राेखू शकलेली नाही. पेट्राेलच्या दरात भरमसाठ वाढ झाल्याने, अधिकाऱ्यांचे कार्यालयात जाणे-येणे व दाैरे करणे म्हणजे खर्चाचे कारण ठरले आहे. यावर ई-कार हा सर्वाेत्तम पर्याय ठरू शकताे. मात्र, या ईकोफ्रेंडली पर्यायाला अद्यापही महत्त्व देण्यात आले नाही.

विभागीय सूत्रांनुसार, मुख्यालयाकडूनच याबाबत कुठलेही दिशा-निर्देश नाहीत. मात्र, ई-वाहनाच्या उपयाेगाने परिवहनाच्या खर्चात बचत हाेऊ शकते. काही महिन्यांतच डिझेलच्या किमतीत प्रती लीटरवर २० रुपयांची वाढ झाल्याने खर्च प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे इंधनाचे हे परंपरागत पर्याय पर्यावरणाच्या दृष्टीनेही हानिकारक आहेत. तज्ज्ञांच्या मते लाॅकडाऊनच्या काळात नागपूर शहरात हवेची गुणवत्ता वाढली हाेती. रस्त्यावर वाहनच नसल्यामुळेच हे शक्य झाले हाेते. त्यामुळे एकदम बंधन घालण्याऐवजी हळूहळू विभागात परंपरागत इंधनावर चालणाऱ्या वाहनांना साेडून ई-वाहनांचा पर्याय स्वीकारला जाऊ शकताे. तेव्हाच बदल घडू शकेल.

बांधकाम क्षेत्रात नागपुरात पहिल्यांदा सीएनजीचा उपयाेग

गेल्या महिन्यातच अजनी इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) प्रकल्पाचे कंत्राट असलेल्या कंपनीला बांधकाम करताना वापरात येणारी मशीन सीएनजीवर चालविण्याचे स्पष्ट करण्यात आले हाेते. जेसीबी आणि हायड्रा यांसारख्या मशीन चालविण्यास सर्वाधिक इंधन खर्च हाेते. आता या मशिन्स सीएनजीवर चालणार आहेत. त्यामुळे नागपुरात पहिल्यांदा आयएमएस प्रकल्पाच्या बांधकामात अपरंपरागत ऊर्जा स्राेतांचा उपयाेग हाेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.