शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

उच्च शिक्षण विभागाला हवी कर्मचाऱ्यांची ‘पॉवर’

By admin | Updated: November 21, 2014 00:49 IST

शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देऊन उत्तुंग शिखर गाठण्याचे बळ देण्याची मोठी जबाबदारी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागासमोर आहे. परंतु आजच्या तारखेत

७० हून अधिक पदे रिक्त : शासन निर्णयात सुधारणांची अपेक्षायोगेश पांडे - नागपूर शिक्षणाच्या प्रवाहात आलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देऊन उत्तुंग शिखर गाठण्याचे बळ देण्याची मोठी जबाबदारी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागासमोर आहे. परंतु आजच्या तारखेत या विभागालाच कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. नागपूर विभागीय कार्यालयांतर्गत ७० हून अधिक पदे रिक्त असून सुरळीत व प्रभावी कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची आवश्यकता आहे. रिक्त पदांवर नियुक्तीसाठी शासन पुढाकार घेणार का अन् हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलासा देणार का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. उच्च शिक्षण विभागाच्या नागपूर विभागीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ तसेच कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ अशी तीन विद्यापीठे येतात. नागपूर, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यातील शासकीय संस्था, महाविद्यालये, वसतिगृहे यांची जबाबदारी या कार्यालयाकडे आहे. शिवाय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियंत्रणदेखील या कार्यालयाकडून करण्यात येते. येथील एकूण महाविद्यालयांची संख्या ६०० हून अधिक आहे व त्यामुळे सद्यस्थितीत या कार्यालयाकडे कामाचा मोठा ताण आहे.या विभागीय कार्यालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांची दोन पदे, अधीक्षकांचे एक पद रिक्त आहेच. शिवाय ३ डिसेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार या विभागांतर्गत असणाऱ्या शासकीय कार्यालयातील वर्ग ३ व वर्ग ४ ची २०० पदे कमी करण्यात आली होती. विभागाकडून सातत्याने मागणी करूनदेखील वर्ग ३ ची १९ व वर्ग ४ च्या ४९ पदांची मागणी शासनस्तरावर प्रलंबित आहे. संबंधित पदे भरणे हे प्रशासकीय कामाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शासन याकडे गंभीरतेने लक्ष देणार का यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंबंधात विभागीय सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.मुख्यमंत्री घेणार का पुढाकार?राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिक्षणक्षेत्रासंबंधात चांगला अभ्यास आहे. उच्च शिक्षणातील समस्यांची त्यांना जाण आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागातील रिक्त पदांची समस्या किती अडचणी निर्माण करत आहे हे त्यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांच्यासमोर उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी हे मुद्दे मांडले होते. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी यासंबंधात पुढाकार घ्यावा व उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना संबंधित अडचणी लक्षात आणून द्याव्यात, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.शिक्षकांचे निवृत्ती वय ६०-६२ हवेशिक्षक तसेच शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सरसकट ६० किंवा ६२ करावे, अशी विभागाची धारणा आहे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे अगोदरच कर्मचाऱ्यांची कमतरता असलेल्या या कार्यालयात कामाचा ताण वाढतो आहे. अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे मत शासनाला कळविण्यात आले आहे.