अकोला : विदर्भातील संत्र्यांवर संशोधन करू न संत्र्याच्या उत्पादनवाढीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात उच्च उतीसंवर्धन प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास ६.७५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध असताना, गत दोन वर्षापासून ही प्रयोगशाळा व रोपवाटिकेचे काम रखडले आहे. त्यामुळे संत्र्याला अच्छे दिन येणार तरी केव्हा, असा प्रश्न संत्रा उत्पादकांकडून उपस्थित केला जात आहे. विदर्भात जवळपास १ लाख ५0 हजार हेक्टर क्षेत्रावर संत्र्याची लागवड केली जाते; पंरतु संत्र्याचे उत्पादन हेक्टरी ३ ते १0 टन एवढेच र्मयादित आहे. १0 टन उत्पादन घेणारे शेतकरी मोजकेच आहेत. देश, विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकर्यांना ते दिलासादायक ठरणारे असल्याने, याकडे कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्याकरीता कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागातंर्गत संत्र्यावर स्वतंत्र संशोधन सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत भेसळयुक्त रोपांचा शोध घेतला जाणार असून, संत्रा रोपे असलेली रोपाटिका विकसित करण्यात येत आहे. शेतकर्यांना दज्रेदार संत्र्याची रोपे मिळावीत, याकरीता या रोपवाटिकेतून विषाणूमुक्त व रोगमुक्त सक्षम संत्रा रोपे तयार करण्यात येणार आहेत. यासाठी उतीसंवर्धन व संत्र्यासाठी लागणारे विविध संशोधन या रोपवाटिकेत व प्रयोगशाळेत करण्यात येत आहे. यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने कृषी विद्यापीठाला ६ कोटी ९९ लाख रू पयांचा निधी उपलब्ध करू न दिला आहे. परप्रातांतून आलेल्या गलगल जातीच्या संत्र्यांच्या रोपांची भेसळ झाल्याने विदर्भातील संत्रा फळझाडांचे नुकसान होत आहे. त्यामुळेच उत्पादकतासुध्दा घटली आहे. या गलगल रोपांचा शोध शासकीय व इतर खासगी रोपवाटिकामधून घेतला जाणार आहे. यासाठीच स्वतंत्र प्रयोगशाळा व रोपवाटिका बांधण्यात येणार असून, त्यासाठी सहा कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केला जाणार आहे; परंतु अद्याप यावर कृषी विद्यापीठाचा कोणताही निर्णय झाला नसून, रोपवाटिका व प्रयोगशाळेचे कामकाज थंडबस्त्यात पडले आहे.
उच्च उतीसंवर्धन प्रयोगशाळेचे काम रखडले!
By admin | Updated: August 20, 2014 00:14 IST