शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या वस्तूंचे होणार जतन

By admin | Updated: July 3, 2016 02:46 IST

दीक्षाभूमीच्या पाठोपाठ शांतिवन चिचोली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूसंग्रहालयाचा विकासही आता गतीने होणार आहे.

‘शांतिवन’ च्या विकासाला गती : केंद्र सरकारतर्फे १७ कोटी मंजूरनागपूर : दीक्षाभूमीच्या पाठोपाठ शांतिवन चिचोली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूसंग्रहालयाचा विकासही आता गतीने होणार आहे. केंद्र सरकारने शांतिवन चिचोलीला तब्बल १७ कोटी ३ लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित जागांच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार गांभीर्याने पाऊल उचलतांना दिसत आहे. यापूर्वी नागपुरातील जगप्रसिद्ध दीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस यांना ‘अ’ श्रेणीच्या पर्यटन स्थळाचा दर्जा घोषित करण्यात आला. त्यापाठोपाठ या दोन्ही ऐतिहासिक स्थळांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याच्या दृष्टीने कटिबद्ध असलेल्या सरकारने तसा आराखडा सुद्धा तयार केला आहे. यापाठोपाठ आता महामानवाशी संबंधित नागपुरातील तिसरे ऐतिहासिक स्थळ म्हणजे शांतिवन चिचोली होय. शांतिवनाच्या विकासासाठीसुद्धा राज्य व केंद्र सरकार गांभीर्याने पुढाकार घेत आहे. त्यामुळेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी शांतिवन चिचोलीसाठी तब्बल १७.३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. नागपूर ते कळमेश्वर रोडवर फेटरीपासून आत ४ किमी अंतरावर चिचोली हे गाव आहे. या गावाच्या बाहेर शांतिवन पसरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी व नागपूरच्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याची संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणारे धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी येथे शांतिवन परिसर उभारले आहे. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तूंचे संग्रहालय आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेल्या विविध प्रकारच्या वस्तू (कोट, दैनंदिन वापरातील कपडे, जोडे आदी) तसेच देशाची राज्यघटना तयार करीत असतांना त्याचा कच्चा मसुदा ज्या टाईपराईटरवर सर्वप्रथम बाबासाहेबांनी टाईप केला होता तो टाईपराईटर, बाबासाहेबांनी काढलेली चित्रे, त्याकाळचे वर्तमानपत्र याशिवाय १९५६ मध्ये नागपुरात पार पडलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षा सोहळ्याप्रसंगी ज्या तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होत बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ती बुद्धमूर्ती, आदी अनेक ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय उभारण्यात आले आहे. एक विहार आहे. परंतु या वस्तू काळाच्या ओघात नष्ट होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या वस्तू चिरकाल टिकून राहतील, अशी व्यवस्था करण्यावर भर दिला जाईल. (प्रतिनिधी)बुद्ध आणि बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे म्युरल्सही लागणार शांतिवन चिचोली येथील कामातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. जागेचा प्रश्न होता, तो सुद्धा सुटला आहे. शांतिवन परिसरात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित म्युरल्स किंवा चित्रे रेखाटण्यासंबंधीची योजना होती. नागपूर सुधार प्रन्यासचा प्रभार पाहत असतांना मी स्वत: त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. आता खऱ्या अर्थाने कामाला गती मिळेल. सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी