शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच या नव्या समस्येने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गत सहा वर्षात तालुक्यातील ९८९ शेतकऱ्यांना ९५ लाख ६० हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र करोडो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान या सहा वर्षात झालेले आहे. यामुळे आम्ही शेती करायची कशी, असा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अस्मानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. दिवसेंदिवस शेतीपासून काहीही फायदा होत नसताना कर्जाचा डोंगर मात्र वाढतच आहे. सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याने हे पिके न परवडणारी ठरत आहेत. शिवाय विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परिसरात जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी हैदोस घालत असून संत्रा उत्पादनापासून ते खरीप पिकापर्यंत उत्पादन होणे अवघड होत आहे.

तालुक्यातील निमजी व लिंगा बिटला लागून असणाऱ्या शेतात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यात लोणारा, सेलू, साहुली, निंबोली, लिंगा, ऊपरवाही, आष्टीकला, खैरी, सोनेगाव, कोतवालबर्डी, तोंडाखैरी, बिल्लोरी, दहेगाव, सावली, आलेसुर, चीचभवन, केतापार, बोरगाव, गोंडखैरी आदी गावांचा समावेश आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राणी कळपाने शेतात दाखल होतात. शेतातील संत्रा झाडे, कपाशी, तूर, गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांची नासाडी करतात. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. परंतु ती भरपाई अत्यल्प असते. शिवाय ही भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एवढी मेहनत करूनही मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी हे काम टाळतात.

पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागते. दिवसभर राबल्यानंतर रात्री जागरण असा शेतकऱ्यांचा नित्यक्रम सुरू आहे. परंतु अशातही वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने पिके फस्त करण्याचा सपाटा प्राण्यांनी लावला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.