शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच या नव्या समस्येने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गत सहा वर्षात तालुक्यातील ९८९ शेतकऱ्यांना ९५ लाख ६० हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र करोडो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान या सहा वर्षात झालेले आहे. यामुळे आम्ही शेती करायची कशी, असा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अस्मानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. दिवसेंदिवस शेतीपासून काहीही फायदा होत नसताना कर्जाचा डोंगर मात्र वाढतच आहे. सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याने हे पिके न परवडणारी ठरत आहेत. शिवाय विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परिसरात जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी हैदोस घालत असून संत्रा उत्पादनापासून ते खरीप पिकापर्यंत उत्पादन होणे अवघड होत आहे.

तालुक्यातील निमजी व लिंगा बिटला लागून असणाऱ्या शेतात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यात लोणारा, सेलू, साहुली, निंबोली, लिंगा, ऊपरवाही, आष्टीकला, खैरी, सोनेगाव, कोतवालबर्डी, तोंडाखैरी, बिल्लोरी, दहेगाव, सावली, आलेसुर, चीचभवन, केतापार, बोरगाव, गोंडखैरी आदी गावांचा समावेश आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राणी कळपाने शेतात दाखल होतात. शेतातील संत्रा झाडे, कपाशी, तूर, गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांची नासाडी करतात. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. परंतु ती भरपाई अत्यल्प असते. शिवाय ही भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एवढी मेहनत करूनही मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी हे काम टाळतात.

पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागते. दिवसभर राबल्यानंतर रात्री जागरण असा शेतकऱ्यांचा नित्यक्रम सुरू आहे. परंतु अशातही वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने पिके फस्त करण्याचा सपाटा प्राण्यांनी लावला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.