शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच या नव्या समस्येने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गत सहा वर्षात तालुक्यातील ९८९ शेतकऱ्यांना ९५ लाख ६० हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र करोडो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान या सहा वर्षात झालेले आहे. यामुळे आम्ही शेती करायची कशी, असा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अस्मानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. दिवसेंदिवस शेतीपासून काहीही फायदा होत नसताना कर्जाचा डोंगर मात्र वाढतच आहे. सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याने हे पिके न परवडणारी ठरत आहेत. शिवाय विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परिसरात जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी हैदोस घालत असून संत्रा उत्पादनापासून ते खरीप पिकापर्यंत उत्पादन होणे अवघड होत आहे.

तालुक्यातील निमजी व लिंगा बिटला लागून असणाऱ्या शेतात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यात लोणारा, सेलू, साहुली, निंबोली, लिंगा, ऊपरवाही, आष्टीकला, खैरी, सोनेगाव, कोतवालबर्डी, तोंडाखैरी, बिल्लोरी, दहेगाव, सावली, आलेसुर, चीचभवन, केतापार, बोरगाव, गोंडखैरी आदी गावांचा समावेश आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राणी कळपाने शेतात दाखल होतात. शेतातील संत्रा झाडे, कपाशी, तूर, गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांची नासाडी करतात. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. परंतु ती भरपाई अत्यल्प असते. शिवाय ही भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एवढी मेहनत करूनही मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी हे काम टाळतात.

पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागते. दिवसभर राबल्यानंतर रात्री जागरण असा शेतकऱ्यांचा नित्यक्रम सुरू आहे. परंतु अशातही वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने पिके फस्त करण्याचा सपाटा प्राण्यांनी लावला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.