शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांचा हैदोस, शेती करायची कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:11 IST

विजय नागपुरे कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच ...

विजय नागपुरे

कळमेश्वर : जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी धुडगूस घालत असल्याने पिके उद्ध्वस्त होत आहेत. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा त्यातच या नव्या समस्येने कळमेश्वर तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गत सहा वर्षात तालुक्यातील ९८९ शेतकऱ्यांना ९५ लाख ६० हजार ५१९ रुपयांची नुकसान भरपाई वनविभागाकडून देण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र करोडो रुपयांच्या शेतमालाचे नुकसान या सहा वर्षात झालेले आहे. यामुळे आम्ही शेती करायची कशी, असा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी शासनाने १०० टक्के अनुदानावर सौरऊर्जेवरील तारेचे कुंपण उपलब्ध करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अस्मानी संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. दिवसेंदिवस शेतीपासून काहीही फायदा होत नसताना कर्जाचा डोंगर मात्र वाढतच आहे. सोयाबीन, कपाशी या नगदी पिकांना पुरेसा भाव मिळत नसल्याने हे पिके न परवडणारी ठरत आहेत. शिवाय विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे संत्रा बागा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच परिसरात जंगलालगतच्या शेतात वन्यप्राणी हैदोस घालत असून संत्रा उत्पादनापासून ते खरीप पिकापर्यंत उत्पादन होणे अवघड होत आहे.

तालुक्यातील निमजी व लिंगा बिटला लागून असणाऱ्या शेतात वन्य प्राण्यांचा सतत वावर असतो. त्यात लोणारा, सेलू, साहुली, निंबोली, लिंगा, ऊपरवाही, आष्टीकला, खैरी, सोनेगाव, कोतवालबर्डी, तोंडाखैरी, बिल्लोरी, दहेगाव, सावली, आलेसुर, चीचभवन, केतापार, बोरगाव, गोंडखैरी आदी गावांचा समावेश आहे. जंगलातील रोही, रानडुक्कर, हरिण आदी वन्य प्राणी कळपाने शेतात दाखल होतात. शेतातील संत्रा झाडे, कपाशी, तूर, गहू, हरभरा, पालेभाज्या या पिकांची नासाडी करतात. वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी वन विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. परंतु ती भरपाई अत्यल्प असते. शिवाय ही भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. एवढी मेहनत करूनही मोबदला अत्यल्प मिळत असल्याने शेतकरी हे काम टाळतात.

पिकांचे वन्यप्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेताची राखण करावी लागते. दिवसभर राबल्यानंतर रात्री जागरण असा शेतकऱ्यांचा नित्यक्रम सुरू आहे. परंतु अशातही वन्यप्राण्यांची संख्या अधिक असल्याने पिके फस्त करण्याचा सपाटा प्राण्यांनी लावला आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.