शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एक रुपयात बोलणे करवून देणारा कॉईन बॉक्स कुणी पाहिला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एक काळ होता, साधारण १५-२० वर्षापूर्वी सधन कुटुंबात, शासकीय नोकरदार वर्गीयांच्या घरी एका विशिष्ट कोपऱ्यात लॅण्डलाईन फोन असायचा. घरातील ही जागा घरी येणाऱ्या आगंतुकाचे लक्ष वेधेल, अशा तऱ्हेने सजवलेली असायची. घरात लॅण्डलाईन फोन असणे, हे अतिशय प्रतिष्ठेचे समजले जायचे. मोबाईलच्या आगमनानंतर प्रतिष्ठेचे समजले जाणारे हे फोन हळूहळू गायब झाले आणि आता केवळ संस्थागत कार्यालयांतच हे फोन आपले अस्तित्त्व जपून आहेत. एवढेच नव्हे तर दूरवर असलेल्या आपल्या नातेवाईकांंशी संवाद साधण्यासाठी एक रुपया टाकून संभाषण करवून देण्यास महत्त्वाचा बिंदू असणारे कॉईन बॉक्स तर अदृष्यच झाले आहेत. हे कॉईन बॉक्स कुठे दिसत असतील तर आजच फोटो काढावा आणि आपल्या सोशल मीडियाच्या वॉलवर अपलोड करावा, कारण तो जवळपास इतिहासजमा झालेला आहे.

नागपूरची लोकसंख्या ३५ ते ४० लाखाच्या घरात आहे आणि प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या हातात, अगदी जर्जर वृद्धाच्या हातात एक मोबाईल असतोच आणि एका कुटुंबात किमान एक तरी ॲण्ड्राईड म्हणा वा स्मार्टफोन आहेच. मोबाईल येण्याच्या आधी साधारणत: २ ते ३ टक्के लोकांच्या घरी लॅण्डलाईन होते. हे लॅण्डलाईन भारत संचार निगम कंपनीचेच होते. आता मात्र, ही संख्या अर्धा टक्काही असेल, याची शाश्वती नाही. विशेष म्हणजे, याबाबतची निश्चित अशी आकडेवारीही सांगता येत नाही. कारण, आता बीएसएनएलसोबतच वेगवेगळ्या कंपन्यांनी मोबाईल फोनसह इन बिल्ट कॉलरआयडी असलेले लॅण्डलाईन फोन उपलब्ध केले आहेत. मात्र, हे लॅण्डलाईन वापरणाऱ्यांची संख्या अगदीच तोकडी आहे. विशेष म्हणजे, अगदी कुठेही म्हणजे कुठेही तुमच्या सोबत मोबाईल राहत असल्याने, एकाच जागी खिळलेला असलेला लॅण्डलाईन फोन वापरायचाच कशाला, अस प्रश्न नागरिक उपस्थित करतात.

१० ते ५ नंतर कटकट नको

आजकाल मोबाईल असल्यामुळे, कुणी कधीही फोन करून माहिती विचारतो. वैयक्तिक आयुष्यातही कार्यालयाची लुडबूड सुरू होऊन जाते. त्यामुळे, लॅण्डलाईन फोन आवर्जुन लावण्यात आलेला आहे. कुणी मोबाईल नंबर मागितला तरी त्यांना कार्यालयाच्या लॅण्डलाईनवरच फोन करा आणि सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेतच फोन करण्यास सांगतो, असे एका संस्थेच्या पदाधिकाऱ्याने या विषयावर बोलताना सांगितले.

मोबाईल असल्यामुळे लॅण्डलाईनचे कनेक्शन कापले

आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आहे. प्री-पेड कनेक्शन असल्याने बिल भरण्याचा त्रागा नाही की अधामधात फोन बिघडण्यासाठी तक्रारीची झंझट नाही. आमच्याकडे पाच वर्षापूर्वीपर्यंत लॅण्डलाईन होता. नंतर ते कनेक्शन कापल्याचे श्रीकृष्णनगरातील विनायक देशपांडे यांनी सांगितले.

..............