शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी मोफत शिकवत असतील तर त्यात गैर काय?; राष्ट्रवादी आमदार संग्राम जगतापांचा सवाल
2
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
3
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
4
"आधार कार्ड अपडेट करून येते"; बहाणा सांगून लग्नाच्या १०व्या दिवशी पत्नी झाली फरार! सोबत नवऱ्याचे पैसेही नेले
5
ENG vs IND : भारतीय क्रिकेटमध्ये दुखवटा! मैदानात दोन्ही संघांतील खेळाडूंनी दिग्गज फिरकीपटूला वाहिली श्रद्धांजली
6
Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी
7
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
8
गब्बर सिंगला डायलॉग शिकवल्यावरुन ट्रोल होतायेत महागुरु, नक्की काय म्हणाले होते?; पाहा Video
9
Jyeshtha Amavasya 2025: घरातले आजारपण, भांडणतंटा काढता पाय घेत नसेल तर ज्येष्ठ अमावास्येला करा 'हे' उपाय!
10
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
11
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
12
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
13
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
14
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
15
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
17
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
18
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
19
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
20
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!

बावनकुळेंच्या रूपात स्वजिल्ह्यातील पालकमंत्री

By admin | Updated: December 27, 2014 03:02 IST

आघाडी सरकारच्या काळात गेली साडेचार वर्षे जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणून काम केले.

नागपूर : आघाडी सरकारच्या काळात गेली साडेचार वर्षे जिल्ह्याबाहेरील नेत्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणून काम केले. निवडणुकीच्या तोंडावर तीन चार महिन्यांसाठी डॉ. नितीन राऊत यांना संधी मिळाली. युती सरकारने मात्र नागपूर जन्मभूमी असलेल्या नेत्याला येथेच कर्मभूमीही बनविण्याची संधी दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात नागपूरला स्वजिल्ह्यातील पालकमंत्री मिळाले आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास तर मदत होईलच पण पक्ष संघटनेत महत्त्वाच्या पदावर काम केलेल्या नेत्याला संधी मिळाल्यामुळे भाजपलाही याचा फायदा होणार आहे. पालकमंत्री हे जिल्हा पातळीवरील विविध समित्यांचे अध्यक्ष असतात. तालुका स्तरावरील समित्या नेमण्याचे अधिकार त्यांना असतात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीचेही अध्यक्षपद त्यांच्याकडे असते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रूपात नागपुरातील व्यक्तीलाच पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यामुळे आता जिल्हा पातळीवर विविध बैठका, निर्णय त्वरित घेण्यास मदत होणार असून विकासालाही चालना मिळेल. शिवाजीराव मोघे पालकमंत्री असताना त्यांना नागपूरसह आपल्या मतदारसंघाकडेही लक्ष द्यावे लागत होते. त्यांचा अधिक वेळ यवतमाळमध्ये जायचा. आता बावनकुळे गृह जिल्ह्याचेच पालकमंत्री झाल्यामुळे त्यांना मतदारसंघासोबतच पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकासासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांनाही मिळणार पालकत्व बावनकुळे यांच्या पालकमंत्रिपदाचा जिल्ह्याला जसा फायदा होईल, तसाच भाजपलाही फायदा होईल. आघाडी सरकारच्या काळात महामंडळे तर सोडाच पण साध्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखील शंभर टक्के नियुक्त्या होऊ शकल्या नाहीत. शिवाजीराव मोघे पालकमंत्री म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांना पाहिजे तसा न्याय देऊ शकले नाही. त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता कमजोर झाला व पर्यार्याने पक्षाला उतरती कळा लागली. बावनकुळे यांनी पक्षसंघटनेत जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेत भाजपचा झेंडा फडकला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची हे त्यांना चांगलेच ठावूक आहे. जिल्हा व तालुका पातळीवर सर्व महत्त्वाच्या समित्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी बावनकुळे जोर लावतील यात शंका नाही. त्यामुळे भाजपची तादक वाढण्यासही मदत होणार आहे.