शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जयघोषाने अंबर गर्जले

By admin | Updated: September 16, 2016 03:10 IST

दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य

बाप्पांना निरोप : तलावांवर भाविकांची गर्दी, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष नागपूर : दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य पेरणाऱ्या बाप्पांना आज गुरुवारी अनंत चतुर्दशीला नागपूरकरांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. शहरातील गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव,पोलीस लाईन तलावाच्या काठावर धूपबत्तीचा स्वर्गीय दरवळ अन् आरतीच्या गजरात बाप्पांचे मोहक रूप डोळ्यात साठवून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा होता. शहरातील जलाशयांकडे जाणाऱ्या प्रमुख विसर्जन मार्गांना तर जणू जत्रेचे स्वरूप आले होते. घरगुती व सार्वजनिक गणपतींना तलावाकडे घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दिसत होत्या. नागपुरातील फुटाळा तलावावर सकाळी ९ वाजतापासून सर्वप्रथम घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. कुणी सायकलवर, कुणी सायकलरिक्षामध्ये बसून तर कुणी कारमधून बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन आले होते. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा गर्जनेत आबालवृद्धांच्या उत्साहाने जणू भक्तीचा महापूर ओसंडूून वाहत होता. लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर तो गावाला जात असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक भक्तांची धडपड सुरू होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टीक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. रिद्धी-सिद्धीसह बुद्धीचा देवता असलेल्या बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरला. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली. बाप्पाला अखेरचा निरोप देऊन विघ्न दूर कर बाप्पा, अशी मनोकामना करीत भाविकांनी परतीचा मार्ग धरला. मोजक्या पण जागरूक नागरिकांचा प्रतिसाद ४गणेश विसर्जनप्रसंगी पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने थोडे निराश करणारे वातावरण आज शहरातील सर्वच तलावांवर दिसले. पण, यातही काही सन्मानजनक अपवाद होतेच. पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मोजक्या पण सामाजिक कर्तव्याप्रति जागरूक नागरिकांनी तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यायी कुंडांत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. मूर्तीसोबतचे निर्माल्यही आवर्जून स्वयंसेवी संस्थांच्या हवाली केले.