शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जयघोषाने अंबर गर्जले

By admin | Updated: September 16, 2016 03:10 IST

दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य

बाप्पांना निरोप : तलावांवर भाविकांची गर्दी, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष नागपूर : दहा दिवस घरी मुक्कामाला आलेल्या व आपल्या पावन सानिध्याने भाविकांच्या मनात नवे चैतन्य पेरणाऱ्या बाप्पांना आज गुरुवारी अनंत चतुर्दशीला नागपूरकरांनी साश्रूनयनांनी निरोप दिला. शहरातील गांधीसागर, फुटाळा, सक्करदरा, नाईक तलाव,पोलीस लाईन तलावाच्या काठावर धूपबत्तीचा स्वर्गीय दरवळ अन् आरतीच्या गजरात बाप्पांचे मोहक रूप डोळ्यात साठवून मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् तरुणाईचा जल्लोष पाहण्यासारखा होता. शहरातील जलाशयांकडे जाणाऱ्या प्रमुख विसर्जन मार्गांना तर जणू जत्रेचे स्वरूप आले होते. घरगुती व सार्वजनिक गणपतींना तलावाकडे घेऊन येणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा सर्वत्र दिसत होत्या. नागपुरातील फुटाळा तलावावर सकाळी ९ वाजतापासून सर्वप्रथम घरगुती गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. कुणी सायकलवर, कुणी सायकलरिक्षामध्ये बसून तर कुणी कारमधून बाप्पांना विसर्जनासाठी घेऊन आले होते. ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण अन् ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले. गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला अशा गर्जनेत आबालवृद्धांच्या उत्साहाने जणू भक्तीचा महापूर ओसंडूून वाहत होता. लाडक्या बाप्पाची सेवा केल्यानंतर तो गावाला जात असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक भक्तांची धडपड सुरू होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टीक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. रिद्धी-सिद्धीसह बुद्धीचा देवता असलेल्या बाप्पाचा मुक्काम घरात चैतन्य निर्माण करणारा ठरला. त्याचे आगमनच जीवनातील दु:ख दूर करते, अशी भावना विसर्जन करण्यासाठी आलेल्या अनेक गणेशभक्तांनी यावेळी व्यक्त केली. बाप्पाला अखेरचा निरोप देऊन विघ्न दूर कर बाप्पा, अशी मनोकामना करीत भाविकांनी परतीचा मार्ग धरला. मोजक्या पण जागरूक नागरिकांचा प्रतिसाद ४गणेश विसर्जनप्रसंगी पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने थोडे निराश करणारे वातावरण आज शहरातील सर्वच तलावांवर दिसले. पण, यातही काही सन्मानजनक अपवाद होतेच. पर्यावरणप्रेमी संस्था, महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद मोजक्या पण सामाजिक कर्तव्याप्रति जागरूक नागरिकांनी तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन न करता पर्यायी कुंडांत विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. मूर्तीसोबतचे निर्माल्यही आवर्जून स्वयंसेवी संस्थांच्या हवाली केले.