शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
5
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
6
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
7
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
8
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
9
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
10
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
11
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
12
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
13
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
14
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
15
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
16
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
17
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
18
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
19
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
20
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक

दुसऱ्याच्या खात्यात जमा केले अनुदान

By admin | Updated: June 9, 2017 02:38 IST

जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी १.५० कोटी रुपयांची आर्थिक मदत ३०८ लाभार्थ्यांना देण्यात आली.

आंतरजातीय विवाह योजना : लाभार्थ्याच्या समाजकल्याण विभागात येरझाऱ्यालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जि.प.च्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी १.५० कोटी रुपयांची आर्थिक मदत ३०८ लाभार्थ्यांना देण्यात आली. एका जाहीर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करुन दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. या दाम्पत्याच्या बॅँक खात्यात ५० हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. परंतु या योजनेतील एका लाभार्थ्यांला प्रशासनाच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षाचा फटका बसला आहे. वर्षभरापूर्वी या लाभार्थ्याचे अनुदान दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले . तेव्हापासून लाभार्थी समाजकल्याण विभागाच्या येरझाऱ्या मारत आहे. संतोष राजेश्वर दलाल असे लाभार्थ्याचे नाव असून, तो उमरेड येथील रहिवासी आहे. २०१५ मध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळण्यासाठी समाजकल्याण विभागाला अर्ज केला होता. २०१६ मध्ये त्याला अनुदान मंजूर करण्यात आले. परंतु त्याला अद्यापही अनुदान मिळाले नाही. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते योजनेचे अनुदान त्याच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. परंतु त्याच्या बँक खात्यात अशी कुठलीही रक्कम जमा झालेली नाही. अर्ज करताना दलाल यांनी स्टेट बँक आॅफ इंडियाच्या उमरेड शाखेचा अकाऊंट नंबर जोडला होता. परंतु विभागातर्फे त्यांना सांगण्यात आले की, अनुदान हे युको बँक सिर्सी येथील खात्यात जमा करण्यात आले. परंतु लाभार्थ्याचे या बँकेत खातेच नाही. विभागाच्या चुकीमुळे दुसऱ्याच्या खात्यात गेलेले अनुदान त्याला मिळावे, या मागणीसाठी तो विभागाच्या चकरा मारत आहे. जि.प.चे सदस्य शिवकुमार यादव यांनी २२ डिसेंबर २०१६ ला याप्रकरणात लेखी तक्रार केली होती. परंतु अद्यापही कुठलीच कारवाई झालेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.