शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
5
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
6
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
7
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
8
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
9
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
10
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
11
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
12
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
13
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
14
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
15
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
16
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
17
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
18
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
19
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
20
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या

कळमन्यात धान्य भिजले, शेतकरी व व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:12 IST

नागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी ...

नागपूर : कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य बाजारात १६ फेब्रुवारीला आलेल्या अवकाळी पावसाने, खुल्या परिसरात ठेवलेले शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे धान्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याकरिता कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक आणि अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हवामान खात्याने तीन दिवस पाऊस येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर बाजार समितीने धान्य खळ्यात ठेवण्याचे आवाहन केले होते. पण सर्व खळे धान्याने भरल्याने त्यात अतिरिक्त माल ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे बाहेर ठेवलेले धान्य भिजले. अशा धान्याची किंमत कमी होऊन व्यापारी खरेदी करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे.

कळमना धान्य अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, वर्षभरात १५ पेक्षा जास्त वेळ अवकाळी पाऊस येतो. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे परिसरातील धान्य भिजून लाखो रुपयांचे नुकसान होते. सध्या बाजारात चना, तूर, गहू आणि सोयाबीनची आवक आहे. त्यातच चना आणि तुरीची दररोज ५ ते ६ हजारांपेक्षा जास्त पोती येत आहेत. कळमन्यात धान्यासाठी १२ खळे असून दोन खळ्यांमध्ये ४० फुटांचा रोड आहे. शेतकऱ्यांचे धान्य नेहमीच भिजत असल्याने असोसिएशन बाजार समितीकडे दोन खळ्यांच्या मधल्या जागेत पारदर्शक डोम उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत आहे. पण समिती याकडे दुर्लक्ष करीत आहे. पारदर्शक शीटांचे डोम उभारल्यास ऊन येईल आणि धान्य भिजणार नाही. याकरिता जवळपास दीड कोटींचा खर्च येणार आहे. असाच प्रयोग औरंगाबाद, जालना आणि अमरावती बाजार समितीत करण्यात आला आहे. ही माहिती असतानाही बाजार समिती डोम उभारण्यास तयार नाही. वर्षभरात अवकाळी पावसाने १५ ते २० वेळा परिसरात धान्य भिजल्याच्या घटना घडतात. त्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आता प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी, अशी मागणी सेनाड यांनी केली आहे.