शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
3
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
4
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
5
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
6
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
7
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
8
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
9
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
10
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
12
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
13
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
14
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
15
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
16
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
17
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
18
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
19
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
20
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय

धानाचे उत्पादन अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सुरुवातीला पीक समाधानकारक असल्याने रामटेक तालुक्यात धानाचे उत्पादन चांगले हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सुरुवातीला पीक समाधानकारक असल्याने रामटेक तालुक्यात धानाचे उत्पादन चांगले हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, रेंगाळलेला परतीचा पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात झालेला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव यामुळे धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. उत्पादनखर्च वाढून उत्पन्न घटल्याने पीककर्जाची परतफेड करायची कशी, ही चिंता धान उत्पादकांना भेडसावत आहे.

यावर्षी धानाची राेवणी वेळेवर झाली. समाधानकारक पाऊस बरसल्याने पिकाची स्थितीही चांगली हाेती. ओलितासाठी पेंच जलाशयाचे पाणीही वेळेवर व मुबलक उपलब्ध झाले. शिवाय, बाजारात रासायनिक खतांची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पीक जाेमदार हाेते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वादळी पावसामुळे पीक जमीनदाेस्त झाले हाेते. त्यातच धानाचे पीक निसवायला सुरुवात हाेताच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला. उपाययाेजना करूनही तुडतुडे नियंत्रणात आले नाही. आपल्याला एकरी २० ते २२ क्विंटल धानाचे उत्पादन हाेण्याची आशा हाेती. मात्र, एकरी १० क्विंटल उत्पादन झाल्याचे हिवरा (भेंडे) येथील कमलेश वैद्य यांनी सांगितले. वादळी पावसामुळे धानाचे पीक जमीनदाेस्त झाल्याने तसेच फवारणी करूनही तुडतुडे नियंत्रणात न आल्याने उत्पादन घटल्याची माहिती महादुला येथील धनराज झाडे यांनी दिली.

---

एकरी १० क्विंटल उतारी

रामटेक तालुक्यात दरवर्षी धानाचे सरासरी २० क्विंटल उत्पादन हाेते. यावर्षी ते वाढण्याची आशा पल्लवित झाली हाेती. परंतु, परतीचा पाऊस व तुडतुड्यांचा प्रादुर्भावामुळे वास्तवात शेतकऱ्यांना धानाचे सरासरी एकरी १० क्विंटल उत्पादन झाले आहे. धानाला बाजारात चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी केवळ उत्पादन खर्च भरून निघाल्याचे सांगितले.

---

शासकीय धान खरेदी सुरू

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. शिवाय, ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनसही जाहीर केला आहे. हा बाेनस किती क्विंटलपर्यंत दिला जाणार आहे, हे स्पष्ट न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, खुल्या बाजारात धानाच्या दरामध्ये तेजी आली आहे. परंतु, व्यापारी वेळेवर चुकारे देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.