शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे उत्पादन अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : सुरुवातीला पीक समाधानकारक असल्याने रामटेक तालुक्यात धानाचे उत्पादन चांगले हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रामटेक : सुरुवातीला पीक समाधानकारक असल्याने रामटेक तालुक्यात धानाचे उत्पादन चांगले हाेण्याची आशा पल्लवित झाली हाेती. मात्र, रेंगाळलेला परतीचा पाऊस आणि शेवटच्या टप्प्यात झालेला तुडतुड्यांचा प्रादुर्भाव यामुळे धानाचे उत्पादन अर्ध्यावर आले आहे. उत्पादनखर्च वाढून उत्पन्न घटल्याने पीककर्जाची परतफेड करायची कशी, ही चिंता धान उत्पादकांना भेडसावत आहे.

यावर्षी धानाची राेवणी वेळेवर झाली. समाधानकारक पाऊस बरसल्याने पिकाची स्थितीही चांगली हाेती. ओलितासाठी पेंच जलाशयाचे पाणीही वेळेवर व मुबलक उपलब्ध झाले. शिवाय, बाजारात रासायनिक खतांची कमतरता जाणवली नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात पीक जाेमदार हाेते. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वादळी पावसामुळे पीक जमीनदाेस्त झाले हाेते. त्यातच धानाचे पीक निसवायला सुरुवात हाेताच तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाला. उपाययाेजना करूनही तुडतुडे नियंत्रणात आले नाही. आपल्याला एकरी २० ते २२ क्विंटल धानाचे उत्पादन हाेण्याची आशा हाेती. मात्र, एकरी १० क्विंटल उत्पादन झाल्याचे हिवरा (भेंडे) येथील कमलेश वैद्य यांनी सांगितले. वादळी पावसामुळे धानाचे पीक जमीनदाेस्त झाल्याने तसेच फवारणी करूनही तुडतुडे नियंत्रणात न आल्याने उत्पादन घटल्याची माहिती महादुला येथील धनराज झाडे यांनी दिली.

---

एकरी १० क्विंटल उतारी

रामटेक तालुक्यात दरवर्षी धानाचे सरासरी २० क्विंटल उत्पादन हाेते. यावर्षी ते वाढण्याची आशा पल्लवित झाली हाेती. परंतु, परतीचा पाऊस व तुडतुड्यांचा प्रादुर्भावामुळे वास्तवात शेतकऱ्यांना धानाचे सरासरी एकरी १० क्विंटल उत्पादन झाले आहे. धानाला बाजारात चांगला भाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काहींनी केवळ उत्पादन खर्च भरून निघाल्याचे सांगितले.

---

शासकीय धान खरेदी सुरू

राज्य शासनाने आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून तालुक्यात शासकीय धान खरेदी केंद्र सुरू केले आहेत. शिवाय, ७०० रुपये प्रति क्विंटल बाेनसही जाहीर केला आहे. हा बाेनस किती क्विंटलपर्यंत दिला जाणार आहे, हे स्पष्ट न केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे, खुल्या बाजारात धानाच्या दरामध्ये तेजी आली आहे. परंतु, व्यापारी वेळेवर चुकारे देत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.