शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
3
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
4
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
5
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
6
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
7
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
8
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
9
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
10
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
11
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
12
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
13
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
14
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
15
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
16
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
17
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
18
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
19
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
20
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया

कायदा व सुव्यवस्था राखणे शासनाची जबाबदारी

By admin | Updated: December 12, 2014 00:31 IST

राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे शासनाची जबाबदारी असून शासन यात अपयशी ठरल्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वारसदारांना भरपाई देणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च

हायकोर्ट : नाथजोगी हत्याकांडात भरपाईचे आदेशनागपूर : राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे शासनाची जबाबदारी असून शासन यात अपयशी ठरल्यामुळे कुणाचा मृत्यू झाल्यास संबंधित वारसदारांना भरपाई देणे आवश्यक आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केले.राज्यभर गाजलेल्या नाथजोगी हत्याकांडासंदर्भात समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी या हत्याकांडातील वारसदारांना भरपाई मंजूर करताना शासनाचे कान टोचले. नाथजोगी हत्याकांडातील वारसदारांच्या नावाने बँकेत खाते उघडून त्यात १ डिसेंबर २००८ रोजीच्या शासन निर्णयानुसार येत्या आठ आठवड्यांत भरपाई जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. शासन निर्णयात ८ वर्षांखालील वारसदारांना २५ हजार, ८ ते १८ वर्षे वयोगटातील वारसदारांना ५० हजार, तर १८ ते ६५ वर्षे वयोगटातील वारसदारांना ५ लाख रुपये भरपाई देण्याची तरतूद आहे.नाथजोगी समाजातील नागरिक महिलांची वेशभूषा करून उन्हाळ्यामध्ये विविध शहरांत भिक्षा मागतात. २०१२ मध्ये हे हत्याकांड घडले तेव्हा नागपुरात चोऱ्यांचे सत्र सुरू होते. नागरिक धास्तावलेले होते. कळमना हद्दीतील भरतवाडा येथे चार नाथजोगी महिलांची वेशभूषा करीत असताना ते चोर असल्याची अफवा परिसरात पसरली. नागरिकांनी एकत्र येऊन चौघांवरही हल्ला चढवला. या हल्ल्यात हसन दादाराव सोलंकी (२५), पंजाब भिका शिंदे (३०) व स्कूदा भगत नागनाथ (४५) हे तिघे जागीच ठार झाले, तर पंजाबराव सोलंकी (४०) कसाबसा वाचला. चारही नाथजोगी बुलडाणा जिल्ह्यातील मोहिदेपूर (ता. जळगाव जामोद) येथून आले होते. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)