शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

राज्यातील लॉकडाऊनची तयारी हे सरकारचे षडयंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:07 IST

नागपूर : राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची राज्य सरकारची तयारी हे महाविकास आघाडीचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचा धसका ...

नागपूर : राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लावण्याची राज्य सरकारची तयारी हे महाविकास आघाडीचे षडयंत्र आहे. केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनाचा धसका घेतला आहे. राज्यातील शेतकरी पेटून उठू नये यासाठी केंद्राशी हातमिळावणी करून महाविकास आघाडी सरकार लॉकडाऊनची तयारी करत आहे, असा आरोप किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रासंदर्भात माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. राज्यातील शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्य जनतेचे मोर्चे टाळण्यासाठी महाविकास आघाडी सरकार लॉकडाऊन लावून पळवाट शोधू पहात आहे. कोरोनाचे कारण देत मुख्यमंत्र्यांनी वर्षभर स्वत:ला जनतेपासून दूर ठेवले. जनतेला तोंड दाखवायचे नसल्याने नोकरशाहीच्या हातात कोरोनाचे हत्यार मिळाले आहे. अधिवेशन थोडक्यात गुंडाळण्यासाठी सल्लागारांच्या म्हणण्यावरून कोरोनाच्या कृत्रिम रुग्णावाढीची आकडेवारी दाखवली जात आहे. प्रत्यक्षात कोरोना हे एक नाटक असृून सरकारने त्याचा वापर आपल्या हितासाठी केल्याचा आरोप त्यांनी केला. अनलॉकनंतर राज्य सरकारने योग्य धोरण न आखल्याने राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यात आणि देशात राजकीय पक्षांचे मेळावे, निवडणुका, विवाह समारंभ लाखों-हजारोंच्या उपस्थितीत होत आहे. दिल्लीत लाखो शेतकरी एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे. तिथे कोरोनाचा उद्रेक होत नाही तर जनतेच्या प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी हा उद्रेक आहे. मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे अमलात आणत आहे. यामुळे देशातील शेतकरी तीन महिन्यांपासून दिल्लीत शांततेने आंदोलन करीत आहे. असे असूनही राज्यातील सरकारची शेतकऱ्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही. यवतमाळात होऊ घातलेली सभा दबावतंत्र वापरून सरकारने उधळली. त्यामुळे हे सरकार काळ्या कायद्यासोबत की शेतकऱ्यांसोबत आहे, हे स्पष्ट व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. पत्रकार परिषदेला किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अविनाश काकडे, आरटीआय कार्यकर्ता मोनित जबलपुरे, निवृत्त सैनिक शेषराव मरोडिया आणि राजू मिश्रा उपस्थित होते.