शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: August 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विजय वडेट्टीवार : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी कायद्याला विरोध नागपूर : महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहेत, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. वडेट्टीवार म्हणाले, कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. यातील तरतुदीनुसार कोणत्याही मागणीसाठी, सरकारविरोधात मोर्चा काढण्यासाठी वा एखाद्या समारंभासाठी १०० पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. एखाद्याच्या घरी लग्नापासून अंत्ययात्रेपर्यंत कोणत्याही समारंभात १०० पाहुणे येणार असतील तर त्यांची नावांसह यादी पोलिसांना द्यावी लागेल़ त्यापेक्षा जास्त लोक आले तर तो गुन्हा ठरेल़ परवानगी न घेता आंदोलन केले तर आंदोलन करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल़ आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवून कारवाई करण्याचीही भीती आहे. तीन वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात आहे़ पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकारी मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल असा, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे़ सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मोर्चा काढता येतो़ मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकार हा अधिकारही काढून घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांसह सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार हा नवा कायदा करीत आहे़ मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो प्रसिद्धही करण्यात आला आहे़ संख्याबळाच्या आधारावर कायदा मंजूर करण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ पत्रपरिषदेला काँग्रेसचे नेते रवींद्र दरेकर, किशोर जिचकार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना पत्र देऊयापूर्वी सरकारने राजकीय नेत्यांवर टीका करणे देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढले होते़ तो डाव फसल्यामुळे आता जनतेचा असंतोष चिरडण्यासाठी नव्या कायद्याचा घाट घातला जात आहे़ काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. पक्षातर्फे कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार आहोत. गरज पडल्यास याविरोधात जनआंदोलन उभारू आणि विधिमंडळात आणि रस्त्यावर लढा दिला जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. आक्षेप मागविणे केवळ फार्सराज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविले आहेत. मात्र अशाप्रकारे केवळ आक्षेप मागवायचे आणि आपल्या मनाप्रमाणे कायदे करायचे, असे धोरण सरकारने चालविले आहे. आक्षेप मागविणे हा केवळ सरकारचा दिखावा असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. नीतेश राणेंच्या भूमिके शी पक्षाचा संबंध नाहीस्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच नागपुरातील दौऱ्यात विदर्भवाद्यांवर हल्लाबोल करीत अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती. याविषयी विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले, नीतेश राणे यांचे वक्तव्य व्यक्तिगत आहे. त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही.