शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: August 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विजय वडेट्टीवार : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी कायद्याला विरोध नागपूर : महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहेत, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. वडेट्टीवार म्हणाले, कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. यातील तरतुदीनुसार कोणत्याही मागणीसाठी, सरकारविरोधात मोर्चा काढण्यासाठी वा एखाद्या समारंभासाठी १०० पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. एखाद्याच्या घरी लग्नापासून अंत्ययात्रेपर्यंत कोणत्याही समारंभात १०० पाहुणे येणार असतील तर त्यांची नावांसह यादी पोलिसांना द्यावी लागेल़ त्यापेक्षा जास्त लोक आले तर तो गुन्हा ठरेल़ परवानगी न घेता आंदोलन केले तर आंदोलन करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल़ आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवून कारवाई करण्याचीही भीती आहे. तीन वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात आहे़ पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकारी मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल असा, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे़ सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मोर्चा काढता येतो़ मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकार हा अधिकारही काढून घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांसह सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार हा नवा कायदा करीत आहे़ मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो प्रसिद्धही करण्यात आला आहे़ संख्याबळाच्या आधारावर कायदा मंजूर करण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ पत्रपरिषदेला काँग्रेसचे नेते रवींद्र दरेकर, किशोर जिचकार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना पत्र देऊयापूर्वी सरकारने राजकीय नेत्यांवर टीका करणे देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढले होते़ तो डाव फसल्यामुळे आता जनतेचा असंतोष चिरडण्यासाठी नव्या कायद्याचा घाट घातला जात आहे़ काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. पक्षातर्फे कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार आहोत. गरज पडल्यास याविरोधात जनआंदोलन उभारू आणि विधिमंडळात आणि रस्त्यावर लढा दिला जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. आक्षेप मागविणे केवळ फार्सराज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविले आहेत. मात्र अशाप्रकारे केवळ आक्षेप मागवायचे आणि आपल्या मनाप्रमाणे कायदे करायचे, असे धोरण सरकारने चालविले आहे. आक्षेप मागविणे हा केवळ सरकारचा दिखावा असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. नीतेश राणेंच्या भूमिके शी पक्षाचा संबंध नाहीस्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच नागपुरातील दौऱ्यात विदर्भवाद्यांवर हल्लाबोल करीत अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती. याविषयी विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले, नीतेश राणे यांचे वक्तव्य व्यक्तिगत आहे. त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही.