शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
5
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
7
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
8
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
9
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
10
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
11
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
12
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
13
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
14
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
15
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
16
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
17
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
18
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
19
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
20
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात आणीबाणी लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न

By admin | Updated: August 27, 2016 02:17 IST

महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विजय वडेट्टीवार : महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी कायद्याला विरोध नागपूर : महाराष्ट्र सरकारने नुकताच महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटर्नल सिक्युरिटी हा नवा कायदा अमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. या कायद्याद्वारे सामान्य माणसाचा जगण्याचा हक्क हिरावण्याचा बेत आहे. लोकशाही असलेल्या देशात सरकार विरोधकांचाच नव्हे तर सामान्य माणसांचाही आवाज दाबण्याच्या प्रयत्नात आणीबाणी लागू करीत आहेत, असा घणाघाती आरोप प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. वडेट्टीवार म्हणाले, कायद्यातील अटी सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणाऱ्या आहेत. यातील तरतुदीनुसार कोणत्याही मागणीसाठी, सरकारविरोधात मोर्चा काढण्यासाठी वा एखाद्या समारंभासाठी १०० पेक्षा जास्त लोक एकत्र येत असल्यास पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. एखाद्याच्या घरी लग्नापासून अंत्ययात्रेपर्यंत कोणत्याही समारंभात १०० पाहुणे येणार असतील तर त्यांची नावांसह यादी पोलिसांना द्यावी लागेल़ त्यापेक्षा जास्त लोक आले तर तो गुन्हा ठरेल़ परवानगी न घेता आंदोलन केले तर आंदोलन करणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल़ आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवून कारवाई करण्याचीही भीती आहे. तीन वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद यात आहे़ पोलिसांना कायदेभंगाचा संशय आला तर थेट तुरुंगात टाकण्याचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. या कायद्यामुळे पोलिसांना अमर्याद अधिकारी मिळतील व यातून भ्रष्टाचार फोफावेल असा, असा धोका वडेट्टीवार यांनी वर्तविला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे़ सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात मोर्चा काढता येतो़ मात्र या कायद्याच्या माध्यमातून सरकार हा अधिकारही काढून घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. विरोधकांसह सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबण्यासाठी भाजप सरकार हा नवा कायदा करीत आहे़ मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून तो प्रसिद्धही करण्यात आला आहे़ संख्याबळाच्या आधारावर कायदा मंजूर करण्याचा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी अधोरेखित केले़ पत्रपरिषदेला काँग्रेसचे नेते रवींद्र दरेकर, किशोर जिचकार आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांना पत्र देऊयापूर्वी सरकारने राजकीय नेत्यांवर टीका करणे देशद्रोह ठरेल असे परिपत्रक काढले होते़ तो डाव फसल्यामुळे आता जनतेचा असंतोष चिरडण्यासाठी नव्या कायद्याचा घाट घातला जात आहे़ काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्याचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. पक्षातर्फे कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार आहोत. गरज पडल्यास याविरोधात जनआंदोलन उभारू आणि विधिमंडळात आणि रस्त्यावर लढा दिला जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला. आक्षेप मागविणे केवळ फार्सराज्य सरकारने कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वी नागरिकांकडून आक्षेप मागविले आहेत. मात्र अशाप्रकारे केवळ आक्षेप मागवायचे आणि आपल्या मनाप्रमाणे कायदे करायचे, असे धोरण सरकारने चालविले आहे. आक्षेप मागविणे हा केवळ सरकारचा दिखावा असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली. नीतेश राणेंच्या भूमिके शी पक्षाचा संबंध नाहीस्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी नुकतीच नागपुरातील दौऱ्यात विदर्भवाद्यांवर हल्लाबोल करीत अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्यासह विदर्भवाद्यांचे हातपाय तोडण्याची भाषा केली होती. याविषयी विचारले असता विजय वडेट्टीवार म्हणाले, नीतेश राणे यांचे वक्तव्य व्यक्तिगत आहे. त्यांच्या वक्तव्याचा काँग्रेस पक्षाशी संबंध नाही.