शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

शासनाने थकवले वकिलाचे पारिश्रमिक

By admin | Updated: October 19, 2015 02:50 IST

शासनाने पारिश्रमिक थकविल्यामुळे एका सहायक सरकारी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.

हायकोर्टाची नोटीस : कर्करोगावर उपचारासाठी गरजनागपूर : शासनाने पारिश्रमिक थकविल्यामुळे एका सहायक सरकारी वकिलाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, आरोग्य संचालक व आरोग्य उपसंचालक नागपूर यांना नोटीस बजावून २१ आॅक्टोबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.संतोष सूर्यवंशी असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते कर्करोगग्रस्त आहेत. त्यांचे २ लाख ५९ हजार रुपये पारिश्रमिक शासनाकडे थकित आहे. ही रक्कम १८ टक्के व्याजासह परत मिळावी, अशी त्यांची विनंती आहे. ते नागपुरातील न्यायालयांमध्ये १९९७ पासून वकिली व्यवसाय करीत आहेत. सात वर्षे व्यवसाय केल्यानंतर शासनाने त्यांची जिल्हा न्यायालयासाठी विधी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. २३ जून १९९८ रोजी परिपत्रक जारी करून जिल्हा सरकारी वकील व सहायक सरकारी वकील यांचे ३५०० रुपये प्रति प्रकरण पारिश्रमिक निश्चित करण्यात आले आहे. सूर्यवंशी यांनी ५६ प्रकरणांची विस्तृत माहिती शासनाकडे सादर केली आहे. परंतु, या प्रकरणांचे पारिश्रमिक त्यांना अद्यापही मिळाले नाही. कर्करोगामुळे त्यांची अन्ननलिका काढून टाकण्यात आली आहे. यावर मोठा खर्च झाला आहे. पारिश्रमिक मिळण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहिले पण, त्याचा काहीच फायदा झाला नाही, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अरुण पाटील तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)