शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सरकारला संवैधानिक जबाबदारीबाबत समज देण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:10 IST

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोचार्ची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी. नागपूर : राज्य सरकारची एकूणच कार्यपद्धती महाराष्ट्रातील संवैधानिक मागासवर्गीय घटकाबाबत ...

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोचार्ची राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मागणी.

नागपूर : राज्य सरकारची एकूणच कार्यपद्धती महाराष्ट्रातील संवैधानिक मागासवर्गीय घटकाबाबत आकसाची दिसून येत आहे. एका विशिष्ट समाजाबाबत विशेष ममत्वाभोवतीच सर्व प्रक्रिया दिसून येत आहे. रिक्त पद भरती व एससी-एसटी पदोन्नतीतील आरक्षण थांबविले, ही राज्य सरकारची असंवैधानिक भूमिका आहे. त्यामुळे सरकारला संवैधानिक जबाबदारीबाबत समज देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आले.

निवडणूक आयोगाच्या मूर्खपणामुळे राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षित गटाची पदसंख्या ५० टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसीचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला. याबाबतही राज्य सरकारने विशेष भूमिका घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीबाबत इच्छुक ओबीसी उमेदवारात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग व राज्य सरकार याबाबत जोपर्यंत तोडगा काढत नाही, तोपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका थांबविण्याबाबत सूचना करावी, अशीही मागणी राज्यपालांकडे करण्यात आली. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्यास राज्यपाल नियुक्त विधान परिषदेचे सदस्य म्हणून मान्यता देण्यात येऊ नये, अशीही मागणी करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळात राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी, भूषण दडवे, असलम खातमी, राम वाडीभस्मे आदी उपस्थित होते.