शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार

By admin | Updated: August 17, 2015 02:48 IST

नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

नागपूर - नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच प्रशासन कामाला लागले आहे. क्षतिग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानापोटी ४८ हजार १७७ क्षतिग्रस्त व्यक्तींना एकूण ५ कोटी ३८ लाख ३ हजार ९० रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरात वाहून मृत्यू झालेल्या जरिपटक्याच्या कस्तुरबानगरातील रेखा अनंत नेवारे व काचीपुरा येथील मुलुखराज भीमाजी मसराम यांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच प्रत्येकी चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेशही सोपविला. नागपूर शहरात कस्तुरबानगर, रिमा नगर, गोदावरी नगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्य नगर, वेले नगर, पांडुरंग नगर, काचीपुरा, सोनिया गांधी नगर भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सोमवारी वनदेवी नगर, संघर्ष नगर आणि पांढराबोडी येथे सर्वेक्षणासाठी चमू पाठविण्यात येणार आहे. यासाठी काटोल, उमरेड, हिंगणा व नरखेड तालुक्यातील ३४ तलाठी नागपुरात सर्वेक्षणासाठी युद्धपातळीवर कामाला लावले आहेत. नागपूर शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घरांच्या स्थलांतरापोटी १० कोटी रुपयांची खावटी ३५ हजार कुटुंबांना मिळेल. नागपूर शहरासाठी ३५ लाख ९५ हजार रुपये खावटीची रक्कम मंजूर झाली असून सोमवारी ती बँकेत जमा होईल. नागपूर ग्रामीण भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार उमरेड उपविभागात अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ६९९ घरांच्या ३९९ लोकांना ६ लाख३ हजार ९०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे तर दोन मृतांच्या नातेवाईकांन ८ लाख रुपयाची मदत देण्यात येत आहे. मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा१३ आॅगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेले नुकसान व पूरग्रस्तांच्या व्यथांकडे प्रशसानाचे लक्ष वेधले. लोकमतच्या पुढाकाराने शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पूरपरिस्थितीची माहिती घेऊन मुंबईवरून सूचना देत होते. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात सावनेर तालुक्यातील ११ हजार ४६९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.