शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार

By admin | Updated: August 17, 2015 02:48 IST

नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

नागपूर - नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच प्रशासन कामाला लागले आहे. क्षतिग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानापोटी ४८ हजार १७७ क्षतिग्रस्त व्यक्तींना एकूण ५ कोटी ३८ लाख ३ हजार ९० रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरात वाहून मृत्यू झालेल्या जरिपटक्याच्या कस्तुरबानगरातील रेखा अनंत नेवारे व काचीपुरा येथील मुलुखराज भीमाजी मसराम यांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच प्रत्येकी चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेशही सोपविला. नागपूर शहरात कस्तुरबानगर, रिमा नगर, गोदावरी नगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्य नगर, वेले नगर, पांडुरंग नगर, काचीपुरा, सोनिया गांधी नगर भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सोमवारी वनदेवी नगर, संघर्ष नगर आणि पांढराबोडी येथे सर्वेक्षणासाठी चमू पाठविण्यात येणार आहे. यासाठी काटोल, उमरेड, हिंगणा व नरखेड तालुक्यातील ३४ तलाठी नागपुरात सर्वेक्षणासाठी युद्धपातळीवर कामाला लावले आहेत. नागपूर शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घरांच्या स्थलांतरापोटी १० कोटी रुपयांची खावटी ३५ हजार कुटुंबांना मिळेल. नागपूर शहरासाठी ३५ लाख ९५ हजार रुपये खावटीची रक्कम मंजूर झाली असून सोमवारी ती बँकेत जमा होईल. नागपूर ग्रामीण भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार उमरेड उपविभागात अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ६९९ घरांच्या ३९९ लोकांना ६ लाख३ हजार ९०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे तर दोन मृतांच्या नातेवाईकांन ८ लाख रुपयाची मदत देण्यात येत आहे. मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा१३ आॅगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेले नुकसान व पूरग्रस्तांच्या व्यथांकडे प्रशसानाचे लक्ष वेधले. लोकमतच्या पुढाकाराने शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पूरपरिस्थितीची माहिती घेऊन मुंबईवरून सूचना देत होते. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात सावनेर तालुक्यातील ११ हजार ४६९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.