शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले सरकार

By admin | Updated: August 17, 2015 02:48 IST

नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले.

नागपूर - नागपूर शहर व जिल्ह्यात १३ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे घर व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नुकसानाचा अंदाज घेऊन त्वरित मदत करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देताच प्रशासन कामाला लागले आहे. क्षतिग्रस्त झालेल्या घरांच्या नुकसानापोटी ४८ हजार १७७ क्षतिग्रस्त व्यक्तींना एकूण ५ कोटी ३८ लाख ३ हजार ९० रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरात वाहून मृत्यू झालेल्या जरिपटक्याच्या कस्तुरबानगरातील रेखा अनंत नेवारे व काचीपुरा येथील मुलुखराज भीमाजी मसराम यांच्या कुटुंबीयांची रविवारी भेट घेऊन सांत्वन केले. तसेच प्रत्येकी चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेशही सोपविला. नागपूर शहरात कस्तुरबानगर, रिमा नगर, गोदावरी नगर, झिंगाबाई टाकळी, भदन्त कौशल्य नगर, वेले नगर, पांडुरंग नगर, काचीपुरा, सोनिया गांधी नगर भागाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सोमवारी वनदेवी नगर, संघर्ष नगर आणि पांढराबोडी येथे सर्वेक्षणासाठी चमू पाठविण्यात येणार आहे. यासाठी काटोल, उमरेड, हिंगणा व नरखेड तालुक्यातील ३४ तलाठी नागपुरात सर्वेक्षणासाठी युद्धपातळीवर कामाला लावले आहेत. नागपूर शहराचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर घरांच्या स्थलांतरापोटी १० कोटी रुपयांची खावटी ३५ हजार कुटुंबांना मिळेल. नागपूर शहरासाठी ३५ लाख ९५ हजार रुपये खावटीची रक्कम मंजूर झाली असून सोमवारी ती बँकेत जमा होईल. नागपूर ग्रामीण भागातील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यानुसार उमरेड उपविभागात अतिवृष्टीमुळे क्षतिग्रस्त झालेल्या ६९९ घरांच्या ३९९ लोकांना ६ लाख३ हजार ९०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येत आहे तर दोन मृतांच्या नातेवाईकांन ८ लाख रुपयाची मदत देण्यात येत आहे. मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी मंजूर करण्यात आली आहे. लोकमतने मांडल्या पूरग्रस्तांच्या व्यथा१३ आॅगस्ट रोजी नागपुरात अतिवृष्टी झाली. शहरात आणि ग्रामीण भागात हाहाकार माजला. नदीकाठावरील गावांना फटका बसला. नागपूर शहरातही काही वस्त्यांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात एकूण ११ जणांचे जीव गेले. शेकडोंचे संसार उघड्यावर आले. हजारो बेघर झाले. लोकमतने पुढाकार घेऊन पुरामुळे प्रभावित झालेल्या भागाचा दौरा केला. पुरामुळे झालेले नुकसान व पूरग्रस्तांच्या व्यथांकडे प्रशसानाचे लक्ष वेधले. लोकमतच्या पुढाकाराने शासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले. पालकमंत्री, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दौरे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: पूरपरिस्थितीची माहिती घेऊन मुंबईवरून सूचना देत होते. रविवारी त्यांनी प्रत्यक्ष पाहणीही केली. २६ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान जिल्ह्यात २६ हजार ८५३ हेक्टर क्षेत्रातील पिकांना अतिवृष्टी व पुराचा तडाखा बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे. यात सावनेर तालुक्यातील ११ हजार ४६९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. येत्या दोन दिवसात पीक नुकसानाचा अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे.