शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टातील वकिलांना एसी देण्यास शासन असमर्थ

By admin | Updated: October 24, 2015 03:22 IST

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांप्रमाणे या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि सर्व जिल्हा न्यायालयांतील वकिलांच्या खोल्यांमध्ये ...

प्रतिज्ञापत्र सादर : मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याचे दिले कारणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांप्रमाणे या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि सर्व जिल्हा न्यायालयांतील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने असमर्थता दर्शविली आहे. या सर्वांना ‘एसी’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यास शासनाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावले असून नागपूर खंडपीठातील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्यास नकार देण्यात येत आहे. ही भेदभावपूर्ण भूमिका लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयश आल्यास राज्याचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांनी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी दिली होती. त्यानुसार विधी व न्याय विभागाचे सचिव निजामोद्दीन जमादार यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट केली आहे.मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत वकील विशेष दर्जाचे आहेत असे शासनाने कधीच म्हटले नाही. मुंबईतील वकिलांच्या खोल्यामध्ये ‘एसी’ लावण्याचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाकडून प्राप्त झाला होता. मुंबई उच्च न्यायालयातील सर्व न्यायालय कक्ष व न्यायमूर्तींच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ आहेत. ही बाब लक्षात घेता वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्याचा मुद्दा पुढे आला होता. १८ एप्रिल २०१५ रोजी मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या बैठकीमध्ये वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्याचा व वीज बिलाचा खर्च शासन करेल असा निर्णय घेण्यात आला. शासनाने शहर दिवाणी न्यायालय, लघुवाद न्यायालये व महानगर न्याय दंडाधिकारी न्यायालयातील वकिलांना ‘एसी’ उपलब्ध करून दिलेले नाहीत. यामुळे राज्यातील सर्व वकील संघटनांना ‘एसी’ उपलब्ध करून देण्यास शासनाला भाग पाडता येणार नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम पडेल अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. यासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)