शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

हायकोर्टातील वकिलांना एसी देण्यास शासन असमर्थ

By admin | Updated: October 24, 2015 03:22 IST

मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांप्रमाणे या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि सर्व जिल्हा न्यायालयांतील वकिलांच्या खोल्यांमध्ये ...

प्रतिज्ञापत्र सादर : मोठा आर्थिक भुर्दंड बसण्याचे दिले कारणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांप्रमाणे या न्यायालयाच्या नागपूर व औरंगाबाद खंडपीठ आणि सर्व जिल्हा न्यायालयांतील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने असमर्थता दर्शविली आहे. या सर्वांना ‘एसी’ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यास शासनाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.शासनाने मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावले असून नागपूर खंडपीठातील वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्यास नकार देण्यात येत आहे. ही भेदभावपूर्ण भूमिका लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयश आल्यास राज्याचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव आणि विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांनी व्यक्तीश: न्यायालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करावे, अशी तंबी दिली होती. त्यानुसार विधी व न्याय विभागाचे सचिव निजामोद्दीन जमादार यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून भूमिका स्पष्ट केली आहे.मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत वकील विशेष दर्जाचे आहेत असे शासनाने कधीच म्हटले नाही. मुंबईतील वकिलांच्या खोल्यामध्ये ‘एसी’ लावण्याचा प्रस्ताव मुंबई उच्च न्यायालयाकडून प्राप्त झाला होता. मुंबई उच्च न्यायालयातील सर्व न्यायालय कक्ष व न्यायमूर्तींच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ आहेत. ही बाब लक्षात घेता वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्याचा मुद्दा पुढे आला होता. १८ एप्रिल २०१५ रोजी मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या बैठकीमध्ये वकिलांच्या खोल्यांमध्ये ‘एसी’ लावण्याचा व वीज बिलाचा खर्च शासन करेल असा निर्णय घेण्यात आला. शासनाने शहर दिवाणी न्यायालय, लघुवाद न्यायालये व महानगर न्याय दंडाधिकारी न्यायालयातील वकिलांना ‘एसी’ उपलब्ध करून दिलेले नाहीत. यामुळे राज्यातील सर्व वकील संघटनांना ‘एसी’ उपलब्ध करून देण्यास शासनाला भाग पाडता येणार नाही. यामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर वाईट परिणाम पडेल अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. यासंदर्भात हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरने जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक तर, शासनातर्फे मुख्य सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)