शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

शेणखताला आले सोनेरी दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST

मधुसूदन चरपे गुमगाव : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत घसरत चाललेली आहे. परिणामी, सेंद्रिय व जैविक शेती ...

मधुसूदन चरपे

गुमगाव : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस जमिनीची पोत घसरत चाललेली आहे. परिणामी, सेंद्रिय व जैविक शेती करण्यावर काही शेतकरी आता भर देत आहेत. जमिनीची पोत सुधारावी याकरिता शेतकरी शेणखताचा वापर करण्याकडे आता वळले आहेत. मात्र हल्ली पशुधनाच्या कमतरतेमुळे पूर्वी सहज मिळणारे शेणखत आता भाव खाऊ लागले आहे. परिणामी, शेणखताला चांगला भाव मिळतो आहे. सध्या गुमगाव परिसरातील कोतेवाडा, वागदरा, खडका, किरमिटी, शिवमडका, लाडगाव, वडगाव, जामठा, सोंडापार, धानोली, कान्होली, डोंगरगाव, खापरी आदी गावामधील कसदार शेती काहीअंशी मिहान, समृद्धी महामार्ग, निवासी वसाहत, विविध कंपन्या आणि गोडाऊन्ससाठी आता उपयोगात आहे. परिणामी, परिसरातील शेतकऱ्यांकडे पाळीव जनावरे-पशुधन कमी झाले. त्यामुळे शेणखताचा तुटवडा आता परिसरात प्रकर्षाने जाणवू लागला आहे. रासायनिक खते हे आरोग्याला हानीकारक ठरत असल्याचे जाणकाराचे मत आहे. कर्करोग, हृदयरोग, अकाली केस पांढरे होणे आदी रोगांच्या प्रमाणात वाढ होत आहे. शरीराला पोषक अन्नद्रव्य मिळत नाही. सततच्या रासायनिक खतवापराने जमीन नापिकी होते. जमिनीची पाणी टिकविण्याची क्षमता नष्ट होत आहे. विशेष म्हणजे रासायनिक खतांच्या किमतीत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत असल्याने रासायनिक खते परवडत नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. परिणामी, शेतकरी पुन्हा एकदा शेणखताकडे वळत आहेत. चांगल्या कुजलेल्या शेणखताच्या एका ट्रॅक्टर ट्रॉलीला सध्या अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत.

--

माझ्या शेतात सेंद्रिय भाजीपाला लागवड केली असून वांगी, टोमॅटो, भेंडी, पालक, चवळी, कांदा, लसूण, सांबार इत्यादीचे शेणखताच्या वापराने भरघोस उत्पन्न घेत आहो. रासायनिक खताच्या तुलनेत शेणखताच्या वापराने अधिक मोबदला मिळतो आहे.

विष्णू डहाके, शेतकरी.